शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

वर्ध्यातील प्रतिपंढरीच्या वारीला पावणे दोनशे वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:59 IST

वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख.

ठळक मुद्देतिसरी पिढी जोपासतेय धार्मिक वारसा

विजय माहुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख. या गावातून श्री.संत केजाजी महाराज यांनी वारीची परंपरा सुरू केली. या वारी परंपरेला पावणे दोनशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. या गावातील तिसरी व चौथी पिढीही महाराजांचा हा वारसा अजूनही चालवित आहे. त्याचा हा आढावा.आषाढीची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या विठूरायाचे वेध लागतात. पाऊस असो की पेरणीचा हंगाम, सर्व कामे, अडचणी सोडून त्यांना केवळ पंढरपूर गाठायचे असते. यंदाही विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया घोराड नगरीतून संत केजाजी महाराज पायदळ दिंडी पंढरपूरच्या वाटेने असून हे दिडींचे १५ वे वर्ष आहे. मात्र, संत केजाजी महाराज पंढरपूरची पायदळ वारी करायचे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज यांनीही प्रथा १९५८ सुरू ठेवली. त्यानंतर विठ्ठलभक्त हरिभाऊ रामटेके यांनी १९९२ पर्यंत पायदळ वारी केली. यांच्या पश्चात १५ ते २० वर्षांचा खंड पडला; मात्र या वारीच्या परंपरेला पावणे दोनशे वर्षांची घोराडमध्ये असलेली परंपरा आजही सुरू आहे.यवतमाळ येथील नरेश महाराज पाटील यांनी २००४ मध्ये घोराडवरून संत केजाजी महाराज दिंडी काढण्यास पुढाकार घेतला; मात्र ही दिंडी आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी आहे. या दिंडीत युवा, वयोवृद्ध महिला, पुरूष वारकऱ्यांचा समावेश आहे. पेशाने सेवानिवृत्त शिक्षक असलेले बबनराव माहुरे हे या दिडींचे विणेकरी आहेत. ते आज ८० वर्षे वयाचे आहे. २५ जूनला ही दिंडी आळंदीवरून पंढरपूरकरिता प्रस्थान झाली. दररोज २५ ते ३० कि़मी. अंतर हरिनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा निनाद, माऊली, तुकारामांचा जप करीत पायदळ वारी करीत असंख्य वारकरी दिवसाचा मुक्काम रात्री करीत असले तरी पहाटे ४ वाजतापासूनच दिंडीत पंढरीची आस करीत मार्गस्थ होते. या दिंडीत घोराड सह इतर गावातील वारकरी सहभागी असून जवळपास पाचशेहून अधिक वारकरी आहेत. दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या नाश्ता व भोजनाची व्यवस्था अन्नदात्यांकडून आहे. ही दिंडी ११ जुलै २०१९ ला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. १४ पर्यंत मुक्काम असणार आहे.

घोराडवरून जातात हजारो वारकरीया महिन्यात घोराडवरून्न कुणी ट्रॅव्हल्स, खासगी वाहन, व रेल्वेने हजारो वारकरी पंढरपूरला जाऊन विठूरायाचे दर्शन घेऊन येतात. यात वयोवृद्ध, युवक व बाल गोपालकांचा समावेश आहे. हा महिना जणू घोराडकरांना पंढरीचे वेध लावणाराच ठरतो.

दोन पायदळ दिंड्या१५ वर्षांपासुन सुरू असलेली दिंडी आळंदीवरून प्रस्थान करते तर गत ४ वर्षांपासून घोराड येथील हरिभाऊ महाकाळकर यांच्या नेतृत्वात घोराड ते पंढरपूर पायदळ दिंडी सुरू असून पवनार, देवळी, यवतमाळ, माळेगाव, औंढा, परभणी, गंगाखेडमार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे. 

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी