शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील प्रतिपंढरीच्या वारीला पावणे दोनशे वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:59 IST

वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख.

ठळक मुद्देतिसरी पिढी जोपासतेय धार्मिक वारसा

विजय माहुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख. या गावातून श्री.संत केजाजी महाराज यांनी वारीची परंपरा सुरू केली. या वारी परंपरेला पावणे दोनशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. या गावातील तिसरी व चौथी पिढीही महाराजांचा हा वारसा अजूनही चालवित आहे. त्याचा हा आढावा.आषाढीची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या विठूरायाचे वेध लागतात. पाऊस असो की पेरणीचा हंगाम, सर्व कामे, अडचणी सोडून त्यांना केवळ पंढरपूर गाठायचे असते. यंदाही विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया घोराड नगरीतून संत केजाजी महाराज पायदळ दिंडी पंढरपूरच्या वाटेने असून हे दिडींचे १५ वे वर्ष आहे. मात्र, संत केजाजी महाराज पंढरपूरची पायदळ वारी करायचे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज यांनीही प्रथा १९५८ सुरू ठेवली. त्यानंतर विठ्ठलभक्त हरिभाऊ रामटेके यांनी १९९२ पर्यंत पायदळ वारी केली. यांच्या पश्चात १५ ते २० वर्षांचा खंड पडला; मात्र या वारीच्या परंपरेला पावणे दोनशे वर्षांची घोराडमध्ये असलेली परंपरा आजही सुरू आहे.यवतमाळ येथील नरेश महाराज पाटील यांनी २००४ मध्ये घोराडवरून संत केजाजी महाराज दिंडी काढण्यास पुढाकार घेतला; मात्र ही दिंडी आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी आहे. या दिंडीत युवा, वयोवृद्ध महिला, पुरूष वारकऱ्यांचा समावेश आहे. पेशाने सेवानिवृत्त शिक्षक असलेले बबनराव माहुरे हे या दिडींचे विणेकरी आहेत. ते आज ८० वर्षे वयाचे आहे. २५ जूनला ही दिंडी आळंदीवरून पंढरपूरकरिता प्रस्थान झाली. दररोज २५ ते ३० कि़मी. अंतर हरिनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा निनाद, माऊली, तुकारामांचा जप करीत पायदळ वारी करीत असंख्य वारकरी दिवसाचा मुक्काम रात्री करीत असले तरी पहाटे ४ वाजतापासूनच दिंडीत पंढरीची आस करीत मार्गस्थ होते. या दिंडीत घोराड सह इतर गावातील वारकरी सहभागी असून जवळपास पाचशेहून अधिक वारकरी आहेत. दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या नाश्ता व भोजनाची व्यवस्था अन्नदात्यांकडून आहे. ही दिंडी ११ जुलै २०१९ ला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. १४ पर्यंत मुक्काम असणार आहे.

घोराडवरून जातात हजारो वारकरीया महिन्यात घोराडवरून्न कुणी ट्रॅव्हल्स, खासगी वाहन, व रेल्वेने हजारो वारकरी पंढरपूरला जाऊन विठूरायाचे दर्शन घेऊन येतात. यात वयोवृद्ध, युवक व बाल गोपालकांचा समावेश आहे. हा महिना जणू घोराडकरांना पंढरीचे वेध लावणाराच ठरतो.

दोन पायदळ दिंड्या१५ वर्षांपासुन सुरू असलेली दिंडी आळंदीवरून प्रस्थान करते तर गत ४ वर्षांपासून घोराड येथील हरिभाऊ महाकाळकर यांच्या नेतृत्वात घोराड ते पंढरपूर पायदळ दिंडी सुरू असून पवनार, देवळी, यवतमाळ, माळेगाव, औंढा, परभणी, गंगाखेडमार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे. 

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी