शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

वर्ध्यातील प्रतिपंढरीच्या वारीला पावणे दोनशे वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:59 IST

वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख.

ठळक मुद्देतिसरी पिढी जोपासतेय धार्मिक वारसा

विजय माहुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख. या गावातून श्री.संत केजाजी महाराज यांनी वारीची परंपरा सुरू केली. या वारी परंपरेला पावणे दोनशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. या गावातील तिसरी व चौथी पिढीही महाराजांचा हा वारसा अजूनही चालवित आहे. त्याचा हा आढावा.आषाढीची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या विठूरायाचे वेध लागतात. पाऊस असो की पेरणीचा हंगाम, सर्व कामे, अडचणी सोडून त्यांना केवळ पंढरपूर गाठायचे असते. यंदाही विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया घोराड नगरीतून संत केजाजी महाराज पायदळ दिंडी पंढरपूरच्या वाटेने असून हे दिडींचे १५ वे वर्ष आहे. मात्र, संत केजाजी महाराज पंढरपूरची पायदळ वारी करायचे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज यांनीही प्रथा १९५८ सुरू ठेवली. त्यानंतर विठ्ठलभक्त हरिभाऊ रामटेके यांनी १९९२ पर्यंत पायदळ वारी केली. यांच्या पश्चात १५ ते २० वर्षांचा खंड पडला; मात्र या वारीच्या परंपरेला पावणे दोनशे वर्षांची घोराडमध्ये असलेली परंपरा आजही सुरू आहे.यवतमाळ येथील नरेश महाराज पाटील यांनी २००४ मध्ये घोराडवरून संत केजाजी महाराज दिंडी काढण्यास पुढाकार घेतला; मात्र ही दिंडी आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी आहे. या दिंडीत युवा, वयोवृद्ध महिला, पुरूष वारकऱ्यांचा समावेश आहे. पेशाने सेवानिवृत्त शिक्षक असलेले बबनराव माहुरे हे या दिडींचे विणेकरी आहेत. ते आज ८० वर्षे वयाचे आहे. २५ जूनला ही दिंडी आळंदीवरून पंढरपूरकरिता प्रस्थान झाली. दररोज २५ ते ३० कि़मी. अंतर हरिनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा निनाद, माऊली, तुकारामांचा जप करीत पायदळ वारी करीत असंख्य वारकरी दिवसाचा मुक्काम रात्री करीत असले तरी पहाटे ४ वाजतापासूनच दिंडीत पंढरीची आस करीत मार्गस्थ होते. या दिंडीत घोराड सह इतर गावातील वारकरी सहभागी असून जवळपास पाचशेहून अधिक वारकरी आहेत. दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या नाश्ता व भोजनाची व्यवस्था अन्नदात्यांकडून आहे. ही दिंडी ११ जुलै २०१९ ला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. १४ पर्यंत मुक्काम असणार आहे.

घोराडवरून जातात हजारो वारकरीया महिन्यात घोराडवरून्न कुणी ट्रॅव्हल्स, खासगी वाहन, व रेल्वेने हजारो वारकरी पंढरपूरला जाऊन विठूरायाचे दर्शन घेऊन येतात. यात वयोवृद्ध, युवक व बाल गोपालकांचा समावेश आहे. हा महिना जणू घोराडकरांना पंढरीचे वेध लावणाराच ठरतो.

दोन पायदळ दिंड्या१५ वर्षांपासुन सुरू असलेली दिंडी आळंदीवरून प्रस्थान करते तर गत ४ वर्षांपासून घोराड येथील हरिभाऊ महाकाळकर यांच्या नेतृत्वात घोराड ते पंढरपूर पायदळ दिंडी सुरू असून पवनार, देवळी, यवतमाळ, माळेगाव, औंढा, परभणी, गंगाखेडमार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे. 

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी