शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

वाही, पिंपळझरी,पिंपळदरीवासियांचे दुष्काळाशी दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:58 IST

गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पिंपळझरी, पिंपळदरी, वाही, वासी या गावातील नागरिकांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई जाणवू नये याकरिता कंबर कसल्याचे मंगळवारी दिसून आले. या गावातील नागरिकांनी एकजुट दाखवून संभाव्य दुष्काळाशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली.

ठळक मुद्दे६०० लोकवस्तीच्या गावात ६ हजार लोकांच्या ताकदीचे काम : तीन दिवसांत ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पिंपळझरी, पिंपळदरी, वाही, वासी या गावातील नागरिकांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई जाणवू नये याकरिता कंबर कसल्याचे मंगळवारी दिसून आले. या गावातील नागरिकांनी एकजुट दाखवून संभाव्य दुष्काळाशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली. गावकऱ्यांनी तिसºया दिवसापर्यंत ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण केल्याचे दिसून आले.मंगळवार स्पर्धेचा तिसरा दिवस. वैद्यकीय जनजागृती मंचाचे सदस्य डॉ. सचिन पावडे, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, आशिष पड्डलवार हे वाही या गावात श्रमदान करण्यास गेले होते. तिथे त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच गारपिटीने संपुर्ण गावाचे भयंकर नुकसान झाले असताना वाही व वासी या गावांनी एकजुटीने संपुर्ण ताकदीने गावाजवळच्या टेकडीवर श्रमदान केले. स्पर्धेच्या तिसºया दिवशी त्यांनी जवळपास ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण केले होते. पुढील कामाचेही नियोजन झालेले होते. गावात जवळपास १०० टक्के शोषखड्डे झले असून रोपवाटिकेमध्ये दीड हजार झाडांची लागवड झाली आहे. तसेच इतर जलबचतीचे उपक्रमांचेही नियोजन झालेले आहे. गारपिटीने या गावातील जवळपास सर्वच घरे क्षतिग्रस्त झालेली आहेत. तसेच काही घरे तर जमीनदोस्त झालेली आहेत. गावात पाण्याचा दुष्काळ असतानाही, हे गावकरी मात्र कुणावरही अवलंबून नाही. एकजुटीच्या ताकदिने दुष्काळाशी दोन हात करीत दररोज सकाळी श्रमदान सुरू आहे.गावातील एकजुटीच्या ताकदीने साऱ्यांनाच धक्कातीनही गाव मिळून लोकसंख्या अंदाजे सुमारे ६०० लोकसंख्या असलेल्या गावांतील लोकांचे बळ मात्र सहा हजारांचे आहे. हे येथे भेट दिल्यानंतर जाणवले. आसपासच्या स्वयंसेवी संघटनाचे श्रमदान तसेच शासकीय मदत आणि वनविभागाचे योग्य सहकार्य मिळाल्यास हे गाव निश्चितच पाणीदार होऊ शकते, असे मत पाणी फाऊंडेशनचे समन्वयक राम आंबोरे, गणेश गजकेश्वर, शंकर शिरेबंदी या ग्रामवासीयांनी मांडले. तसेच डॉ. सचिन पावडे यांनी गावकºयांची भेट घेऊन श्रमदानासाठी पाच कुदळ, पाच फावडे, १० घमेले, तसेच एक सब्बल भेटस्वरूप दिली. तसेच वॉटर कप स्पर्धेचे स्वरूप तसेच श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले.