शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाही, पिंपळझरी,पिंपळदरीवासियांचे दुष्काळाशी दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:58 IST

गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पिंपळझरी, पिंपळदरी, वाही, वासी या गावातील नागरिकांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई जाणवू नये याकरिता कंबर कसल्याचे मंगळवारी दिसून आले. या गावातील नागरिकांनी एकजुट दाखवून संभाव्य दुष्काळाशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली.

ठळक मुद्दे६०० लोकवस्तीच्या गावात ६ हजार लोकांच्या ताकदीचे काम : तीन दिवसांत ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पिंपळझरी, पिंपळदरी, वाही, वासी या गावातील नागरिकांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई जाणवू नये याकरिता कंबर कसल्याचे मंगळवारी दिसून आले. या गावातील नागरिकांनी एकजुट दाखवून संभाव्य दुष्काळाशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली. गावकऱ्यांनी तिसºया दिवसापर्यंत ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण केल्याचे दिसून आले.मंगळवार स्पर्धेचा तिसरा दिवस. वैद्यकीय जनजागृती मंचाचे सदस्य डॉ. सचिन पावडे, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, आशिष पड्डलवार हे वाही या गावात श्रमदान करण्यास गेले होते. तिथे त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच गारपिटीने संपुर्ण गावाचे भयंकर नुकसान झाले असताना वाही व वासी या गावांनी एकजुटीने संपुर्ण ताकदीने गावाजवळच्या टेकडीवर श्रमदान केले. स्पर्धेच्या तिसºया दिवशी त्यांनी जवळपास ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण केले होते. पुढील कामाचेही नियोजन झालेले होते. गावात जवळपास १०० टक्के शोषखड्डे झले असून रोपवाटिकेमध्ये दीड हजार झाडांची लागवड झाली आहे. तसेच इतर जलबचतीचे उपक्रमांचेही नियोजन झालेले आहे. गारपिटीने या गावातील जवळपास सर्वच घरे क्षतिग्रस्त झालेली आहेत. तसेच काही घरे तर जमीनदोस्त झालेली आहेत. गावात पाण्याचा दुष्काळ असतानाही, हे गावकरी मात्र कुणावरही अवलंबून नाही. एकजुटीच्या ताकदिने दुष्काळाशी दोन हात करीत दररोज सकाळी श्रमदान सुरू आहे.गावातील एकजुटीच्या ताकदीने साऱ्यांनाच धक्कातीनही गाव मिळून लोकसंख्या अंदाजे सुमारे ६०० लोकसंख्या असलेल्या गावांतील लोकांचे बळ मात्र सहा हजारांचे आहे. हे येथे भेट दिल्यानंतर जाणवले. आसपासच्या स्वयंसेवी संघटनाचे श्रमदान तसेच शासकीय मदत आणि वनविभागाचे योग्य सहकार्य मिळाल्यास हे गाव निश्चितच पाणीदार होऊ शकते, असे मत पाणी फाऊंडेशनचे समन्वयक राम आंबोरे, गणेश गजकेश्वर, शंकर शिरेबंदी या ग्रामवासीयांनी मांडले. तसेच डॉ. सचिन पावडे यांनी गावकºयांची भेट घेऊन श्रमदानासाठी पाच कुदळ, पाच फावडे, १० घमेले, तसेच एक सब्बल भेटस्वरूप दिली. तसेच वॉटर कप स्पर्धेचे स्वरूप तसेच श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले.