शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

विजेच्या धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

By admin | Updated: October 11, 2014 02:01 IST

शेतात कामानिमित्त गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

तळेगाव (श्यामजीपंत), आकोली : शेतात कामानिमित्त गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यातील एक घटना तळेगाव (श्या.पं.) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळगाव तर दुसरी घटना सेलू पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या तामसवाडा शिवारात घडली. नरेश किसन बोरवार (२७) रा. कोपरा पुनर्वसन आणि पुरूषोत्तम गोपाल कोरडे (४२) अशी मृतकांची नावे आहेत. जळगाव शिवारात झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू लपविण्याकरिता शेतमालकाने त्याचा मृतदेह एका प्लासिटकच्या थैलीत ठेवल्याने हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जळगाव शिवारात नरेश बोरवार हा हरिराम निमनकर यांच्या शेताच्या धुऱ्याने जात होता. यावेळी निमनकर यांच्या पऱ्हाटीच्या शेतात शेतमजूर रामचंद्र आतराम रा. नांदोरा पुनर्वसन याने तारांच्या कुंपणाला विजेचा प्रवाह सुरू ठेवला होता. या तारांना नरेश बोरवारचा स्पर्श होताच त्याला विजेचा जोरदार झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्लास्टिकच्या थैलीमध्ये प्रेत टाकून ठेवण्यात आले. सदर घटनेची माहिती पोलीस पाटलांना मिळताच त्याने तळेगाव पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत प्रकरणाचा पंचनामा केला. सदर घटनेचा तपास सुरू आहे.दुसऱ्या घटनेत पुरूषोत्तम गोपाल कोरडे (४२) रा. चांदणी (बोथली) ता. आर्वी, हल्ली मुक्काम तामसवाडा याने दत्तूजी कौरती यांचे शेत मक्त्याने केले होते. शेतात विजेच्या खांबावर लोखंडी तारांच्या साहाय्याने त्याने लाईट लावले होते. सकाळीच तो स्प्रिंकलरचे पाईप बदलविण्यासाठी गेला होता. दुपारपर्यंत घरी न आल्याने शेतात जाऊन बघितले असता, तो मृतावस्थेत आढळला. वीज प्रवाहित लोखंडी ताराला त्याचा स्पर्श होऊन तो जागीच ठार झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ठाणेदार संतोष बाकल यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचा तपास सुरू आहे. (वार्ताहर)