शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

विजेच्या धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

By admin | Updated: October 11, 2014 02:01 IST

शेतात कामानिमित्त गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

तळेगाव (श्यामजीपंत), आकोली : शेतात कामानिमित्त गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यातील एक घटना तळेगाव (श्या.पं.) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळगाव तर दुसरी घटना सेलू पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या तामसवाडा शिवारात घडली. नरेश किसन बोरवार (२७) रा. कोपरा पुनर्वसन आणि पुरूषोत्तम गोपाल कोरडे (४२) अशी मृतकांची नावे आहेत. जळगाव शिवारात झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू लपविण्याकरिता शेतमालकाने त्याचा मृतदेह एका प्लासिटकच्या थैलीत ठेवल्याने हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जळगाव शिवारात नरेश बोरवार हा हरिराम निमनकर यांच्या शेताच्या धुऱ्याने जात होता. यावेळी निमनकर यांच्या पऱ्हाटीच्या शेतात शेतमजूर रामचंद्र आतराम रा. नांदोरा पुनर्वसन याने तारांच्या कुंपणाला विजेचा प्रवाह सुरू ठेवला होता. या तारांना नरेश बोरवारचा स्पर्श होताच त्याला विजेचा जोरदार झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्लास्टिकच्या थैलीमध्ये प्रेत टाकून ठेवण्यात आले. सदर घटनेची माहिती पोलीस पाटलांना मिळताच त्याने तळेगाव पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत प्रकरणाचा पंचनामा केला. सदर घटनेचा तपास सुरू आहे.दुसऱ्या घटनेत पुरूषोत्तम गोपाल कोरडे (४२) रा. चांदणी (बोथली) ता. आर्वी, हल्ली मुक्काम तामसवाडा याने दत्तूजी कौरती यांचे शेत मक्त्याने केले होते. शेतात विजेच्या खांबावर लोखंडी तारांच्या साहाय्याने त्याने लाईट लावले होते. सकाळीच तो स्प्रिंकलरचे पाईप बदलविण्यासाठी गेला होता. दुपारपर्यंत घरी न आल्याने शेतात जाऊन बघितले असता, तो मृतावस्थेत आढळला. वीज प्रवाहित लोखंडी ताराला त्याचा स्पर्श होऊन तो जागीच ठार झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ठाणेदार संतोष बाकल यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचा तपास सुरू आहे. (वार्ताहर)