शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन दशकांपासून हिंदूबहुल गावाचे नेतृत्व मुस्लिम कुटुंबाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

देवळी तालुक्यातील रत्नापूर हे गाव आहे. ते नागपूर-यवतमाळ महामार्गामुळे दोन भागात विभागल्या गेलेत. अर्धेअधिक गाव महामार्गाच्या अड्याल तर उर्वरित गाव महामार्गाच्या पड्याल आहे. या गावाची लोक संख्या पंधराशेच्या घरात आहे. हिंदू बहूल असलेल्या या गावामध्ये अयुब अली पटेल यांचे एकमेव घर आहे. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासापोटी गेल्या तीस वर्षांपासून त्यांची ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे.

ठळक मुद्देरत्नापूर गावात नांदतोय सामाजिक एकोपा

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटल्या की, जाती-पातीचे राजकारण आलेच. त्यातून विरोधकांचा गटही सक्रीय होऊन गावामधील एकोपा आणि शांततेलाही बाधा निर्माण होते. पण, हिंदू बहूल असलेल्या गावामध्ये एकच मुस्लिम कुटूंब असताना गावकऱ्यांनी एक-दोन वर्षे नाही तर तब्बल २० वर्षे गावाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी ते मुस्लिम परिवार मोठ्या खंबिरपणे पेलून गावाच्या विकासात भर घालत आहे.देवळी तालुक्यातील रत्नापूर हे गाव आहे. ते नागपूर-यवतमाळ महामार्गामुळे दोन भागात विभागल्या गेलेत. अर्धेअधिक गाव महामार्गाच्या अड्याल तर उर्वरित गाव महामार्गाच्या पड्याल आहे. या गावाची लोक संख्या पंधराशेच्या घरात आहे. हिंदू बहूल असलेल्या या गावामध्ये अयुब अली पटेल यांचे एकमेव घर आहे. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासापोटी गेल्या तीस वर्षांपासून त्यांची ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे. त्यापैकी वीस वर्ष ेअयुब अली पटेल व त्यांची पत्नी शाहीन अंजूम यांनी सरपंचपदाचा कार्यभार सांभाळला आहे. आताही शाहीन अंजूम या सरपंचपदाची निर्भिडपणे धुरा सांभाळत आहे. कोरोना काळात सरंपच आणि सदस्यांना ग्रामस्थांचे पाठबळ असल्याने गाव कोरोनामुक्त राहिले आहे. गेल्या तीन दशकांपासून या गावात सर्वधर्म समभावावी प्रभावीपणे रुजवण होत असल्याने हे गाव इतर गावांसाठी नक्कीच पे्ररणादायी ठरणारे आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत