शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

दोन दिवसांत आरटीओची कमाई ९७ लाख

By admin | Updated: April 7, 2017 02:04 IST

न्यायालयाने बीएस इंजिनच्या गाड्यांची विक्रीबंद करण्याचा निर्णय घेताच विविध कंपनीच्यावतीने मोठ मोठ्या आॅफर देत वाहनांची विक्री केली.

बीएस ३ इंजिनबंदी : ८८७ वाहनांची नोंदणी; रात्री उशिरापर्यंत केले कर्मचाऱ्यांनी कामरूपेश खैरी  वर्धा न्यायालयाने बीएस इंजिनच्या गाड्यांची विक्रीबंद करण्याचा निर्णय घेताच विविध कंपनीच्यावतीने मोठ मोठ्या आॅफर देत वाहनांची विक्री केली. या आॅफरमधून वर्धेत तब्बल ८८७ वाहनांची विक्री झाली तर नोंदणी शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाचीही बक्कळ कमाई झाली. निर्णयाच्या दोन दिवसात वाहनांच्या नोंदणी शुल्कातून विभागाला तब्बल ९७ लाख ३ हजार ७७९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दोन दिवसातील ही रक्कम आरटीओ कार्यालयाच्या रोजच्या सरासरी महसूलाच्या सातपट असल्याचे विभागाच्या रोजच्या महसूलावरून दिसत आहे. प्रदूषणाच्या कारणाने न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेल्या दोनचाकी आणि चारचाकी नव्या वाहनांची विक्रीबंदी जाहीर केली. न्यायालयाचा निर्णय जाहीर होताच विविध कंपनींकडून दुचाकीसह चारचाकी वाहनांवर मोठ मोठ्या आॅफर जाहीर केल्या. यात चारचाकी वाहनांचाही समावेश होता. आॅफर मिळताच नागरिकांनीही दुचाकी खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला. बंदीच्या दोन दिवसांपैकी ३० मार्चला वर्धेत २७९ दुचाकी वाहनांची नोंदणी झाली. या एका दिवसात १३ लाख ५१ लाख ७०० रुपये तर ३१ मार्च रोजी ६०८ वाहनांची नोंदणी झाली. या दिवशी उप प्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल ८३ ला ५१ हजार ९८९ रुपयांचा महसूल मिळाला आहे. बंदी जाहीर होताच नागरिकांकडून वाहन खरेदीचा सपाटा सुरू केला. वाहनाच्या नोंदणीकरिता एकच दिवस असल्याने नागरिकांच्या वाहनांची नोंदणी करण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागही सरसावला. या दिवसात कधी नव्हे तो उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम केला. त्यांनीही रात्री उशिरापर्यंत एकाच दिवशी खरेदी झालेल्या वाहनांची नोंद केली. या दोन दिवसात उप प्रादेशिक परिवहन विभागाचे काही अधिकारी ठराविक शोरूमध्ये ठिय्या मांडून असल्याची चर्चा वर्धेत आहे. यामुळे विभागाच्या कमाईसह काही अधिकाऱ्यांचीही कमाई यात झाल्याची चर्चाही जोरात आहे.सरासरी उत्पन्नाच्या सातपट कमाई वर्धेच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे महिन्याचे सरासरी उत्पन्न ३ कोटी रुपये असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात विभागात महिन्याच्या ३० दिवसांपैकी एकूण २२ दिवस होते. यात एका दिवसाची सरासरी कमाईचा विचार केल्यास १३ लाख ६३ हजार ६३६ रुपये होते. तर या दोन दिवसात विभागाची तब्बल ९७ लाख ३ हजार ७७९ रुपयांचा महसूल जप्त केला. हा महसूल रोजच्या महसूलाच्या तब्बल सातपट आहे. यामुळे उप प्रादेशिक परिवहन विभागाचे यंदाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नोंदणीकरिता आरटीओही उदार कधी एका दिवसात सणाचे दिवस वगळता सरासरी ५० ते ६० गाड्यांची नोंदणी करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचेही कर्मचारीही या दोन दिवसात बरेच उदार झाल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबत त्यांनी जेवढ्या गाड्यांची विक्री झाली तेवढ्याही गाड्यांची कुठलीही टाळाटाळ न करता नोंदणी करून घेतली. यामुळे वर्धेतील आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या कर्तव्यदक्षतेची सर्वत्र चर्चा होत आहे.