शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत आरटीओची कमाई ९७ लाख

By admin | Updated: April 7, 2017 02:04 IST

न्यायालयाने बीएस इंजिनच्या गाड्यांची विक्रीबंद करण्याचा निर्णय घेताच विविध कंपनीच्यावतीने मोठ मोठ्या आॅफर देत वाहनांची विक्री केली.

बीएस ३ इंजिनबंदी : ८८७ वाहनांची नोंदणी; रात्री उशिरापर्यंत केले कर्मचाऱ्यांनी कामरूपेश खैरी  वर्धा न्यायालयाने बीएस इंजिनच्या गाड्यांची विक्रीबंद करण्याचा निर्णय घेताच विविध कंपनीच्यावतीने मोठ मोठ्या आॅफर देत वाहनांची विक्री केली. या आॅफरमधून वर्धेत तब्बल ८८७ वाहनांची विक्री झाली तर नोंदणी शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाचीही बक्कळ कमाई झाली. निर्णयाच्या दोन दिवसात वाहनांच्या नोंदणी शुल्कातून विभागाला तब्बल ९७ लाख ३ हजार ७७९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दोन दिवसातील ही रक्कम आरटीओ कार्यालयाच्या रोजच्या सरासरी महसूलाच्या सातपट असल्याचे विभागाच्या रोजच्या महसूलावरून दिसत आहे. प्रदूषणाच्या कारणाने न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेल्या दोनचाकी आणि चारचाकी नव्या वाहनांची विक्रीबंदी जाहीर केली. न्यायालयाचा निर्णय जाहीर होताच विविध कंपनींकडून दुचाकीसह चारचाकी वाहनांवर मोठ मोठ्या आॅफर जाहीर केल्या. यात चारचाकी वाहनांचाही समावेश होता. आॅफर मिळताच नागरिकांनीही दुचाकी खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला. बंदीच्या दोन दिवसांपैकी ३० मार्चला वर्धेत २७९ दुचाकी वाहनांची नोंदणी झाली. या एका दिवसात १३ लाख ५१ लाख ७०० रुपये तर ३१ मार्च रोजी ६०८ वाहनांची नोंदणी झाली. या दिवशी उप प्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल ८३ ला ५१ हजार ९८९ रुपयांचा महसूल मिळाला आहे. बंदी जाहीर होताच नागरिकांकडून वाहन खरेदीचा सपाटा सुरू केला. वाहनाच्या नोंदणीकरिता एकच दिवस असल्याने नागरिकांच्या वाहनांची नोंदणी करण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागही सरसावला. या दिवसात कधी नव्हे तो उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम केला. त्यांनीही रात्री उशिरापर्यंत एकाच दिवशी खरेदी झालेल्या वाहनांची नोंद केली. या दोन दिवसात उप प्रादेशिक परिवहन विभागाचे काही अधिकारी ठराविक शोरूमध्ये ठिय्या मांडून असल्याची चर्चा वर्धेत आहे. यामुळे विभागाच्या कमाईसह काही अधिकाऱ्यांचीही कमाई यात झाल्याची चर्चाही जोरात आहे.सरासरी उत्पन्नाच्या सातपट कमाई वर्धेच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे महिन्याचे सरासरी उत्पन्न ३ कोटी रुपये असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात विभागात महिन्याच्या ३० दिवसांपैकी एकूण २२ दिवस होते. यात एका दिवसाची सरासरी कमाईचा विचार केल्यास १३ लाख ६३ हजार ६३६ रुपये होते. तर या दोन दिवसात विभागाची तब्बल ९७ लाख ३ हजार ७७९ रुपयांचा महसूल जप्त केला. हा महसूल रोजच्या महसूलाच्या तब्बल सातपट आहे. यामुळे उप प्रादेशिक परिवहन विभागाचे यंदाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नोंदणीकरिता आरटीओही उदार कधी एका दिवसात सणाचे दिवस वगळता सरासरी ५० ते ६० गाड्यांची नोंदणी करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचेही कर्मचारीही या दोन दिवसात बरेच उदार झाल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबत त्यांनी जेवढ्या गाड्यांची विक्री झाली तेवढ्याही गाड्यांची कुठलीही टाळाटाळ न करता नोंदणी करून घेतली. यामुळे वर्धेतील आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या कर्तव्यदक्षतेची सर्वत्र चर्चा होत आहे.