शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

दोन दिवसांपासून २२ गावे अंधारात

By admin | Updated: September 1, 2016 02:16 IST

पोहणा वीज वितरण कंपनी अंतर्गत येत असलेल्या २२ गावांवर दोन दिवसापासून अंधारात राहण्याची वेळ आली आहे.

पोहणा परिसरातील प्रकार : सणासुदीच्या दिवसात सर्वत्र काळोखवर्धा : पोहणा वीज वितरण कंपनी अंतर्गत येत असलेल्या २२ गावांवर दोन दिवसापासून अंधारात राहण्याची वेळ आली आहे. सिंगल फेजमुळे पाणी टंचाई, सोबतच रोगराई माठ्या प्रमाणात पसरली आहे. अद्यापही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र काळोखाचे साम्राज्य आहे. पिपरी उपकेेंद्रांतर्गत ३१ गावे येतात. ८ हजार ५०० घरगुती ग्राहक तर ३ कंपन्यांना येथून वीज पुरविली जाते. पोहणा वीज केंद्रांतर्गत २२ गावे येत असून उपकेंद्र पिपरी अंतर्गत ३१ गावांचा समावेश आहे. या उपकेद्रातून ३० आॅगस्टपासून वीज पुरवठा खंडित झाला. तो अद्यापही पूर्वरत झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पोहणा वीज केंद्रांतर्गत २२ गावात वीज पुरवठा खंडित असल्याने पोहणा बँकेचे व्यवहार ३० आॅगस्टपासून ठप्प झाले आहे. प्यायला पाणी मिळत नसल्याने विहीर व कालव्यातून पाणी आणावे लागत आहे. तसेच वीज नसल्याने शासकीय कार्यालयातील कामकाजही ठप्प झाले आहे. बँक, दवाखाने, शाळा, कॉलेज, पीठ गिरणी यावरही मोठा परिणाम झाला आहे. या सर्व समस्या बुधवारी वीज कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांचा रोष पाहून काही वेळ वीज कार्यालय खोलून नंतर बंद करीत कर्मचाऱ्यांनी येथून पळ काढला. पोहणा डीसी अंतर्गत २२ गावे असून राठोड, धानोरकर, माहुरे, बेग, हे चार ४ लाईनमन आहेत. विशेष म्हणजे येथील अभियंता कावळे हे दोन दिवसापासून सुट्टीवर आहेत. सणासुदीच्या दिवसात ते नसल्यामुळे नागरिकांच्या समस्या निकाली कोण काढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातही ते मुख्यालयी राहत नसून नागपूर वरून ये-जा करीत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पोळ्याचा सण असल्याने गावात दिवसा उत्साहाचे वातावरण असते. पण रात्री ग्रामस्थांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उद्यापर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पोळा काळोखातच साजरा करावा लागणार का असा प्रश्न सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.(शहर प्रतिनिधी)