शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

२९८ सरपंचपदासाठी चार दिवसांत अडीच हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:23 IST

जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून सध्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी आवेदन स्वीकारले जात आहेत.

ठळक मुद्देसदस्यपदांसाठी ९,२०० इच्छुक : आज अखेरचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून सध्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी आवेदन स्वीकारले जात आहेत. शुक्रवारी, ८ मार्चला दुपारी २ वाजेपर्यंत सरपंचपदासाठी २ हजार ४२२ तर ग्रा.पं. सदस्य पदासाठी ९ हजार २०० इच्छुकांनी आपले आवेदन आॅनलाईन पद्धतीने सादर केल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी गुरूवार ७ मार्चपर्यंत सरपंचपदासाठी इच्छुकांचे २१६ तर ग्रा.पं. सदस्यपदासाठी ६१० उमेदवारांचे अर्ज ग्राह्य मानण्यात आले आहेत.वर्धा जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातली असून त्यासाठी आदर्श निवडणूक आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू आहे. जिल्ह्यातील या ग्रा. पं. तील एकूण ९४९ प्रभागातील लोकप्रतिनिधी सदर निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदार निवडून देणार आहेत. सरपंचाची निवड थेट मतदार करणार आहेत. तसेच ही निवडणूक संपताच लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक राहणार असल्याने ग्रामीण भागातील ही निवडणूक विविध राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचीच असल्याचे मानले जात आहे. सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा शनिवार ९ मार्च अखेरचा दिवस असून किती अर्ज येतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.लोकप्रतिनिधींच्या वाहनांची चाके थांबली५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा असून येथे ग्रा.पं. निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. यामुळे जि.प., पं. स. न. प. तील लोकप्रतिनिधींना शासकीय वाहने कुठे न्यावी आणि कुठे नेऊ नये, असे निर्बंध घालण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काळात या लोकप्रतिनिधींच्या शासकीय वाहनाचा प्रवास केवळ शासकीय कार्यालय ते निवासस्थान असाच असणे क्रमप्राप्त आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास फौजदारी व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.आॅनलाईन आवेदनानंतरही सादर करावा लागतो आॅफलाईन अर्जनिवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना सुविधा व्हावी या हेतूने आॅनलाईन आवेदन स्वीकारले जात आहेत. असे असले तरी उमेदवाराने आॅनलाईन आवेदन सादर केल्यानंतरही सदर अर्जाची प्रिंटआऊट तालुका कचेरीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक