शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

२९८ सरपंचपदासाठी चार दिवसांत अडीच हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:23 IST

जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून सध्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी आवेदन स्वीकारले जात आहेत.

ठळक मुद्देसदस्यपदांसाठी ९,२०० इच्छुक : आज अखेरचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून सध्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी आवेदन स्वीकारले जात आहेत. शुक्रवारी, ८ मार्चला दुपारी २ वाजेपर्यंत सरपंचपदासाठी २ हजार ४२२ तर ग्रा.पं. सदस्य पदासाठी ९ हजार २०० इच्छुकांनी आपले आवेदन आॅनलाईन पद्धतीने सादर केल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी गुरूवार ७ मार्चपर्यंत सरपंचपदासाठी इच्छुकांचे २१६ तर ग्रा.पं. सदस्यपदासाठी ६१० उमेदवारांचे अर्ज ग्राह्य मानण्यात आले आहेत.वर्धा जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातली असून त्यासाठी आदर्श निवडणूक आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू आहे. जिल्ह्यातील या ग्रा. पं. तील एकूण ९४९ प्रभागातील लोकप्रतिनिधी सदर निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदार निवडून देणार आहेत. सरपंचाची निवड थेट मतदार करणार आहेत. तसेच ही निवडणूक संपताच लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक राहणार असल्याने ग्रामीण भागातील ही निवडणूक विविध राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचीच असल्याचे मानले जात आहे. सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा शनिवार ९ मार्च अखेरचा दिवस असून किती अर्ज येतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.लोकप्रतिनिधींच्या वाहनांची चाके थांबली५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा असून येथे ग्रा.पं. निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. यामुळे जि.प., पं. स. न. प. तील लोकप्रतिनिधींना शासकीय वाहने कुठे न्यावी आणि कुठे नेऊ नये, असे निर्बंध घालण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काळात या लोकप्रतिनिधींच्या शासकीय वाहनाचा प्रवास केवळ शासकीय कार्यालय ते निवासस्थान असाच असणे क्रमप्राप्त आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास फौजदारी व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.आॅनलाईन आवेदनानंतरही सादर करावा लागतो आॅफलाईन अर्जनिवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना सुविधा व्हावी या हेतूने आॅनलाईन आवेदन स्वीकारले जात आहेत. असे असले तरी उमेदवाराने आॅनलाईन आवेदन सादर केल्यानंतरही सदर अर्जाची प्रिंटआऊट तालुका कचेरीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक