शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:51 IST

शेतांमध्ये टॉवर उभारल्यानंतर दिला जाणारा मोबदला अत्यल्प होता. शिवाय कंत्राटदार मनमानी पद्धतीने तो शेतकऱ्यांना देत होते. याबाबत टॉवर विरोधी कृती समितीने लढा दिला.

ठळक मुद्देशासन निर्णयावर होणार अंमल

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शेतांमध्ये टॉवर उभारल्यानंतर दिला जाणारा मोबदला अत्यल्प होता. शिवाय कंत्राटदार मनमानी पद्धतीने तो शेतकऱ्यांना देत होते. याबाबत टॉवर विरोधी कृती समितीने लढा दिला. त्याला यश आले असून ३१ मे २०१७ रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला दिला जाणार आहे.राज्यात २००८ पासून ४०० केव्ही व त्यापेक्षा अधिक विद्युत वाहिनीची कामे सुरू झाली. ही कामे करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नव्हता. यासाठी टॉवर विरोधी कृती समितीचे राज्य अध्यक्ष मिलिंद पाटील व सरचिटणीस अनिल नागरे यांनी राज्यात टॉवरग्रस्तांना मोबदला मिळावा म्हणून आंदोलने केली. याची दखल घेत उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी मंत्रालयात ४० बैठकी घेतल्या. यावरून राज्य शासनाने परिपत्रक काढत ६६ केव्ही व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अती उच्चदाब पारेषण वाहिणीच्या व्याप्त जागेच्या मोबदल्यात वाढ करणे, वाहिणीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देण्याबाबत धोरण ठरविले; पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. यासाठी संघर्ष केल्याने मोबदला देण्याचे मान्य करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार दुप्पट मोबदला मिळणार आहे. यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकऱ्याने जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावयाचे आहेत. जिल्ह्यात देवळी व वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी टॉवरने व्यापल्या आहेत. देवळी येथे पॉवर ग्रीड असल्याने त्याचे प्रमाण अधिक आहे. या शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदल्यासाठी आता अर्ज करावे लागणार आहेत.३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी होत आहे. यात केवळ ३१ मे २०१७ नंतर उभारण्यात येत असलेल्या टॉवरग्रस्त शेतकºयांना दुप्पट मोबदला दिला जाणार आहे.- पी.बी. अग्रवाल, अभियंता, महावितरण, वर्धा.