शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बारावीत 59 विद्यार्थ्यांमुळे निकालाचे शतक हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही झालीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून ७ हजार ३८१ मुलं आणि ७३३० मुली असे एकूण १४ हजार ७११ विद्यार्थी बारावीत प्रवेशित होते. यापैकीत ७ हजार ३५० मुलं आणि ७ हजार ३०२ मुली असे एकूण १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची टक्केवारी ९९.५९ राहिली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९९.५९ टक्के : परीक्षेविना विद्यार्थ्यांची नेत्रदीपक प्रगती, कोविडमुळे यंदा ऑनलाईन घेतले शिक्षणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाच्या महामारीमुळे परीक्षेविनाही विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. दहावीच्या पाठोपाठ आता बारावीच्या निकालातही विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील १४ हजार ७११ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. केवळ ५९ विद्यार्थी याही काळात अनुत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याच्या निकालाचे शतक हुकले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही झालीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून ७ हजार ३८१ मुलं आणि ७३३० मुली असे एकूण १४ हजार ७११ विद्यार्थी बारावीत प्रवेशित होते. यापैकीत ७ हजार ३५० मुलं आणि ७ हजार ३०२ मुली असे एकूण १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची टक्केवारी ९९.५९ राहिली आहे. गेल्या वर्षी परीक्षा न झाल्याने यावर्षी तरी परीक्षा व्हावी, अशी विद्यार्थ्यांसह पालकांची ईच्छ होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालामुळे उत्तीर्ण होण्याच्या उत्साहावर काहीसे विरजन पडल्याचे चित्र दिसून आले.

निकालाची मूल्यमापन कार्यपद्धती- कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २०२१ साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची बारावीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. २ जुलैच्या शासन निर्णयानुसार मुलांची विषयनिहाय संपादणूक कनिष्ठ महा.मार्फत निश्चित करण्यात आली. विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी शासन निर्णयानुसार निकाल समितीचे गठन करुन त्यांना विषय शिक्षक व वर्ग शिक्षकांनी केलेल्या मूल्यमापनाचे परीक्षण व नियमन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. निकाल समितीचे अंतिम केलेले गुण सीलबंद पाकीटात विभागीय मंडळाकडे जमा करण्यात आले. निकालासाठी दहावी व अकरावीच्या अंतिम गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत विभागीय मंडळाकडे जमा केली.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल