शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
4
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
5
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
6
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
7
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
8
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
9
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
10
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
11
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
12
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
13
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
14
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
15
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
16
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
17
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
18
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
19
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
20
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे

बारावीत 59 विद्यार्थ्यांमुळे निकालाचे शतक हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही झालीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून ७ हजार ३८१ मुलं आणि ७३३० मुली असे एकूण १४ हजार ७११ विद्यार्थी बारावीत प्रवेशित होते. यापैकीत ७ हजार ३५० मुलं आणि ७ हजार ३०२ मुली असे एकूण १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची टक्केवारी ९९.५९ राहिली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९९.५९ टक्के : परीक्षेविना विद्यार्थ्यांची नेत्रदीपक प्रगती, कोविडमुळे यंदा ऑनलाईन घेतले शिक्षणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाच्या महामारीमुळे परीक्षेविनाही विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. दहावीच्या पाठोपाठ आता बारावीच्या निकालातही विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील १४ हजार ७११ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. केवळ ५९ विद्यार्थी याही काळात अनुत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याच्या निकालाचे शतक हुकले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही झालीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून ७ हजार ३८१ मुलं आणि ७३३० मुली असे एकूण १४ हजार ७११ विद्यार्थी बारावीत प्रवेशित होते. यापैकीत ७ हजार ३५० मुलं आणि ७ हजार ३०२ मुली असे एकूण १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची टक्केवारी ९९.५९ राहिली आहे. गेल्या वर्षी परीक्षा न झाल्याने यावर्षी तरी परीक्षा व्हावी, अशी विद्यार्थ्यांसह पालकांची ईच्छ होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालामुळे उत्तीर्ण होण्याच्या उत्साहावर काहीसे विरजन पडल्याचे चित्र दिसून आले.

निकालाची मूल्यमापन कार्यपद्धती- कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २०२१ साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची बारावीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. २ जुलैच्या शासन निर्णयानुसार मुलांची विषयनिहाय संपादणूक कनिष्ठ महा.मार्फत निश्चित करण्यात आली. विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी शासन निर्णयानुसार निकाल समितीचे गठन करुन त्यांना विषय शिक्षक व वर्ग शिक्षकांनी केलेल्या मूल्यमापनाचे परीक्षण व नियमन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. निकाल समितीचे अंतिम केलेले गुण सीलबंद पाकीटात विभागीय मंडळाकडे जमा करण्यात आले. निकालासाठी दहावी व अकरावीच्या अंतिम गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत विभागीय मंडळाकडे जमा केली.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल