शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

दुग्ध व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: May 31, 2014 23:41 IST

अतवृष्टीमुळे खरीप हंगाम गेला तर गारपिटीमुळे रब्बी हंगामही मातीमोल झाला. अशावेळी शेतीला पूरक असणार्‍या दुग्ध व्यवसायावर शेतकरी अवलंबून असायचा. दुग्ध व्यवसाय हा त्यांच्यासाठी जोडधंदा ठरला आहे.

वर्धा : अतवृष्टीमुळे खरीप हंगाम गेला तर गारपिटीमुळे रब्बी हंगामही मातीमोल झाला. अशावेळी शेतीला पूरक असणार्‍या दुग्ध व्यवसायावर शेतकरी अवलंबून असायचा. दुग्ध व्यवसाय हा त्यांच्यासाठी जोडधंदा ठरला आहे. शेतीला पूरक डेअरी व्यवसाय असला तरी बँकांची कर्ज प्रकरणे मंजुरीत असलेल्या उदासीनतेमुळे आता हा व्यवसायसुद्धा डबघाईस आला आहे.शेतकरी  आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना डेअरी क्षेत्रात जोडधंद्यातून आधार देण्यासाठी गाई, म्हशी, शेळ्या खरेदीकरिता जिल्हा ऋण योजनेतून यावर्षी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. वर्ष संपले तरी एकाही राष्ट्रीकृत बँकेत कर्ज प्रकरणे मंजूर नसल्याचे समजते. ठरविल्याप्रमाणे कर्ज प्रकरणे वेळोवेळी मंजूर झाली असती तर जिल्ह्यातील  हजारो नागरिकांना दुधाळ जनावरे मिळून जोडधंदा करता आला असता कर्जाच्या खाईतून बाहेर निघून आत्मनिर्भर होण्याचा मार्ग गवसला असता. जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे. यावरुन शासकीय योजनेचा लाभ जनतेला वेळीच मिळत नसल्याचे  दिसून  येते.  शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेत अपयश आले असताना लोकप्रतिनिधी काय करतात, हा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. जिल्ह्यात कोटयवधी  रुपयांचे कर्ज गाय, म्हशी खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काहीच शाखांनी मोजक्याच केसेस बकर्‍या खरेदीसाठी  केल्या. पण ग्रामीण व राष्ट्रीकृत बँकांनी दोन्ही बाबतीत वर्षभर उदासीन धोरण राबविले आहे.  गरजुंना वर्षभर दुधाळ जनावरांसाठी कर्ज मिळाले नाही. शेतकर्‍यांना जोडधंद्यासाठी कर्जच उपलब्ध होत नसेल तर त्यानी जोडधंदा कसा करावा, हा प्रश्नच आहे. दुधाळ जनावरांसाठी जर शेतकर्‍यांना त्वरित कर्ज उपलब्ध करुन दिले तर त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो. सध्या दुधाचे दर  वाढतच आहे.(शहर प्रतिनिधी)