शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दशकापासून जलशुद्धिकरण केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:02 IST

नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देकोट्यवधीचा खर्च पाण्यात : नागरिकांना अशुद्धच पाणी

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी): नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे.राज्यपाल तथा वर्धेच्या खासदार राहिलेल्या दिवंगत प्रभाताई राव यांच्या काळात कोट्यवधी रुपये खर्च करून गावांत जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले. याकरिता वर्धा नदीवरुन पाईपलाईन टाकण्यात आली. नागरिकांकरिता लाभाची असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आज कुचकामी ठरत आहे. योजना राबविण्याच्या निर्णयाला १५ वर्षे झाली. यात दहा वर्षांपासून ती केवळ शोभेची ठरत आहे.या योजनेचा लाभ गावकऱ्यांना व्हावा याकरिता वर्धा नदीवरुन थेट पाइपलाईन टाकुन गावात पाणी आले. पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता जलशुध्दीकरण केंद्र उभे झाले. परंतु गत दहा वर्षांपासून वर्धा नदीवरुन टाकलेली पाईपलाईन व जलशुध्दीकरण केंद्र बंदच असल्याने नागरिकांना त्याचा कुठलाही लाभ होत नाही. गावकºयांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत असून अप्रमाणीत पाण्याने तहाण भागवावी लागत आहे.इमारतीला तडे आणि यंत्रही झाले जीर्णविरूळ येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या इतमारतीला तडे गेले असून यात्रील यंत्रही आता जुने झाले आहे. यामुळे ते कुचकामी ठरणार आहे. यावर निधी खर्च करणे शक्य नसून गावांत नवे केंद्र लावण्यात यावे अशी मागणी होत आहे.वीज देयकही थकलेया जलशुद्धीकरण केंद्राचे देयक थकल्याने वीज पुरवठ्याचे देयक थकीत आहे. यामुळे पाणी पुरवठा योजना आणि जलशुद्धीकरण योजना बंद आहे. याकरिता ग्रामपंचातीने पुढाकार घेत या दोन्ही योजना सुरु केल्या तर विरूळचा पाणी प्रश्न कायमचा मिटेल. गावात भीषण पाणीटंचाई असून सध्या तब्बल १० दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची पाण्याकरिता पायपीट होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गत दहा वर्षांपासून जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्यामुळे यातील मशनरीज पूर्णपणे खराब झाल्या. जलशुद्धी केंद्राच्या इमारतीला तडे गेल्या असल्यामुळे इमारत जीर्ण झाली आहे. विद्युत बील सुध्दा थकीत असल्यामुळे हे केंद्र सुरू करता येणार नाही. याबाबत नवीन जलशुद्धी केंद्राची मागणी शासनाकडे करणार आहे.- साधना उईके, सरपंच, विरूळ.