शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

दशकापासून जलशुद्धिकरण केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:02 IST

नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देकोट्यवधीचा खर्च पाण्यात : नागरिकांना अशुद्धच पाणी

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी): नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे.राज्यपाल तथा वर्धेच्या खासदार राहिलेल्या दिवंगत प्रभाताई राव यांच्या काळात कोट्यवधी रुपये खर्च करून गावांत जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले. याकरिता वर्धा नदीवरुन पाईपलाईन टाकण्यात आली. नागरिकांकरिता लाभाची असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आज कुचकामी ठरत आहे. योजना राबविण्याच्या निर्णयाला १५ वर्षे झाली. यात दहा वर्षांपासून ती केवळ शोभेची ठरत आहे.या योजनेचा लाभ गावकऱ्यांना व्हावा याकरिता वर्धा नदीवरुन थेट पाइपलाईन टाकुन गावात पाणी आले. पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता जलशुध्दीकरण केंद्र उभे झाले. परंतु गत दहा वर्षांपासून वर्धा नदीवरुन टाकलेली पाईपलाईन व जलशुध्दीकरण केंद्र बंदच असल्याने नागरिकांना त्याचा कुठलाही लाभ होत नाही. गावकºयांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत असून अप्रमाणीत पाण्याने तहाण भागवावी लागत आहे.इमारतीला तडे आणि यंत्रही झाले जीर्णविरूळ येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या इतमारतीला तडे गेले असून यात्रील यंत्रही आता जुने झाले आहे. यामुळे ते कुचकामी ठरणार आहे. यावर निधी खर्च करणे शक्य नसून गावांत नवे केंद्र लावण्यात यावे अशी मागणी होत आहे.वीज देयकही थकलेया जलशुद्धीकरण केंद्राचे देयक थकल्याने वीज पुरवठ्याचे देयक थकीत आहे. यामुळे पाणी पुरवठा योजना आणि जलशुद्धीकरण योजना बंद आहे. याकरिता ग्रामपंचातीने पुढाकार घेत या दोन्ही योजना सुरु केल्या तर विरूळचा पाणी प्रश्न कायमचा मिटेल. गावात भीषण पाणीटंचाई असून सध्या तब्बल १० दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची पाण्याकरिता पायपीट होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गत दहा वर्षांपासून जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्यामुळे यातील मशनरीज पूर्णपणे खराब झाल्या. जलशुद्धी केंद्राच्या इमारतीला तडे गेल्या असल्यामुळे इमारत जीर्ण झाली आहे. विद्युत बील सुध्दा थकीत असल्यामुळे हे केंद्र सुरू करता येणार नाही. याबाबत नवीन जलशुद्धी केंद्राची मागणी शासनाकडे करणार आहे.- साधना उईके, सरपंच, विरूळ.