शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

दशकापासून जलशुद्धिकरण केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:02 IST

नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देकोट्यवधीचा खर्च पाण्यात : नागरिकांना अशुद्धच पाणी

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी): नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे.राज्यपाल तथा वर्धेच्या खासदार राहिलेल्या दिवंगत प्रभाताई राव यांच्या काळात कोट्यवधी रुपये खर्च करून गावांत जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले. याकरिता वर्धा नदीवरुन पाईपलाईन टाकण्यात आली. नागरिकांकरिता लाभाची असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आज कुचकामी ठरत आहे. योजना राबविण्याच्या निर्णयाला १५ वर्षे झाली. यात दहा वर्षांपासून ती केवळ शोभेची ठरत आहे.या योजनेचा लाभ गावकऱ्यांना व्हावा याकरिता वर्धा नदीवरुन थेट पाइपलाईन टाकुन गावात पाणी आले. पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता जलशुध्दीकरण केंद्र उभे झाले. परंतु गत दहा वर्षांपासून वर्धा नदीवरुन टाकलेली पाईपलाईन व जलशुध्दीकरण केंद्र बंदच असल्याने नागरिकांना त्याचा कुठलाही लाभ होत नाही. गावकºयांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत असून अप्रमाणीत पाण्याने तहाण भागवावी लागत आहे.इमारतीला तडे आणि यंत्रही झाले जीर्णविरूळ येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या इतमारतीला तडे गेले असून यात्रील यंत्रही आता जुने झाले आहे. यामुळे ते कुचकामी ठरणार आहे. यावर निधी खर्च करणे शक्य नसून गावांत नवे केंद्र लावण्यात यावे अशी मागणी होत आहे.वीज देयकही थकलेया जलशुद्धीकरण केंद्राचे देयक थकल्याने वीज पुरवठ्याचे देयक थकीत आहे. यामुळे पाणी पुरवठा योजना आणि जलशुद्धीकरण योजना बंद आहे. याकरिता ग्रामपंचातीने पुढाकार घेत या दोन्ही योजना सुरु केल्या तर विरूळचा पाणी प्रश्न कायमचा मिटेल. गावात भीषण पाणीटंचाई असून सध्या तब्बल १० दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची पाण्याकरिता पायपीट होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गत दहा वर्षांपासून जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्यामुळे यातील मशनरीज पूर्णपणे खराब झाल्या. जलशुद्धी केंद्राच्या इमारतीला तडे गेल्या असल्यामुळे इमारत जीर्ण झाली आहे. विद्युत बील सुध्दा थकीत असल्यामुळे हे केंद्र सुरू करता येणार नाही. याबाबत नवीन जलशुद्धी केंद्राची मागणी शासनाकडे करणार आहे.- साधना उईके, सरपंच, विरूळ.