शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासून ट्रान्सफार्मर बंद

By admin | Updated: April 29, 2015 01:54 IST

विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़

आष्टी (शहीद) : विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ तालुक्यातील आनंदवाडी गावातील ट्रान्सफार्मर गत १५ दिवसांपासून बंद आहे़ यामुळे गावात कमी होल्टेजचा प्रश्न गंभीर झाला आहे़ कमी-अधिक विजेच्या दाबामुळे घरगुती उपकरण जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली; पण जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे़सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हापासून संरक्षणासाठी कुलर लावावे लागत आहेत; पण विजेच्या कमी-अधिक प्रवाहामुळे कुलरच्या मोटारी जळत आहेत़ अनेकांच्या घरातील फ्रीजचे कॉम्प्रेसर जळाले़ विहिरीवरील विद्युत पंपाबाबतही प्रश्न गंभीर झाला आहे़ गावातील पाणी प्रश्नानेही गंभीर रूप धारण केले आहे़ मुबलक जलसाठा उपलब्ध असताना जळालेल्या मोटरमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ परिणामी, नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ विजेची उपकरणे महागडी असल्याने ती वारंवार दुरूस्ती करणे, ही परवडणारी बाब नाही़ यामुळे वीज कंपनीवर संताप व्यक्त केला जात आहे़गत १५ दिवसांत गावातील ३० कुलरच्या मोटर, १२ विहिरींवरील मोटारी जळाल्या आहेत़ शिवाय ६० पंख्यांच्या मोटारीही जळाल्यात़ विजेच्या कमी-अधिक दाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असताना अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत़ याबाबत गावातील सागर कळसकर यांच्यासह नागरिकांनी वीज कंपनीला माहिती दिली़ कंपनीचे अधिकारी मात्र एकमेकांकडे बोट दाखवून वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचे दिसते़ यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ वीज कंपनीचे अभियंते सतत गैरहजर असतात़ सिंचनाच्या विहिरींची वीज जोडणी करून देण्यासही टाळाटाळ केली जात आहे़ यामुळे नागरिकांनी उपोषण करण्याचा मानसही व्यक्त केला़ गावात विजेच्या ताराही ठिकठिकाणी लोंबकळलेल्या दिसतात़ नागरिक तसेच लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे़ बाभळीच्या झाडाला लागून वाहिन्या असल्याने कुठल्याही क्षणी संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही़ याप्रकरणी वरिष्ठांना निवेदन पाठविले असून काय कारवाई होते, याकडे सर्र्वांचे लक्ष लागले आहे़(प्रतिनिधी)