शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

१५ दिवसांपासून ट्रान्सफार्मर बंद

By admin | Updated: April 29, 2015 01:54 IST

विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़

आष्टी (शहीद) : विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ तालुक्यातील आनंदवाडी गावातील ट्रान्सफार्मर गत १५ दिवसांपासून बंद आहे़ यामुळे गावात कमी होल्टेजचा प्रश्न गंभीर झाला आहे़ कमी-अधिक विजेच्या दाबामुळे घरगुती उपकरण जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली; पण जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे़सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हापासून संरक्षणासाठी कुलर लावावे लागत आहेत; पण विजेच्या कमी-अधिक प्रवाहामुळे कुलरच्या मोटारी जळत आहेत़ अनेकांच्या घरातील फ्रीजचे कॉम्प्रेसर जळाले़ विहिरीवरील विद्युत पंपाबाबतही प्रश्न गंभीर झाला आहे़ गावातील पाणी प्रश्नानेही गंभीर रूप धारण केले आहे़ मुबलक जलसाठा उपलब्ध असताना जळालेल्या मोटरमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ परिणामी, नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ विजेची उपकरणे महागडी असल्याने ती वारंवार दुरूस्ती करणे, ही परवडणारी बाब नाही़ यामुळे वीज कंपनीवर संताप व्यक्त केला जात आहे़गत १५ दिवसांत गावातील ३० कुलरच्या मोटर, १२ विहिरींवरील मोटारी जळाल्या आहेत़ शिवाय ६० पंख्यांच्या मोटारीही जळाल्यात़ विजेच्या कमी-अधिक दाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असताना अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत़ याबाबत गावातील सागर कळसकर यांच्यासह नागरिकांनी वीज कंपनीला माहिती दिली़ कंपनीचे अधिकारी मात्र एकमेकांकडे बोट दाखवून वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचे दिसते़ यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ वीज कंपनीचे अभियंते सतत गैरहजर असतात़ सिंचनाच्या विहिरींची वीज जोडणी करून देण्यासही टाळाटाळ केली जात आहे़ यामुळे नागरिकांनी उपोषण करण्याचा मानसही व्यक्त केला़ गावात विजेच्या ताराही ठिकठिकाणी लोंबकळलेल्या दिसतात़ नागरिक तसेच लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे़ बाभळीच्या झाडाला लागून वाहिन्या असल्याने कुठल्याही क्षणी संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही़ याप्रकरणी वरिष्ठांना निवेदन पाठविले असून काय कारवाई होते, याकडे सर्र्वांचे लक्ष लागले आहे़(प्रतिनिधी)