शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कर्ज वसुली बंद करा

By admin | Updated: March 22, 2017 00:57 IST

तालुक्यातील शेतकरी मागील ४ वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात अडकले असतांना बॅकेमार्फत कर्ज वसुली सुरू आहे.

निखिल कडू यांची निवेदनातून मागणी आर्वी : तालुक्यातील शेतकरी मागील ४ वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात अडकले असतांना बॅकेमार्फत कर्ज वसुली सुरू आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आणि कधी गारपिटीने शेतकऱ्यांचे कमरडे मोडले आहे. शेती उभारण्याकरीता तसेच शेती पुरक साधन खरेदी करीता बँकेकडून घेतलेल्या कजार्ची परतफेड करणे शेतक-यांना आजच्या घडीला शक्य नाही. आर्थिक अडचणीने शेतक-यांना जिवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सक्तीने सुरू असलेली कर्ज वसूली तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक आहे. बँकेकडून कर्ज भरण्यासाठी तगादा लावल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. शेतीकरीता कर्ज घेऊन घेतलेले ट्रॅक्टर आदी साहित्य जप्त करणे सुरू आहे. विविध बँका कर्जवसुलीकरिता शेतकऱ्यांना धारेवर धरत आहेत. यात महाराष्ट्र बँक पुढे आहे. शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त उपजिविकेसाठी कुठलाही दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यातूनच ते मुलांचे शिक्षण, मुला-मुलींची लग्न, कुटुंबाचे पालनपोषण करतात. सध्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कुटुबाचे पालन-पोषण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्ज वसुली बाबत जर बॅकेचे असेच धोरण असेल तर शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्नदात्यालाच बँकेकडून कर्जवसूलीकरिता नाहक त्रास दिल्या जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून बँकेमार्फत शेतकऱ्याची कर्ज वसुली तात्काळ बंद करावी, अशी मागणी सर्कसपूरचे उपसरपंच तथा भाजपा पदाधिकारी निखिल कडू यांनी निवेदनातून केली आहे. मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून करण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)