शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

कर्ज वसुली बंद करा

By admin | Updated: March 22, 2017 00:57 IST

तालुक्यातील शेतकरी मागील ४ वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात अडकले असतांना बॅकेमार्फत कर्ज वसुली सुरू आहे.

निखिल कडू यांची निवेदनातून मागणी आर्वी : तालुक्यातील शेतकरी मागील ४ वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात अडकले असतांना बॅकेमार्फत कर्ज वसुली सुरू आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आणि कधी गारपिटीने शेतकऱ्यांचे कमरडे मोडले आहे. शेती उभारण्याकरीता तसेच शेती पुरक साधन खरेदी करीता बँकेकडून घेतलेल्या कजार्ची परतफेड करणे शेतक-यांना आजच्या घडीला शक्य नाही. आर्थिक अडचणीने शेतक-यांना जिवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सक्तीने सुरू असलेली कर्ज वसूली तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक आहे. बँकेकडून कर्ज भरण्यासाठी तगादा लावल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. शेतीकरीता कर्ज घेऊन घेतलेले ट्रॅक्टर आदी साहित्य जप्त करणे सुरू आहे. विविध बँका कर्जवसुलीकरिता शेतकऱ्यांना धारेवर धरत आहेत. यात महाराष्ट्र बँक पुढे आहे. शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त उपजिविकेसाठी कुठलाही दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यातूनच ते मुलांचे शिक्षण, मुला-मुलींची लग्न, कुटुंबाचे पालनपोषण करतात. सध्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कुटुबाचे पालन-पोषण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्ज वसुली बाबत जर बॅकेचे असेच धोरण असेल तर शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्नदात्यालाच बँकेकडून कर्जवसूलीकरिता नाहक त्रास दिल्या जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून बँकेमार्फत शेतकऱ्याची कर्ज वसुली तात्काळ बंद करावी, अशी मागणी सर्कसपूरचे उपसरपंच तथा भाजपा पदाधिकारी निखिल कडू यांनी निवेदनातून केली आहे. मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून करण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)