शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

कर्ज वसुली बंद करा

By admin | Updated: March 22, 2017 00:57 IST

तालुक्यातील शेतकरी मागील ४ वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात अडकले असतांना बॅकेमार्फत कर्ज वसुली सुरू आहे.

निखिल कडू यांची निवेदनातून मागणी आर्वी : तालुक्यातील शेतकरी मागील ४ वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात अडकले असतांना बॅकेमार्फत कर्ज वसुली सुरू आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आणि कधी गारपिटीने शेतकऱ्यांचे कमरडे मोडले आहे. शेती उभारण्याकरीता तसेच शेती पुरक साधन खरेदी करीता बँकेकडून घेतलेल्या कजार्ची परतफेड करणे शेतक-यांना आजच्या घडीला शक्य नाही. आर्थिक अडचणीने शेतक-यांना जिवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सक्तीने सुरू असलेली कर्ज वसूली तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक आहे. बँकेकडून कर्ज भरण्यासाठी तगादा लावल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. शेतीकरीता कर्ज घेऊन घेतलेले ट्रॅक्टर आदी साहित्य जप्त करणे सुरू आहे. विविध बँका कर्जवसुलीकरिता शेतकऱ्यांना धारेवर धरत आहेत. यात महाराष्ट्र बँक पुढे आहे. शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त उपजिविकेसाठी कुठलाही दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यातूनच ते मुलांचे शिक्षण, मुला-मुलींची लग्न, कुटुंबाचे पालनपोषण करतात. सध्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कुटुबाचे पालन-पोषण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्ज वसुली बाबत जर बॅकेचे असेच धोरण असेल तर शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्नदात्यालाच बँकेकडून कर्जवसूलीकरिता नाहक त्रास दिल्या जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून बँकेमार्फत शेतकऱ्याची कर्ज वसुली तात्काळ बंद करावी, अशी मागणी सर्कसपूरचे उपसरपंच तथा भाजपा पदाधिकारी निखिल कडू यांनी निवेदनातून केली आहे. मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून करण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)