शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

तूर विके्रत्या शेतकऱ्यांना लवकरच चुकारे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:58 IST

जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांचे कोट्यावधीचे चुकारे थकले आहेत. चुकारे नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, .....

ठळक मुद्देदेशमुख यांची मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांचे कोट्यावधीचे चुकारे थकले आहेत. चुकारे नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांनी मुंबई येथे मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापक कल्याण कानडे यांना निवेदनातून केली.यंदा निसर्गाच्या माºयासह शासकीय नियमांच्या पेचात बळीराजा सापडला आहे. पिकांवर झालेल्या रोगांमुळे व आता निघालेल्या पिकाच्या मोबदल्यासाठी त्याची भटकंती सुरू आहे. शासनाने शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे या भरपूर जाहीर केले. परंतु, शेतकºयांचा सातबारा अद्यापही कर्जमुक्त झाला नाही. यामुळे तो नव्या कर्जापासून वंचित आहे. त्याच्यावर सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. कसेबसे त्याने पीक घेतले असता त्याला त्यांच्याच पिकाचा मोबदला मिळण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. हा प्रकार निंदनिय आहे. आर्वी येथून एकूण १ हजार ८९०, आष्टी येथून ८२६ व कारंजा येथून १ हजार ५८८ शेतकºयांनी नाफेड करीता नोंदणी केलेली असून अजूनपर्यंत जवळपास आर्वी तालुक्यातील १ हजार २०० आष्टी तालुक्यातील ५२६ व कारंजा तालुक्यातील ४४७ शेतकºयांना चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या शेतकºयांच्या प्रश्नांना तात्काळ सोडविण्यात यावे, या मागणीकरिता निलेश देशमुख यांनी थेट मुंबई गाठली. त्यांनी मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापक कल्याण कानडे यांची भेट घेत त्यांना संपूर्ण प्रकार समजावून सांगितला. शेतकºयांच्या विकलेल्या तुरीचे देयक तत्काळ अदा करावा, अशा मागणीचे निवेदनही दिले. त्यावर कानडे यांनी शेतकºयांना त्याच्या शेतमालाचे देयक येत्या ४ ते ५ दिवसाच्या आत देण्यात येईल असे आश्वासन दिले.