शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

तूर विके्रत्या शेतकऱ्यांना लवकरच चुकारे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:58 IST

जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांचे कोट्यावधीचे चुकारे थकले आहेत. चुकारे नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, .....

ठळक मुद्देदेशमुख यांची मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांचे कोट्यावधीचे चुकारे थकले आहेत. चुकारे नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांनी मुंबई येथे मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापक कल्याण कानडे यांना निवेदनातून केली.यंदा निसर्गाच्या माºयासह शासकीय नियमांच्या पेचात बळीराजा सापडला आहे. पिकांवर झालेल्या रोगांमुळे व आता निघालेल्या पिकाच्या मोबदल्यासाठी त्याची भटकंती सुरू आहे. शासनाने शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे या भरपूर जाहीर केले. परंतु, शेतकºयांचा सातबारा अद्यापही कर्जमुक्त झाला नाही. यामुळे तो नव्या कर्जापासून वंचित आहे. त्याच्यावर सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. कसेबसे त्याने पीक घेतले असता त्याला त्यांच्याच पिकाचा मोबदला मिळण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. हा प्रकार निंदनिय आहे. आर्वी येथून एकूण १ हजार ८९०, आष्टी येथून ८२६ व कारंजा येथून १ हजार ५८८ शेतकºयांनी नाफेड करीता नोंदणी केलेली असून अजूनपर्यंत जवळपास आर्वी तालुक्यातील १ हजार २०० आष्टी तालुक्यातील ५२६ व कारंजा तालुक्यातील ४४७ शेतकºयांना चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या शेतकºयांच्या प्रश्नांना तात्काळ सोडविण्यात यावे, या मागणीकरिता निलेश देशमुख यांनी थेट मुंबई गाठली. त्यांनी मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापक कल्याण कानडे यांची भेट घेत त्यांना संपूर्ण प्रकार समजावून सांगितला. शेतकºयांच्या विकलेल्या तुरीचे देयक तत्काळ अदा करावा, अशा मागणीचे निवेदनही दिले. त्यावर कानडे यांनी शेतकºयांना त्याच्या शेतमालाचे देयक येत्या ४ ते ५ दिवसाच्या आत देण्यात येईल असे आश्वासन दिले.