शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तूर विके्रत्या शेतकऱ्यांना लवकरच चुकारे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:58 IST

जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांचे कोट्यावधीचे चुकारे थकले आहेत. चुकारे नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, .....

ठळक मुद्देदेशमुख यांची मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांचे कोट्यावधीचे चुकारे थकले आहेत. चुकारे नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांनी मुंबई येथे मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापक कल्याण कानडे यांना निवेदनातून केली.यंदा निसर्गाच्या माºयासह शासकीय नियमांच्या पेचात बळीराजा सापडला आहे. पिकांवर झालेल्या रोगांमुळे व आता निघालेल्या पिकाच्या मोबदल्यासाठी त्याची भटकंती सुरू आहे. शासनाने शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे या भरपूर जाहीर केले. परंतु, शेतकºयांचा सातबारा अद्यापही कर्जमुक्त झाला नाही. यामुळे तो नव्या कर्जापासून वंचित आहे. त्याच्यावर सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. कसेबसे त्याने पीक घेतले असता त्याला त्यांच्याच पिकाचा मोबदला मिळण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. हा प्रकार निंदनिय आहे. आर्वी येथून एकूण १ हजार ८९०, आष्टी येथून ८२६ व कारंजा येथून १ हजार ५८८ शेतकºयांनी नाफेड करीता नोंदणी केलेली असून अजूनपर्यंत जवळपास आर्वी तालुक्यातील १ हजार २०० आष्टी तालुक्यातील ५२६ व कारंजा तालुक्यातील ४४७ शेतकºयांना चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या शेतकºयांच्या प्रश्नांना तात्काळ सोडविण्यात यावे, या मागणीकरिता निलेश देशमुख यांनी थेट मुंबई गाठली. त्यांनी मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापक कल्याण कानडे यांची भेट घेत त्यांना संपूर्ण प्रकार समजावून सांगितला. शेतकºयांच्या विकलेल्या तुरीचे देयक तत्काळ अदा करावा, अशा मागणीचे निवेदनही दिले. त्यावर कानडे यांनी शेतकºयांना त्याच्या शेतमालाचे देयक येत्या ४ ते ५ दिवसाच्या आत देण्यात येईल असे आश्वासन दिले.