शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तुलसी,राशी कंपनीच्या वाणावर सर्वाधिक बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:38 IST

आर्वी तालुक्यातील हरदोली, रसुलाबाद, पिंपळगाव, माळेगाव (ठेका) आदी शेतशिवारातील कपाशी पिकावर सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा शासनाकडे अहवाल रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्यातील हरदोली, रसुलाबाद, पिंपळगाव, माळेगाव (ठेका) आदी शेतशिवारातील कपाशी पिकावर सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. विशेष म्हणजे गुलाबी बोंडअळी तुलसी आणि राशी कंपनीच्या कपाशीच्या वाणावर आढळून आला असून तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात कपाशी पिकाचे नियोजन एकूण २,३५,५०० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आले. तर जिल्ह्यात पिकाचे सरासरी क्षेत्र २,०४,२०३ हेक्टर असून सध्यास्थितीत एकूण २,३४,९५७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नियोजनाच्या क्षेत्राच्या तुलनेत ११५.०६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे तुरळक क्षेत्रामध्ये कपाशी पीक लाल-पिवळे पडत आहे. तर आर्वी तालुक्यातील हरदोली, रसुलाबाद, पिंपळगाव, माळेगाव (ठेका) शेतशिवारातील तुलसी व राशी या कंपनीच्या कपाशीच्या वाणावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला वेळीच आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे, अशा सूचना शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने गावतापळीवर दिल्या जात आहे. विशेष म्हणजे तुलसी व राशी कंपनीच्या कपाशीच्या पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाकडे पाठविला आहे.शिवाय सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. मात्र, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सेलू तालुक्यातील धपकी, देवळी तालुक्यातील हुरदनपूर व आर्वी तालुक्यातील माळेगाव (ठेका) शेतशिवारातील सोयाबीन पिकावर उंटअळी दिसून आल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.मागील दोन वर्षे गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर टाकली. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले. त्यामुळे आर्थिक फटकाच कपाशी उत्पादकांना सहन करावा लागला होता. मात्र हंगामाच्या शेवटी शासनाने नुकसानग्रस्तांना तोकडी मदत दिली. तर अनेक नुकसानग्रस्तांना अद्यापही शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.कामगंध सापळे ठरणार फायद्याचेसततच्या पावसामुळे कपाशी पीक लाल-पिवळे पडत असल्याने शेतकºयांनी शेतातील पाणी बाहेर कसे काढता येईल यासाठी प्रयत्न करावे.शिवाय मलुल झालेल्या झाडांच्या बुडात २ ते ३ ग्रॅम युरीया द्यावा. कपाशीचे झाड पायाच्या बोटात धरून दाबावे.कॉपर आॅक्सिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक १५० गॅ्रम युरिया व १५० ग्रॅम पोटॅश प्रती लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण प्रती झाड १५० ते १५० मि.ली ड्रेनचिंग करून द्यावे. याच द्रावणाची पिकावर फवारणी केल्यास ते फायद्याचे ठरणारे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे शेतकºयांनी शेतात लावावे, असेही सांगण्यात आले.३४ शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना दिली जातेय इत्थंभूत माहितीजिल्ह्यात तूर पीक कपाशी व सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून घेण्यात येते. सध्यास्थितीत जिल्ह्यात एकूण ५९,४९४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. नियोजनाच्या ९१.५३ टक्के क्षेत्रावर झाली असून सरासरीच्या तुलनेत ७९.७८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्यास्थितीत पीक वाढीव अवस्थेत असून पिकाचे उत्पादन वाढ, कीड व रोग व्यवस्थानाबाबत एकूण ३४ शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना इत्तमभूत माहिती दिली जात आहे.सोयाबीनवर हिरवी-करडी उंटअळीचा हल्लासध्यास्थितीत जिल्ह्यात एकूण १,०७,२२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. नियोजनाच्या क्षेत्राच्या तुलनेत ८५.६१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर सरासरीच्या तुलनेत ६८.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून सध्या सोयाबीन पीक वाढीव अवस्थेत आहे. शिवाय पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. मात्र, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सेलू तालुक्यातील धपकी, देवळी तालुक्यातील हुरदनपूर आणि आर्वी तालुक्यातील माळेगाव (ठेका) शेतशिवारातील सोयाबीन पिकावर उंटअळी दिसून आली आहे.पक्षीथांबे ठरणार उपयुक्तउंटअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकºयांनी शेतात पक्षीथांबे लावल्यास पक्षी ही अळी फस्त करेल. त्यामुळे उंटअळीला अटकाव घालता येता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करता येते. किडीचे आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास (सरासरी ४ अळ्या प्रती मिटर ओळ) नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ४० टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी पानाच्या खालच्या बाजूने केल्यास त्याचे परिणाम उत्कृष्ट मिळत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती