शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मंगल कार्यालय झाले डोकेदुखी

By admin | Updated: June 1, 2015 02:25 IST

शहरातील मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर दिवसभर थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते.

सुधीर खडसे  समुद्रपूरशहरातील मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर दिवसभर थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. बँड, डीजे, फटाक्यांचे कर्णकर्कश आवाज व उघड्यावर टाकलेल्या उष्ट्या अन्नामुळे दुर्गंधी पसरली आहे. हा प्रकार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. समुद्रपूर ते उमरेड मार्गावर प्राध्यापक कॉलनीत सदर मंगल कार्यालय आहे. येथे दररोज होणारे लग्नसोहळे परिसरातील नागरिकांना मनस्ताप देणारे ठरत आहे. कार्यालयासमोर वाहनांची पार्कींग व्यवस्था नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच दुचाकी, चारचाकी वाहनांची रांग लागते. यामुळे वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होतो. नवरदेवाच्या वरातीसोबत बँडवर नाचणारे मद्यधुंद टोळके वाहतुकीचे सारेच नियम धाब्यावर बसवितात. अनेकदा नाचता-नाचता गावातील ज्येष्ठ नागरिकांशी असभ्य वर्तन करून मारामारीपर्यंत प्रकरणे जातात; पण वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसते. वाहतुकीचा पचका, अन्नाची दुर्गंधी आणि दररोज होणारी भांडणे या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील अन्य भागातील मंगल कार्यालयेही नागरिकांकरिता डोकेदुखीच ठरत आहे. तालुका प्रशासनासह पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देत संबंधित सभागृहाच्या मालकांसह संबंधितांना समज देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.