शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

११५ ग्रंथालयातून पुस्तके हाताळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:42 IST

इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या या काळात पुस्तक वाचनाची आवड कमी होत आहे. यामुळे पुस्तके हाताळणारे हात कमी होत आहे. हे हात वाचविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील ११५ ग्रंथालयातून सुरू आहे.

ठळक मुद्देजागतिक पुस्तक दिन : बौद्धिक विकासाकरिता वाचनाशिवाय पर्याय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या या काळात पुस्तक वाचनाची आवड कमी होत आहे. यामुळे पुस्तके हाताळणारे हात कमी होत आहे. हे हात वाचविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील ११५ ग्रंथालयातून सुरू आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो वा महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद प्रत्येकाने त्यांच्या जीवनात पुस्तक वाचनाला महत्त्व दिले. बाबासाहेबांनी तर दिसेल तिथे आवडीचे पुस्तक विकत घेवून ते वाचण्याचा सल्ला दिला. वाचनातून बौद्धीक उत्कर्ष होतो. हीच पुस्तके या महान विभूतींच्या जडण घडणात महत्त्वाची ठरली. त्यांचा हाच वैचारीक वसा पुस्तकातून जपण्याचा प्रयत्न करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.आजचा युवक त्याच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तके हाताळताना दिसत नाही. ज्यांच्याकडून स्पर्धा परीक्षांची तयारी होत आहे तेच केवळ ग्रंथालयात जावून तेवढी पुस्तके हाताळताना दिसतात. इतरांचे हात मात्र इंटरनेट आणि सोशल मिडीयावरच व्यस्त असल्याचे दिसत आहे.यामुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. या गरजेपोटी जिल्ह्यात सचीन सावरकर नामक एका प्राध्यापकाच्या माध्यमातून ‘पुस्तकदोस्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यांच्या अभियानातून उन्हाळ्याच्या सुट्यांत घरोघरी फिरून चिमुकल्यांना इतिहासात मोलाचा वाट असणाऱ्या अनेक महात्म्यांची माहिती देणारी पुस्तके देण्यात येत आहेत. निदान यातून काहींना वाचनाची आवड निर्माण होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.मागेल त्याला वाचनालय योजना बंदशासनाच्यावतीने मागेल त्याला वाचनालय ही योजना सुरू केली होती. ती योजना नव्या शासनाने बंद केली आहे. यामुळे वाचणालयाची संख्या कायम आहे.राज्यात आजच्या घडीला १२ हजार ५०० ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांची वाचनाची भूक भाबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागात जर ग्रंथालय निर्माण झाले तर काही ना काही प्रमाणात वाचकांच्या संख्येत वाढ होईल.‘पुस्तकदोस्ती’तून आतापर्यंत ३००० पुस्तकांचे वाटपवाचन संस्कृती टिकावी आणि चिमुकल्यांना पुस्तके हाताळण्याची सवय व्हावी याकरिता जिल्ह्यात ‘पुस्तकदोस्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातून जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजारावर पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. जेणेकरून त्यांची पुस्तकाशी दोस्ती होईल, असा त्यांचा उद्देश आहे.दोन ग्रंथालये १०० वर्षांपेक्षाही जुनीजिल्ह्यातील वाचकांच्या सेवेत असलेले वर्धेतील सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय व आर्वी येथील लोकमान्य वाचनालयाला शंभर वर्षांपेंक्षा अधिक काळ झाला आहे.