शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

११५ ग्रंथालयातून पुस्तके हाताळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:42 IST

इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या या काळात पुस्तक वाचनाची आवड कमी होत आहे. यामुळे पुस्तके हाताळणारे हात कमी होत आहे. हे हात वाचविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील ११५ ग्रंथालयातून सुरू आहे.

ठळक मुद्देजागतिक पुस्तक दिन : बौद्धिक विकासाकरिता वाचनाशिवाय पर्याय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या या काळात पुस्तक वाचनाची आवड कमी होत आहे. यामुळे पुस्तके हाताळणारे हात कमी होत आहे. हे हात वाचविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील ११५ ग्रंथालयातून सुरू आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो वा महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद प्रत्येकाने त्यांच्या जीवनात पुस्तक वाचनाला महत्त्व दिले. बाबासाहेबांनी तर दिसेल तिथे आवडीचे पुस्तक विकत घेवून ते वाचण्याचा सल्ला दिला. वाचनातून बौद्धीक उत्कर्ष होतो. हीच पुस्तके या महान विभूतींच्या जडण घडणात महत्त्वाची ठरली. त्यांचा हाच वैचारीक वसा पुस्तकातून जपण्याचा प्रयत्न करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.आजचा युवक त्याच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तके हाताळताना दिसत नाही. ज्यांच्याकडून स्पर्धा परीक्षांची तयारी होत आहे तेच केवळ ग्रंथालयात जावून तेवढी पुस्तके हाताळताना दिसतात. इतरांचे हात मात्र इंटरनेट आणि सोशल मिडीयावरच व्यस्त असल्याचे दिसत आहे.यामुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. या गरजेपोटी जिल्ह्यात सचीन सावरकर नामक एका प्राध्यापकाच्या माध्यमातून ‘पुस्तकदोस्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यांच्या अभियानातून उन्हाळ्याच्या सुट्यांत घरोघरी फिरून चिमुकल्यांना इतिहासात मोलाचा वाट असणाऱ्या अनेक महात्म्यांची माहिती देणारी पुस्तके देण्यात येत आहेत. निदान यातून काहींना वाचनाची आवड निर्माण होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.मागेल त्याला वाचनालय योजना बंदशासनाच्यावतीने मागेल त्याला वाचनालय ही योजना सुरू केली होती. ती योजना नव्या शासनाने बंद केली आहे. यामुळे वाचणालयाची संख्या कायम आहे.राज्यात आजच्या घडीला १२ हजार ५०० ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांची वाचनाची भूक भाबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागात जर ग्रंथालय निर्माण झाले तर काही ना काही प्रमाणात वाचकांच्या संख्येत वाढ होईल.‘पुस्तकदोस्ती’तून आतापर्यंत ३००० पुस्तकांचे वाटपवाचन संस्कृती टिकावी आणि चिमुकल्यांना पुस्तके हाताळण्याची सवय व्हावी याकरिता जिल्ह्यात ‘पुस्तकदोस्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातून जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजारावर पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. जेणेकरून त्यांची पुस्तकाशी दोस्ती होईल, असा त्यांचा उद्देश आहे.दोन ग्रंथालये १०० वर्षांपेक्षाही जुनीजिल्ह्यातील वाचकांच्या सेवेत असलेले वर्धेतील सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय व आर्वी येथील लोकमान्य वाचनालयाला शंभर वर्षांपेंक्षा अधिक काळ झाला आहे.