शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

तक्रारकर्त्याला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 20:20 IST

वरिष्ठांकडे तक्रार होताच बोरगाव गोंडी येथील वनरक्षकाने प्रगतिशील शेतकरी व खरांगणा विशाल सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष मेघराज पेठे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. यात खोटी माहिती देऊन महावितरणचीही फसगत केली.

ठळक मुद्देवनरक्षकाची सूडबुद्धी : जंगलातील हाडे शेतात टाकली

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : वरिष्ठांकडे तक्रार होताच बोरगाव गोंडी येथील वनरक्षकाने प्रगतिशील शेतकरी व खरांगणा विशाल सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष मेघराज पेठे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. यात खोटी माहिती देऊन महावितरणचीही फसगत केली.वनरक्षक मनीष सज्जन मुख्यालयी राहत नाहीत. ग्रामस्थांना असभ्य वागणूक देतात. वृक्षलागवडीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नुकतीच ग्रामस्थांनी वनमंत्री व उपवनसंरक्षक यांच्याकडे केली. यानंतर सहाय्यक उपवनसंरक्षक यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश धडकले. त्यामुळे खवळलेल्या वनरक्षकाने प्रगतिशील शेतकरी पेठे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला.महावितरणला खोटी माहिती देत शेतकऱ्याने तारावर हूक टाकून कुंपणात वीजप्रवाह सोडला व यात तीन रानडुक्कर ठार झाल्याची माहिती दिली. याविषयी माहिती मिळताच रात्री १० वाजता खरांगणा येथील कनिष्ठ अभियंता चैतन्य देशपांडे यांनी दहा कर्मचाºयांसह बोरगाव गोंडी गाठले. शेतात बारकाईने चौकशी केली, पण कुठेही काहीच आढळले नाही. त्यामुळे फसगत झाली, असे समजून ते परत गेले. लागलीच त्यांनी वनरक्षकाला शेतात कोणताही प्राणी मृतावस्थेत न आढळल्याचे कळविले. सूडबुद्धीने पेटलेल्या वनरक्षकाने जंगलातील मृत प्राण्यांचे अवशेष गोळा करून ते सहकाºयांसह पेठे यांच्या शेतात जात मातीत विखुरले व तेच अवशेष पुन्हा कापडात गुंडाळून शेताबाहेर आणून उघड्यावर त्याचा बाजार मांडून फोटो सेशन केले. चूक आपल्या अंगलट येत असल्याचे पाहून त्याने काहीही करून तक्रारदाराला फसविण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी त्याला विरोध केला.घटनेतील शेतक-याचे शेत बोरगाव गोंडी-सुसूंद रस्त्यावर असून संपूर्ण शेताला ताराच्या जाळीचे कुंपण आहे. जाळीतून उंदीरसुद्धा जाऊ शकत नाही, मग रानडुक्कर कसा जाईल? असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. वनरक्षकाने दडपशाहीतून बोरगाव गोंडी बिटात मोठी माया जमविली असून त्या विरोधात बोलणाºया प्रत्येकाला बघून घेण्याची धमकी दिली जाते.उपवनसंरक्षकांनी दखल घेऊन सूडबुद्धीने वागणाºया वनरक्षकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे. वनविभागाच्या तक्रारीवरून सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचलो. शेतात बारकाईने शोध घेतला, पण शेतात कुठेही हूक टाकलेला दिसून आली नाही. मृत वन्यजीव सुध्दा दिसला नाही.चैतन्य देशपांडे, कनिष्ठ अभियंता,खरांगणावनरक्षक मनीष सज्जन यांच्याविरोधात ग्रामस्थांनी वनमंत्र्यांकडे तक्रार केली. त्या निवेदनावर पहिल्या क्रमांकावर माझी स्वाक्षरी आहे. त्यांनी मला आधीच बघून घेण्याची धमकी दिली होती व हा निव्वळ सूड उगविण्याचा प्रकार आहे.- मेघराज पेठे, बोरगाव गोंडी