शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रियेत आणण्याचे प्रयत्न व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:18 IST

पैश्याअभावी अनेक शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे ठरते. अशावेळी बँकांनी शेतकऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे महत्त्वाचे असते.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : २०१८-१९ आर्थिक वर्षात खरिपासाठी ८५० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट

ऑनलाईन लोकमतवर्धा : पैश्याअभावी अनेक शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे ठरते. अशावेळी बँकांनी शेतकऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे यावर्षी कर्ज प्रक्रियेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षांत दीड लाख शेतकऱ्यांना ८५० कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवून ते पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना घरपोच कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्यात.शेती व शेतकऱ्यांशी संबंधित विषयांचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, कृषी सहसंचालक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कल्पना जुईकर, उपजिल्हाधिकारी स्मिता पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. शेतीमध्ये रासायनिक खतांचा जास्त वापर होत असल्यामुळे किडणी खराब होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे. जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीत खताचा, सेंद्रीय खताचा वापर करण्याचा पद्धतीत काय बदल झालेत याचा अभ्यास करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी कृषी अधिकाऱ्यांना दिल्यात.वर्धेत शेतकरी तूर विकण्यापेक्षा डाळ करून विकत आहेत. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांना साठवणुकीसाठी गोदाम उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले. तसेच शेतकºयांच्या मुलांना व्यवसाय उभारण्यासाठी मुद्रा बँक योजनेतून जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वामन कोहाड यांना केल्यात.अन्न सुरक्षा योजनेचा आढावा घेताना जिल्हा प्रशासनाने अंत्योदय मध्ये इष्टांकापेक्षा जास्त रेशन कार्ड दिल्याबद्दल कोतुक केले. तसेच ज्या व्यक्तीकडे एक पेक्षा जास्त रेशन दुकाने आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची सुचना केली. वर्धा जिल्ह्यात रेशन कार्ड शंभर टक्के आधार लिंकिंग झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.कृषी पंप वीज जोडणीचा आढावा घेताना त्यांनी प्रलंबित जोडणीसाठी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करावा, असे सांगितले. उन्हाळा आणि पाणी टंचाई सुरू झाली असताना ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, अशा सुचना दिल्यात. खंडित केलेला वीजपुरवठा तात्काळ जोडण्यात यावा, असेही सांगितले. ग्रामीण भागात आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च कमी करण्यसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद शाळा उत्तम कराव्यात. आज गावाबाहेर इंग्रजी शाळेत जाणारी गावातील मुले पुन्हा जिल्हा परिषद शाळांमध्ये येण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी माध्यम सुरू करावे. यामुळे शेतकऱ्यांचा मुलांच्या शिक्षणावरील खर्च कमी होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.कृषी विभागाच्यावतीने येथील लोक महाविद्यालयाच्या मैदानावर कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देत किशोर तिवारी यांनी पाहणी करून असलेल्या स्टॉलची माहिती घेतली.