शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

आदिवासी माना बांधवांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:56 IST

अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या आदिवासी माना समाज बांधवांच्या मोर्चाने दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हाकचेरीवर धडक दिली.

ठळक मुद्देअन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढून जिल्हाकचेरीवर दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या आदिवासी माना समाज बांधवांच्या मोर्चाने दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हाकचेरीवर धडक दिली. सदर मोर्चा न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर शहर पोलिसांनी अडविल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.संविधानातील ३४२ व्या कलमानुसार तसेच अनुसूचित जाती/जमाती सुधारणा कायदा १९६५ व १९६७ नुसार राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये १८ व्या क्रमांकावर माना जमातीची नोंद आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ याचिका क्रमांक ९५९/२००२ दि. ११ जुलै २००३ चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. याचिका क्र. ५२७०/२००४ दि. ८ मार्च २००६ चा निर्णय माना जमातीच्या बाजूने असताना राज्य सरकारने माना जमातीचा अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासंबंधी शासन निर्णय काढले होते.त्यानुसार सदर जमातीला प्रमाणपत्रही प्राप्त होत होते. परंतु, त्यानंतर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली, नागपूर, अमरावती यांनी माना जमातीचे जात वैधता प्रमाणपत्रांची प्रकरणे प्रलंबित ठेवलेली आहेत. हे एक प्रकारे अन्याय करण्याचे षडयंत्रच असल्याचा आरोप करीत तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. सदर मोर्चाने बजाज चौक, इतवारा चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.या मोर्चात माना आदिम जमात मंडळ व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच आदिवासी माना समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आमचा लढा फक्त जात वैधतेसाठीजात वैधता आमच्या हक्काची..., लोकशाही की ठोकशाही..., गुंज उठा है कोणा-कोणा जाग उठा है आदिवासी माना आदी घोषणा देत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी माना समाज बांधवांनी आमचा लढा फक्त जात वैधतेसाठी असा आवाज बुलंद केला. सदर आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.