शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजपाच्या काळात आदिवासींनी विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:03 IST

भाजपाची अठरा राज्यासह देशावर सत्ता आहे. त्यामुळे आदिवासींना आपल्या समस्या सोडविण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज नाही. भाजप सरकारच्या काळात आदिवासींनी आपला विकास करून घेतला पाहिजे, ....

ठळक मुद्देहंसराज अहीर : आदिवासी आघाडीच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भाजपाची अठरा राज्यासह देशावर सत्ता आहे. त्यामुळे आदिवासींना आपल्या समस्या सोडविण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज नाही. भाजप सरकारच्या काळात आदिवासींनी आपला विकास करून घेतला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.येथे आयोजित भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, महाराष्टÑ प्रदेश आदिवासी मोर्चा आघाडीचे प्रा. हरिशचंद्र भोये, भाजपच्या आदिवासी विकास आघाडीचे राष्टÑीय उपाध्यक्ष खा. अशोक नेते, महाराष्टÑ प्रभारी अमसिंग तिलावत, लक्ष्मीकांत घानगावे, खा. रामदास तडस, उध्दव येरमे, कृष्णराव चव्हाण, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. पास्कल धनारे, आ. डॉ. देवराव होळी, आ. राजु तोडसाम, श्याम धुर्वे, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी आदींची उपस्थिती होती.अमरसिंग तिलावत यांनी महाराष्टÑात २६ आदिवासी लोकसंख्या बहुल असलेले जिल्हे आहेत. या जिल्ह्यात आदिवासींच्या अनेक अडचणी आहेत. सरकार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या प्रश्नांवर लक्ष घालून त्यांच्या समस्या सोडवाव्यात. वेळप्रसंगी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दरबारीही याबाबत बैठक घ्यावी, अशा सुचना दिल्या.जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खा. रामदास तडस यांनी केले. राज्यध्यक्ष हरिशचंद्र भोये यांनी महाराष्टÑात १४ जिल्हे व ५० विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे याच भागावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे सांगितले. राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे येथे पुढील काळात आदिवासी आघाडीच्या प्रदेश बैठका घेवून मुंबई येथील बैठकीत आदिवासी आश्रम शाळांची समस्या, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचण, आदिवासी लोकप्रतिनिधींना निधी मिळण्यात होत असलेली दिरंगाई आदीबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावावी बाबतही चर्चा यावेळी करण्यात आली.बैठकीला महाराष्टÑातील २६ पैकी आदिवासी आघाडीचे १४ जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. राज्यातील आदिवासी आघाडीच्या संघटन बांधनीची माहिती या बैठकीत घेण्यात आली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव तथा भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.