शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव तलावाच्या भिंतीवरील झाडे धोकादायक

By admin | Updated: May 4, 2017 00:45 IST

डोंगरगाव येथील तलावाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ग्रा.पं.चा एक वर्षापासून पाठपुरावा : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष सेलू : डोंगरगाव येथील तलावाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर नानबर्डी ग्रामपंचायतने पाटबंधारे उपविभागीय अभियंता यांना असे दोनदा लेखी पत्र दिले. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येते. गावावर मोठी आपत्ती येण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी आहे. सेलू तालुक्यात असणारा डोंगरगाव मध्यम प्रकल्पाचे काम १९६५ मध्ये सुरू करुन १९७१ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्यात आला. यात परिसरातील नानबर्डी, डोंगरगाव, खैरी, ब्राम्हणी, धामणगाव, निंबोळी, पिंपळगाव ही लाभान्वित गावे आहे. या धरणाच्या निर्मितीपासून भिंंतीवर व सभोवताल उगविलेली झाडे आता मोठी झाली आहे. त्यामुळे ही झाडे तोडण्याची गरज आहे. मात्र झाड तोडण्याकडे व नष्ट करण्याचे काम सदर विभागाकडून करण्यात आले नाही, असे येथील नागरिक सांगतात. या झाडाझुडपांच्या मुळ्या भिंतीत खोलवर गेल्या आहे. मातीची भिंत असल्याने या भिंतीला तडा जात आहे. पाण्याचा साठा वाढल्यावर भिंत फुटण्याचा धोका असल्याने अतिरीक्त झाडे तोडण्याची मागणी आहे. ही भिंत फुटल्यास गावाला धोका निर्माण होवू शकतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने झाडे कापणे सोयीस्कर ठरू शकते. त्यामुळेच भिंतीलगत वाढलेली झाडे त्वरीत तोडावी अशी मागणी नानबर्डीच्या सरपंच योगिता चोरे, उपसरपंच सुरेश लामसोंगे यांनी पत्राद्वारे पाटबंधारे विभागाकडे केली आहे. या मागणीचे पत्र २० जून २०१६ आणि २० आॅक्टोबर २०१६ ला पाठविण्यात आले. गत सहा महिन्यात या पत्रावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने परिसरातील नागरिकांत चिंता व्यक्त्त होत आहे.(शहर प्रतिनिधी) भिंतीला तडे गेल्यास गावाला धोका डोंगरगाव प्रकल्पात ४.४४३ द.ल.घ.मी. पाण्याचा उपयुक्त साठा असतो. हे धरण मातीचे असून लांबी ५४३ मीटर तर १६.९८ मीटर उंची आहे. सांडवा क्लिअर ओव्हर फॉल असून ९०.५३ मी. लांबी व ३८२ घ.म.डा.से. महत्तम पुर विसर्ग, धरण माथा पातळी ३०१.६० मी. महत्तम पुर पातळी २९९.७७ मी. पूर्ण संचय पातळी २८७.९५ मी. या धरणाच्या पातळ्या असून या धरणाच्या माध्यमातून एकूण लाभ क्षेत्र १९४० हेक्टर तर ६०८ हेक्टर सिंचन योग्य क्षेत्र आहे. या धरणाच्या भिंतीवरील झाडे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा लाभ परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना होत आहे. मात्र त्याची देखभाल होत नसल्याची तक्रार नागरिक करतात. या धरणाच्या भिंतीवरील झाडे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जात आहे. या समस्येची वेळीच दखल घेत उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.