शहरं
Join us  
Trending Stories
1
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
4
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
5
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
6
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
7
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
8
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
9
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
10
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
11
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
12
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
13
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
14
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
15
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
16
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
17
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
18
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
19
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
20
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

डोंगरगाव तलावाच्या भिंतीवरील झाडे धोकादायक

By admin | Updated: May 4, 2017 00:45 IST

डोंगरगाव येथील तलावाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ग्रा.पं.चा एक वर्षापासून पाठपुरावा : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष सेलू : डोंगरगाव येथील तलावाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर नानबर्डी ग्रामपंचायतने पाटबंधारे उपविभागीय अभियंता यांना असे दोनदा लेखी पत्र दिले. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येते. गावावर मोठी आपत्ती येण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी आहे. सेलू तालुक्यात असणारा डोंगरगाव मध्यम प्रकल्पाचे काम १९६५ मध्ये सुरू करुन १९७१ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्यात आला. यात परिसरातील नानबर्डी, डोंगरगाव, खैरी, ब्राम्हणी, धामणगाव, निंबोळी, पिंपळगाव ही लाभान्वित गावे आहे. या धरणाच्या निर्मितीपासून भिंंतीवर व सभोवताल उगविलेली झाडे आता मोठी झाली आहे. त्यामुळे ही झाडे तोडण्याची गरज आहे. मात्र झाड तोडण्याकडे व नष्ट करण्याचे काम सदर विभागाकडून करण्यात आले नाही, असे येथील नागरिक सांगतात. या झाडाझुडपांच्या मुळ्या भिंतीत खोलवर गेल्या आहे. मातीची भिंत असल्याने या भिंतीला तडा जात आहे. पाण्याचा साठा वाढल्यावर भिंत फुटण्याचा धोका असल्याने अतिरीक्त झाडे तोडण्याची मागणी आहे. ही भिंत फुटल्यास गावाला धोका निर्माण होवू शकतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने झाडे कापणे सोयीस्कर ठरू शकते. त्यामुळेच भिंतीलगत वाढलेली झाडे त्वरीत तोडावी अशी मागणी नानबर्डीच्या सरपंच योगिता चोरे, उपसरपंच सुरेश लामसोंगे यांनी पत्राद्वारे पाटबंधारे विभागाकडे केली आहे. या मागणीचे पत्र २० जून २०१६ आणि २० आॅक्टोबर २०१६ ला पाठविण्यात आले. गत सहा महिन्यात या पत्रावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने परिसरातील नागरिकांत चिंता व्यक्त्त होत आहे.(शहर प्रतिनिधी) भिंतीला तडे गेल्यास गावाला धोका डोंगरगाव प्रकल्पात ४.४४३ द.ल.घ.मी. पाण्याचा उपयुक्त साठा असतो. हे धरण मातीचे असून लांबी ५४३ मीटर तर १६.९८ मीटर उंची आहे. सांडवा क्लिअर ओव्हर फॉल असून ९०.५३ मी. लांबी व ३८२ घ.म.डा.से. महत्तम पुर विसर्ग, धरण माथा पातळी ३०१.६० मी. महत्तम पुर पातळी २९९.७७ मी. पूर्ण संचय पातळी २८७.९५ मी. या धरणाच्या पातळ्या असून या धरणाच्या माध्यमातून एकूण लाभ क्षेत्र १९४० हेक्टर तर ६०८ हेक्टर सिंचन योग्य क्षेत्र आहे. या धरणाच्या भिंतीवरील झाडे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा लाभ परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना होत आहे. मात्र त्याची देखभाल होत नसल्याची तक्रार नागरिक करतात. या धरणाच्या भिंतीवरील झाडे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जात आहे. या समस्येची वेळीच दखल घेत उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.