शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

एक झाड कोसळताच सतरा झाडांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 9:33 PM

येथील रेल्वे स्थानकावरील एक झाड उन्मळून पडल्याने इतरही झाड पडू शकते असा अजब तर्क लावित स्टेशन अधीक्षकांनी तब्बल सतरा झाडांवर कुºहाड चालविली.त्यामुळे पर्यावरण संवर्धन संस्थेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । रेल्वेस्थानकावरील प्रकार; स्टेशन अधीक्षकांचा अजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील रेल्वे स्थानकावरील एक झाड उन्मळून पडल्याने इतरही झाड पडू शकते असा अजब तर्क लावित स्टेशन अधीक्षकांनी तब्बल सतरा झाडांवर कुºहाड चालविली.त्यामुळे पर्यावरण संवर्धन संस्थेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.रेल्वे स्थानकावरील फलाटाच्या बाजुला कडुनिंब, करंज, अशोकासह मोठी झाडे आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेल्वे स्थानकालगतच्या महेश ज्ञानपीठ विद्यालयातून पवन फड नामक विद्यार्थ्याने बघितले असता त्याला स्थानकावरील काही भाग अचानक भकास झालेला दिसून आला. त्यामुळे त्याने बाईकाने लक्ष दिल्यावर या परिसरातील झाडांची कत्तल केल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने लगेच पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशिष भोयर यांना माहिती दिली. माहिती मिळताच सहाकाऱ्यांसोबत त्यांनी रेल्वे स्थानकावरील फलाट गाठला.तेव्हा फलाटालगतची एक-दोन नाही तर तब्बल सतरा झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भायेर यांनी स्टेशन अधीक्षक एच.व्ही.वर्मा यांना भ्रमणध्वनीवरुन वृक्षतोडीबाबत माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वच थक्क झाले. ‘या परिसरातील पिंपळाचे मोठे झाड अचानक उन्मळून पडल्याने इतरही झाडं अशीच पडून जातील म्हणून सर्वच झाडे मुळासकट तोडून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला’ असे वर्मा यांनी सांगितले.यावेळी आशिष भोयर यांनी वर्मा यांना या झाडांबाबत माहिती दिल्यानंतर अधीक्षक वर्मा यांना चूक कळली. त्यामुळे ज्या झाडांवर कुºहाड पडणार होती. ती झाडं तोडणार नसल्याचे आश्वासन दिले. सोबतच या प्रकरणाची चौकशी करुन पर्यावरणाची नुकसान भरपाई म्हणून चारपट झाडं लावण्यात यावी, या मागणीचे निवेदनही पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने रेल्वे प्रशासनाला दिले.हिंगणघाटचे पर्यावरणवादी जागरुकरेल्वेस्थानकावरील वृक्ष तोडण्यात आल्याची माहिती मिळताच पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. यापूर्वीही शहरात एका डॉक्टरने गाडी ठेवता येत नाही म्हणून वृक्षतोड केली होती. याबाबतही शहरातील पर्यावरणवाद्यांनी पुढाकार घेत त्या जागी वृक्ष लावून घेतले होते. तसेच राष्ट्रीय, राज्य महामार्गाच्या कामात करण्यात आलेल्या वृक्षतोडीच्या विरोधातही येथे पर्यावरणवादी व वृक्षप्रेमींनी जाहीर नाराजी व्यक्त करून शासनाला तसे निवेदनही सादर केले होते. ही जागरूकता फक्त हिंगणघाटमध्ये दिसून येते.