शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

एक झाड कोसळताच सतरा झाडांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:34 IST

येथील रेल्वे स्थानकावरील एक झाड उन्मळून पडल्याने इतरही झाड पडू शकते असा अजब तर्क लावित स्टेशन अधीक्षकांनी तब्बल सतरा झाडांवर कुºहाड चालविली.त्यामुळे पर्यावरण संवर्धन संस्थेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । रेल्वेस्थानकावरील प्रकार; स्टेशन अधीक्षकांचा अजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील रेल्वे स्थानकावरील एक झाड उन्मळून पडल्याने इतरही झाड पडू शकते असा अजब तर्क लावित स्टेशन अधीक्षकांनी तब्बल सतरा झाडांवर कुºहाड चालविली.त्यामुळे पर्यावरण संवर्धन संस्थेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.रेल्वे स्थानकावरील फलाटाच्या बाजुला कडुनिंब, करंज, अशोकासह मोठी झाडे आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेल्वे स्थानकालगतच्या महेश ज्ञानपीठ विद्यालयातून पवन फड नामक विद्यार्थ्याने बघितले असता त्याला स्थानकावरील काही भाग अचानक भकास झालेला दिसून आला. त्यामुळे त्याने बाईकाने लक्ष दिल्यावर या परिसरातील झाडांची कत्तल केल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने लगेच पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशिष भोयर यांना माहिती दिली. माहिती मिळताच सहाकाऱ्यांसोबत त्यांनी रेल्वे स्थानकावरील फलाट गाठला.तेव्हा फलाटालगतची एक-दोन नाही तर तब्बल सतरा झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भायेर यांनी स्टेशन अधीक्षक एच.व्ही.वर्मा यांना भ्रमणध्वनीवरुन वृक्षतोडीबाबत माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वच थक्क झाले. ‘या परिसरातील पिंपळाचे मोठे झाड अचानक उन्मळून पडल्याने इतरही झाडं अशीच पडून जातील म्हणून सर्वच झाडे मुळासकट तोडून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला’ असे वर्मा यांनी सांगितले.यावेळी आशिष भोयर यांनी वर्मा यांना या झाडांबाबत माहिती दिल्यानंतर अधीक्षक वर्मा यांना चूक कळली. त्यामुळे ज्या झाडांवर कुºहाड पडणार होती. ती झाडं तोडणार नसल्याचे आश्वासन दिले. सोबतच या प्रकरणाची चौकशी करुन पर्यावरणाची नुकसान भरपाई म्हणून चारपट झाडं लावण्यात यावी, या मागणीचे निवेदनही पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने रेल्वे प्रशासनाला दिले.हिंगणघाटचे पर्यावरणवादी जागरुकरेल्वेस्थानकावरील वृक्ष तोडण्यात आल्याची माहिती मिळताच पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. यापूर्वीही शहरात एका डॉक्टरने गाडी ठेवता येत नाही म्हणून वृक्षतोड केली होती. याबाबतही शहरातील पर्यावरणवाद्यांनी पुढाकार घेत त्या जागी वृक्ष लावून घेतले होते. तसेच राष्ट्रीय, राज्य महामार्गाच्या कामात करण्यात आलेल्या वृक्षतोडीच्या विरोधातही येथे पर्यावरणवादी व वृक्षप्रेमींनी जाहीर नाराजी व्यक्त करून शासनाला तसे निवेदनही सादर केले होते. ही जागरूकता फक्त हिंगणघाटमध्ये दिसून येते.