शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

योग्य आळ्यांमुळे कमी पाण्यात वृक्ष संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:03 IST

हनुमान टेकडीवर मागील दोन वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे राबविली जात आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय जनजागृती मंचचा उपक्रम : तंत्र शिकून अन्यत्रही वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन

ऑनलाईन लोकमतवर्धा : हनुमान टेकडीवर मागील दोन वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे राबविली जात आहे. राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाद्वारे आयोजित वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत हनुमान टेकडीवर नऊ हजार रोपटी लावण्यात आली आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसांत रोपट्यांचे संवर्धन महत्त्वाचे ठरणार आहे. या संवर्धनाकरिता वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे तांत्रिकदृष्ट्या योग्य आळे केले आहे. या आळ्यांमुळे कमी पाण्यातही झाडे जगू शकत असल्याचे सांगण्यात आले आहे.विविध सामाजिक संघटना, वाढदिवस आणि अनेकांच्या स्मृती -प्रीत्यर्थ हनुमान टेकडीवर येत वृक्षारोपण केले. सर्वांनी लावलेल्या रोपट्यांचे वृक्षात परिवर्तन करण्याचा वसा वैद्यकीय जनजागृती मंचने घेतला आहे. झाडांच्या संरक्षणाकरिता त्यांना आधार देण्यासह आसपास वाढलेले गवत कापण्याचे कामही त्यांच्यावतीने टेकडी परिसरात झाले. या टेकडीवरील वृक्षारोपणाची दखल घेत येथे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक अधिकाºयांनी भेट दिली. वृक्षसंवर्धन कार्याला जिल्हाधिकाºयांनी अनेकदा सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनात येथे झाडांकरिता पाण्याची सुविधा करण्यात आली असून यातून सध्या वृक्षसंवर्धनाचे काम सुरू आहे.टेकडीवर लावलेल्या वृक्षांपैकी सुमारे ९५ टक्के वृक्षांचे संवर्धन झाले आहे. वृक्षांना नियमित पाणी दिले जाते. प्रत्येक वृक्षांभोवती तांत्रिक दृष्ट्या योग्य आळे तयार केले आहे. यामुळे कमी पाण्यातही वृक्षाला आवश्यक पाणी टिकवून ठेवण्यास साह्य होते, अशी माहिती व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी दिली. या वृक्षांच्या संगोपन कार्यात सहकार्य करावे आणि आळे तयार करण्याचे तंत्रदेखील जाणून घ्यावे. त्यामुळे अन्य ठिकाणीदेखील वृक्ष संवर्धनास उपयोग होईल, असे आवाहनही वर्धेकरांना व्हीजेएमद्वारे करण्यात आले आहे.