शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

उपचार घेतल्यास क्षयरोग हमखास बरा होतो

By admin | Updated: March 27, 2015 01:30 IST

भारतात क्षयरुग्णाचे प्रमाण जास्त आहे. बरेच रुग्ण उपचार घेत असले तरीही अजून बरेच रुग्ण शोधून काढायचे आहेत.

वर्धा : भारतात क्षयरुग्णाचे प्रमाण जास्त आहे. बरेच रुग्ण उपचार घेत असले तरीही अजून बरेच रुग्ण शोधून काढायचे आहेत. त्यांच्यावर संपूर्ण उपचार करावेत, हे कार्य करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. उपचार घेतल्यास हा रोग हमखास बरा होतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी केले.जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मंगळवारला पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मिलिंद भेंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. धुर्वे, डॉ. अंधारे, डॉ. निमोदिया, डॉ. कुचेवार, जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यानंतर बोलताना भेंडे म्हणाले, ग्रामीण भागातून क्षयरुग्णाला पूर्ण उपचाराखाली आणणे गरजेचे आहे. त्याकरिता योग्य आरोग्य शिक्षण देण्यात यावे, आजही क्षयरुग्णाच्या बाबतीत अंधश्रद्धा जोपासल्या जातात. तसेच डॉ. निवृत्ती राठोड यांनी क्षयरोगावर पूर्ण उपचार, संतुलित आहार व योग्य व्यायाम केल्यास या रोगावर हमखास नियंत्रण मिळविता येते. क्षयरुग्ण हा पूर्ण बरा होतो, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात जागृतीपर विविध कार्यक्रमाचे घेण्यात आले. यात रॅलीतून क्षयरोगाची माहिती देणारा चित्ररथाचा समावेश करण्यात आला. जागृती रॅलीचा समारोप जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला. यासह जिल्हा क्षयरोग कार्यालयात रांगोळी, पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांनी बक्षीस प्रदान केले. यात रांगोळी स्पर्धेत प्रथम मंगला गुरनुले, द्वितीय आंचल कांबळे, तृतीय शितल राठोड तर शितल चांदकर, प्राची भस्मे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच पोस्टर्स स्पर्धेत प्रथम राखी कोळसे, द्वितीय मेघा कांबळे, तृतीय शर्मिला उंबरे तर आरती वासेकर व निधी गुलकुंडे यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देवून गौरविले. उत्कृष्ठ डॉट्स प्रोव्हायडर म्हणून भीमराव मून, अर्चना चौधरी, ममता खासरे, अल्का गाटोळे, माधुरी ढोरे, कल्पना वानखडे, वंदना नौकरकर, अर्चना कोल्हे, इंदु खडसे यांना सन्मानित केले. तर उत्कृष्ठ औषधी अधिकारी म्हणून राम बोरसरे, तृप्ती देशमुख, तुषार धात्रक यांचा प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शेळके यांनी केले तर आभार डॉ. मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला चंदन बोरकर, सोनटक्के, दुबे, जगताप, सारडे, वैरागडे, बेलूरकर, शेख, दाभाडे, उईके, अंधारे, रंगारी, पुरी आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)