शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

उपचार घेतल्यास क्षयरोग हमखास बरा होतो

By admin | Updated: March 27, 2015 01:30 IST

भारतात क्षयरुग्णाचे प्रमाण जास्त आहे. बरेच रुग्ण उपचार घेत असले तरीही अजून बरेच रुग्ण शोधून काढायचे आहेत.

वर्धा : भारतात क्षयरुग्णाचे प्रमाण जास्त आहे. बरेच रुग्ण उपचार घेत असले तरीही अजून बरेच रुग्ण शोधून काढायचे आहेत. त्यांच्यावर संपूर्ण उपचार करावेत, हे कार्य करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. उपचार घेतल्यास हा रोग हमखास बरा होतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी केले.जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मंगळवारला पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मिलिंद भेंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. धुर्वे, डॉ. अंधारे, डॉ. निमोदिया, डॉ. कुचेवार, जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यानंतर बोलताना भेंडे म्हणाले, ग्रामीण भागातून क्षयरुग्णाला पूर्ण उपचाराखाली आणणे गरजेचे आहे. त्याकरिता योग्य आरोग्य शिक्षण देण्यात यावे, आजही क्षयरुग्णाच्या बाबतीत अंधश्रद्धा जोपासल्या जातात. तसेच डॉ. निवृत्ती राठोड यांनी क्षयरोगावर पूर्ण उपचार, संतुलित आहार व योग्य व्यायाम केल्यास या रोगावर हमखास नियंत्रण मिळविता येते. क्षयरुग्ण हा पूर्ण बरा होतो, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात जागृतीपर विविध कार्यक्रमाचे घेण्यात आले. यात रॅलीतून क्षयरोगाची माहिती देणारा चित्ररथाचा समावेश करण्यात आला. जागृती रॅलीचा समारोप जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला. यासह जिल्हा क्षयरोग कार्यालयात रांगोळी, पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांनी बक्षीस प्रदान केले. यात रांगोळी स्पर्धेत प्रथम मंगला गुरनुले, द्वितीय आंचल कांबळे, तृतीय शितल राठोड तर शितल चांदकर, प्राची भस्मे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच पोस्टर्स स्पर्धेत प्रथम राखी कोळसे, द्वितीय मेघा कांबळे, तृतीय शर्मिला उंबरे तर आरती वासेकर व निधी गुलकुंडे यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देवून गौरविले. उत्कृष्ठ डॉट्स प्रोव्हायडर म्हणून भीमराव मून, अर्चना चौधरी, ममता खासरे, अल्का गाटोळे, माधुरी ढोरे, कल्पना वानखडे, वंदना नौकरकर, अर्चना कोल्हे, इंदु खडसे यांना सन्मानित केले. तर उत्कृष्ठ औषधी अधिकारी म्हणून राम बोरसरे, तृप्ती देशमुख, तुषार धात्रक यांचा प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शेळके यांनी केले तर आभार डॉ. मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला चंदन बोरकर, सोनटक्के, दुबे, जगताप, सारडे, वैरागडे, बेलूरकर, शेख, दाभाडे, उईके, अंधारे, रंगारी, पुरी आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)