शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांना संस्कार म्हणून स्वीकारणे गरजेचे

By admin | Updated: January 11, 2017 01:03 IST

विदेशात वाहतूक नियमांचे पालन करण्याची संस्कृती असून आपल्या देशात नियमांचे पालन करण्यापेक्षा उल्लंघन करण्याचीच वृत्ती दिसून येते.

शैलेश नवाल : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन वर्धा : विदेशात वाहतूक नियमांचे पालन करण्याची संस्कृती असून आपल्या देशात नियमांचे पालन करण्यापेक्षा उल्लंघन करण्याचीच वृत्ती दिसून येते. वाहतूक नियमांना कायदा न मानता त्याला संस्काराच्या स्वरूपात स्वीकारल्यास देशातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त मिळून अपघाताच्या प्रमाणात घट होईल. सदर समाज हितार्थ कृतीतून आपण आपला व दुसऱ्यांचा जीव वाचवू शकतो. तरूणांसह नागरिकांनी वाहतुक नियमांना संस्कार म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकास भवन येथे आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी केले. उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने २८ व्या रस्ता सुरक्षा पंधरवाड्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. इलमे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले, वाहतूक नियम बनविण्यामागे तर्कशास्त्र आहे. त्याची माहिती करून घेत विद्यार्थ्यांसह नागरिकंनी स्वत: नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच दुसऱ्यांनाही नियमांचे पालन करण्यासाठी प्रेरीत करावे. तरूणांना वेग आणि शॉर्टकट आवडतात. मात्र, वाहन चालविताना दुसऱ्यांशी स्पर्धा न करता दुसऱ्यांच्या आयुष्याचे मोल लक्षात घेऊन वाहन कायद्याच्या नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे. त्यामुळे संभाव्य धोका टाकता येतो असे त्यांनी सांगितले. इलमे यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नवीन-नवीन गोष्टी शिकण्याबरोबरच वाहन चालविणे शिकले पाहिजे; पण वाहन चालविण्याबरोबर वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास अपघाताची भीती असते. अपघातामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून अनेकांना जिवाला मुकावे लागते आहे. परिणामी, प्रत्येकाने वाहतूक नियम पाळावे असे ते म्हणाले. डॉ. राठोड यांनी अपघातग्रस्त नागरिकांना लगेच उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. जिल्ह्यात रूग्णवाहिकांनी आतापर्यंत ६२५ अपघातातील रूग्णांना सेवा देऊन त्यांचा जीव वाचविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. गरजेच्या वेळी १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जनजागृती रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविलेल्या जनजागृती रॅलीने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमन केले.(शहर प्रतिनिधी)