शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

वाहतूक नियमांना संस्कार म्हणून स्वीकारणे गरजेचे

By admin | Updated: January 11, 2017 01:03 IST

विदेशात वाहतूक नियमांचे पालन करण्याची संस्कृती असून आपल्या देशात नियमांचे पालन करण्यापेक्षा उल्लंघन करण्याचीच वृत्ती दिसून येते.

शैलेश नवाल : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन वर्धा : विदेशात वाहतूक नियमांचे पालन करण्याची संस्कृती असून आपल्या देशात नियमांचे पालन करण्यापेक्षा उल्लंघन करण्याचीच वृत्ती दिसून येते. वाहतूक नियमांना कायदा न मानता त्याला संस्काराच्या स्वरूपात स्वीकारल्यास देशातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त मिळून अपघाताच्या प्रमाणात घट होईल. सदर समाज हितार्थ कृतीतून आपण आपला व दुसऱ्यांचा जीव वाचवू शकतो. तरूणांसह नागरिकांनी वाहतुक नियमांना संस्कार म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकास भवन येथे आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी केले. उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने २८ व्या रस्ता सुरक्षा पंधरवाड्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. इलमे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले, वाहतूक नियम बनविण्यामागे तर्कशास्त्र आहे. त्याची माहिती करून घेत विद्यार्थ्यांसह नागरिकंनी स्वत: नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच दुसऱ्यांनाही नियमांचे पालन करण्यासाठी प्रेरीत करावे. तरूणांना वेग आणि शॉर्टकट आवडतात. मात्र, वाहन चालविताना दुसऱ्यांशी स्पर्धा न करता दुसऱ्यांच्या आयुष्याचे मोल लक्षात घेऊन वाहन कायद्याच्या नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे. त्यामुळे संभाव्य धोका टाकता येतो असे त्यांनी सांगितले. इलमे यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नवीन-नवीन गोष्टी शिकण्याबरोबरच वाहन चालविणे शिकले पाहिजे; पण वाहन चालविण्याबरोबर वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास अपघाताची भीती असते. अपघातामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून अनेकांना जिवाला मुकावे लागते आहे. परिणामी, प्रत्येकाने वाहतूक नियम पाळावे असे ते म्हणाले. डॉ. राठोड यांनी अपघातग्रस्त नागरिकांना लगेच उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. जिल्ह्यात रूग्णवाहिकांनी आतापर्यंत ६२५ अपघातातील रूग्णांना सेवा देऊन त्यांचा जीव वाचविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. गरजेच्या वेळी १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जनजागृती रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविलेल्या जनजागृती रॅलीने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमन केले.(शहर प्रतिनिधी)