शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

पारदर्शकपणे योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: April 23, 2015 01:47 IST

विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांच्या विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करणे सहज शक्य आहे.

वर्धा : विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांच्या विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करणे सहज शक्य आहे. यासाठी कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पारदर्शकपणे पोहचवा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी बुधवारी केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.देवळी पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, पंचायत समितीचे उपसभापती गुलाब डफरे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भूयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, सुनील मेसरे, तहसीलदार जितेंद्र कुवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, कार्यकारी अभियंता शेषराव सहारे, मोहन अग्रवाल यांची उपस्थिती होती. प्रमोद पवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अनेक ग्रामविकासाच्या योजना आहेत. शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढे येऊन लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. राजेंद्र भुयार म्हणाले, राज्यात वर्धा जि. प. ग्रामपंचायतीद्वारे नरेगामार्फत फळबाग योजनेत प्रथम आहे. हा आपल्या जिल्ह्याचा बहुमान आहे. कल्याणकारी योजनांची अचूक माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आपले कर्तव्य आहे. पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशन बाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनीही कृषी आणि जलयुक्त शिवार अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शेषराव सहारे यांनी पाणीपुरवठा, सुनील मसरे यांनी महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धनाबाबत डॉ. तापस यांनीही माहिती दिली. उपसभापती गुलाब डफरे, जि. प. सदस्य मोरेश्वर खोडके, अतुल शर्मा यांनीही विचार मांडले.प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. संचालन विनेश काकडे तर आभार श्याम टरके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रोशन वाढवे, उज्ज्वला राऊत, दिनेश धांदे, अशोक सराटे, पंचायत समिती सदस्य बानकर, मेंढे, चौधरी, झाडे, के. आर. बजाज, इमरान राही, सरपंच, ग्रामसेवक आदीं उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)