शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

पारदर्शकपणे योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: April 23, 2015 01:47 IST

विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांच्या विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करणे सहज शक्य आहे.

वर्धा : विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांच्या विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करणे सहज शक्य आहे. यासाठी कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पारदर्शकपणे पोहचवा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी बुधवारी केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.देवळी पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, पंचायत समितीचे उपसभापती गुलाब डफरे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भूयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, सुनील मेसरे, तहसीलदार जितेंद्र कुवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, कार्यकारी अभियंता शेषराव सहारे, मोहन अग्रवाल यांची उपस्थिती होती. प्रमोद पवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अनेक ग्रामविकासाच्या योजना आहेत. शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढे येऊन लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. राजेंद्र भुयार म्हणाले, राज्यात वर्धा जि. प. ग्रामपंचायतीद्वारे नरेगामार्फत फळबाग योजनेत प्रथम आहे. हा आपल्या जिल्ह्याचा बहुमान आहे. कल्याणकारी योजनांची अचूक माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आपले कर्तव्य आहे. पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशन बाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनीही कृषी आणि जलयुक्त शिवार अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शेषराव सहारे यांनी पाणीपुरवठा, सुनील मसरे यांनी महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धनाबाबत डॉ. तापस यांनीही माहिती दिली. उपसभापती गुलाब डफरे, जि. प. सदस्य मोरेश्वर खोडके, अतुल शर्मा यांनीही विचार मांडले.प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. संचालन विनेश काकडे तर आभार श्याम टरके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रोशन वाढवे, उज्ज्वला राऊत, दिनेश धांदे, अशोक सराटे, पंचायत समिती सदस्य बानकर, मेंढे, चौधरी, झाडे, के. आर. बजाज, इमरान राही, सरपंच, ग्रामसेवक आदीं उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)