शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

वाहतूक समस्या ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: January 4, 2015 23:18 IST

हिंगणघाट शहराचा विस्तार होत असतानाच वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार हिंगणघाटवासियांना नित्याचाच झाला आहे.

वर्धा : हिंगणघाट शहराचा विस्तार होत असतानाच वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार हिंगणघाटवासियांना नित्याचाच झाला आहे. शहरात वाहतुकीचे संचलन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची कुमक कमी असल्याने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून चालक वाहन पळवितात. शहरातील प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रक पोलीस नियुक्त स्करून बेफाम वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाईची मागणी होत आहे. शहराची लोकसंख्या दोन लाखांहून अधिक आहे. हिंगणघाट शहरातून राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग जातात. यामुळे जडवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाढते अपघात आणि राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीची समस्या निकाली काढण्यासाठी उड्डाणपुल बांधण्यात आला. यानंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीला अपूरे पडत आहेत. शहरातील मार्गावर धावणारे वाहनांची संख्या वाढली. मात्र रस्त्यांची रूंदी कायमच असल्याने अनेक वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी येथील प्रमुख मार्ग व चौकात वाहतूक पोलीस राहत नसल्याने चालकांना पुढाकार घेऊन वाहतुकीची कोंडी सोडवावी लागते. वर्धा शहराप्रमाणे हिंगणघाट येथे ३० ते ३५ वाहतूक नियंत्रक पोलिसांची नियुक्तीची गरज व्यक्त होत आहे. तसेच पार्किंग झोन तयार केल्यास ही समस्या निकाली निघु शकेल. अतिक्रमण हटविल्यास रस्त्याचे रूंदीकरण करण्यास वाव राहिल. वर्दळीच्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याची मागणी आहे. बसस्थानक परिसरात आॅटोसह अन्य खासगी वाहनांच्या रांगा लागत असल्याने वर्दळीकरिता रस्ताच शिल्लक नसतो. कशीबशी वाट काढून चालकांना मार्गक्रमण करावे लागते. समस्येची दखल घेत कार्यवाहीची मागणी नगर विकास सुधार समितीने पोलीस अधीक्षक अनील पारस्कर यांच्याकडे केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)