शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली

By admin | Updated: November 2, 2016 00:43 IST

गोळीबार चौकातून उमरी - येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने उभी असतात.

विभागाचे दुर्लक्ष : वहिवाट झाली धोक्याची कारंजा (घा.) : गोळीबार चौकातून उमरी - येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने उभी असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरून पादचाऱ्यांना ये जा करणे कठीण झाले आहे. परिणामी, किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहेत.शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे; पण ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर वाहने उभी ठेवून वाहतूक रोखणाऱ्यांवर कारवाई करण्यास तयार नाही. यामुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्यावरून १५ गावांतील नागरिक ये-जा करीत असतात. कारंजा गोळीबार चौकातून उमरी-येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक प्रकारची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये येणारे ग्राहक राजरोसपणे दुकानांसमोर भररस्त्यावर वाहने उभी ठेवतात. यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी ही बाब नित्याची झाली आहे. पायी चालणेही कठीण जात असल्याने अनेकदा अपघातही झाले आहेत. दक्षता कमिटीच्या सभेमध्ये ठाणेदारांना अनेकवार या गंभीर समस्येची जाणीव करून देण्यात आली; पण अद्याप कोणतीही कारवाई वाहने वा वाहन चालकांवर झालेली नाही. एखादा मोठा अपघात झाल्यावर कारवाई करणार काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.दुकानदारही ग्राहकांना वाहने रस्त्यावर ठेवू नका, अशा सूचना देत नाहीत. परिणामी वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक धोक्याची झालेली आहे.(तालुका प्रतिनिधी)१५ गावातील नागरिकांसाठी हाच रस्ताकारंजा गोळीबार चौक हा शहरातील मुख्य चौक आहे. हा रस्ता आसपासच्या १५ गावांना जोडणारा आहे. त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते; पण मार्गावरील दुकानांमध्ये खरेदीकरिता आल्यावर वाहनतळाची सोय नसल्याने कुठलाही विचार न करता वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे उर्वरित चिंचोळ्या मार्गावरून इतर वाहन चालकांना वाट काढावी लागते. परिणामी, अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावर अपघाताचा धोका कायमशहरातील मुख्य रस्ता असल्याने येथे वाहनांची वर्दळ असते. बसेसही याच मार्गाने ये-जा करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहेत. शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांनाही जीव मुठीत घेऊन या मार्गावरून जावे लागते. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे; पण ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर वाहने उभी ठेवून वाहतूक रोखणाऱ्यांवर कारवाई करण्यास तयार नाही. यामुळे मोठा अपघात होऊन जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होतो.