शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली

By admin | Updated: November 2, 2016 00:43 IST

गोळीबार चौकातून उमरी - येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने उभी असतात.

विभागाचे दुर्लक्ष : वहिवाट झाली धोक्याची कारंजा (घा.) : गोळीबार चौकातून उमरी - येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने उभी असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरून पादचाऱ्यांना ये जा करणे कठीण झाले आहे. परिणामी, किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहेत.शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे; पण ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर वाहने उभी ठेवून वाहतूक रोखणाऱ्यांवर कारवाई करण्यास तयार नाही. यामुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्यावरून १५ गावांतील नागरिक ये-जा करीत असतात. कारंजा गोळीबार चौकातून उमरी-येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक प्रकारची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये येणारे ग्राहक राजरोसपणे दुकानांसमोर भररस्त्यावर वाहने उभी ठेवतात. यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी ही बाब नित्याची झाली आहे. पायी चालणेही कठीण जात असल्याने अनेकदा अपघातही झाले आहेत. दक्षता कमिटीच्या सभेमध्ये ठाणेदारांना अनेकवार या गंभीर समस्येची जाणीव करून देण्यात आली; पण अद्याप कोणतीही कारवाई वाहने वा वाहन चालकांवर झालेली नाही. एखादा मोठा अपघात झाल्यावर कारवाई करणार काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.दुकानदारही ग्राहकांना वाहने रस्त्यावर ठेवू नका, अशा सूचना देत नाहीत. परिणामी वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक धोक्याची झालेली आहे.(तालुका प्रतिनिधी)१५ गावातील नागरिकांसाठी हाच रस्ताकारंजा गोळीबार चौक हा शहरातील मुख्य चौक आहे. हा रस्ता आसपासच्या १५ गावांना जोडणारा आहे. त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते; पण मार्गावरील दुकानांमध्ये खरेदीकरिता आल्यावर वाहनतळाची सोय नसल्याने कुठलाही विचार न करता वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे उर्वरित चिंचोळ्या मार्गावरून इतर वाहन चालकांना वाट काढावी लागते. परिणामी, अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावर अपघाताचा धोका कायमशहरातील मुख्य रस्ता असल्याने येथे वाहनांची वर्दळ असते. बसेसही याच मार्गाने ये-जा करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहेत. शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांनाही जीव मुठीत घेऊन या मार्गावरून जावे लागते. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे; पण ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर वाहने उभी ठेवून वाहतूक रोखणाऱ्यांवर कारवाई करण्यास तयार नाही. यामुळे मोठा अपघात होऊन जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होतो.