शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

व्हीआयपी मार्गावरील वाहतूक असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:23 IST

व्हीआयपी मार्गावर असलेल्या पोत्यांमुळे वाहतूक असुरक्षित झाली आहे. पोती हटवून रस्ता वाहतुकीकरिता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ठळक मुद्देपोत्यांमुळे अपघाताला आमंत्रण : कंत्राटदाराचा हलगर्जीपणा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : व्हीआयपी मार्गावर असलेल्या पोत्यांमुळे वाहतूक असुरक्षित झाली आहे. पोती हटवून रस्ता वाहतुकीकरिता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.विश्रामगृहाशेजारून गेलेल्या, आर्वी मार्गाला जोडणाऱ्या व्हीआयपी मार्गावर खड्डयांनी जाळे विणल्याने येथून वाहनचालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. रात्री रस्त्यावरील खड्डे दृष्टीस पडत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत होत्या. बहुप्रतिक्षित या मार्गाच्या सिमेंटीकरणाला मंजुरी मिळाली असून काम मागील काही महिन्यांपासून प्रगतिपथावर आहे.रस्त्याचे काही प्रमाणात सिमेंटीकरण झाले असून रहदारीदेखील सुरू झाली आहे. रस्त्यावर उन्हाळ्यात पाणी जिरावे याकरिता पोती टाकण्यात आली होती. पावसाळा सुरू असतानादेखील ती पोती रस्त्यावरच असून अनेक ठिकाणी जमा झाल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला असून कुजल्यामुळे या परिसरातील वातावरण दुर्गंधीमय झाले आहे. दिवसा आणि रात्री उशिरापर्यंत या मार्गावर मोठी वर्दळ असते. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निवासस्थानेही याच परिसरात आहेत. या सर्वांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.पोत्यांमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याचाच वाहनचालकांना भास होतो. पोत्यांवरून वाहने अडखळत असून दररोज किरकोळ असपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्याचे पुढील काम सुरू असून संबंधित कंत्राटदाराला ही पोती उचलण्याचा विसर पडला आहे. यामुळे वाहनचालकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्यावरील पोती तत्काळ उचलण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक, वाहनचालकांतून होत आहे.विकासकामांत नियोजनाचा अभावशहरात विविध ठिकाणी युद्धपातळीवर विकासकामे सुरू आहेत. मात्र, नियोजनाचा प्रचंड अभाव आहे. कुठे वीजखांब, रोहित्र न हलविताच रस्त्याचे काम सुरू आहेत. तर कुठे काम झाल्यावरही रस्त्यावर बांधकाम व तत्सम साहित्य पडून आहे. याशिवाय कामांचा दर्जा म्हणावा तसा नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचा याकडे कानाडोळा आहे. अधिकारी, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमतातून सर्वत्र गडबड घोटाळा सुरू आहे. विकासकामे सोईची ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरताना दिसून येत असून नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक