शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उभ्या वाहनांमुळे वाहतुकीचा पचका

By admin | Updated: March 15, 2015 02:02 IST

शहरातील मुख्य चौक तसेच रहदारीच्या रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. शिवाय आॅॅटोचालक वाहन रस्त्यावरच उभे करीत असल्याने अपघाताच्या घटना घडतात.

वर्धा : शहरातील मुख्य चौक तसेच रहदारीच्या रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. शिवाय आॅॅटोचालक वाहन रस्त्यावरच उभे करीत असल्याने अपघाताच्या घटना घडतात. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो, शिवाय मुख्य मार्गावर वाहतूक विस्कळीत होते. या प्रकाराला ळा घालण्याची मागणी अखिल भारतीय बापू युवा संगठन यांच्यावतीने वाहतूक नियंत्रण विभाग व संबंधीतांकडे करण्यात आली आहे. शहरातील बजाज चौक ते वळण मार्गापर्यंत तसेच शास्त्री चौक ते आर्वी नाक्यापर्यंत या मार्गावर सतत वर्दळ असते. याच मार्गावर दवाखाने, बँक कार्यालय, शाळा, मकाविद्यालयांची संख्या अधिक आहेत. त्यामुळे याच मार्गे आॅटो अधिक धावतात. शिवाय रस्त्याच्यालगत वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे अर्धाअधिक रस्ता हा पार्कींगमध्ये व्याप्त होतो. यामुळे रहदारी करण्याकरिता रस्ता उरत नाही. यात काहीइ युवक वाहन वेगाने चालवित असल्याने अरूंद झालेल्या या मार्गातून आवागमन करणे धोक्याचे ठरते. दुचाकी वाहन वेगाने चालविणाऱ्या या वाहन धारकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवाय आॅॅटोचालक प्रवासी दिसताच रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करतात. कधीतर वेगात असताना ब्रेक मारून आॅटो थांबविला जातो. यामुळे मागाहुन येत असलेल्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटुन अपघात होता. या प्रकारात काही गंभीर अपघात झाले आहे. हा प्रकार वादाला कारणीभूत असतो.चौकाचौकात कुठेही आॅटो उभे केले जाते. याकरिता वाहनतळ निश्चित करून द्यावे. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार नाही. शिवाय सर्वसामान्यांना सुरक्षित रहदारीकरिता उपाययोजनेची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)