शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
4
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
5
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
6
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
7
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
8
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
9
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
10
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
11
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
12
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
13
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
14
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
15
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
16
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
17
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
18
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
19
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
20
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

परंपरा व आधुनिकता या परस्परपूरक आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 10:26 PM

भारतीय परंपरा सर्वसमावेशक आहे. या महान परंपरेच्या आधारावर आधुनिकतेकडे वाटचाल करताना काळानुरूप बदल स्वीकारत गतीशीलता प्राप्त करणे गरजेचे आहे. अन्यथा आपण स्थितीशील होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे विश्वरूप नारायण : शिक्षा मंडळाद्वारे परिसंवाद, काळानुरूप बदल स्वीकारत गतीशीलता प्राप्त करणे गरजेच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय परंपरा सर्वसमावेशक आहे. या महान परंपरेच्या आधारावर आधुनिकतेकडे वाटचाल करताना काळानुरूप बदल स्वीकारत गतीशीलता प्राप्त करणे गरजेचे आहे. अन्यथा आपण स्थितीशील होण्याची शक्यता आहे. परंपरा आपणाला अनुभवाचा आधार देतात व यामुळे आपणास आधुनिक स्वप्ने सत्यात आणणे शक्य होऊ शकते. नवीन पिढीने परंपरा व आधुनिकता यांचा योग्य समन्वय साधायला हवा. परंपरा व आधुनिकता या दोन्ही परस्परपूरक संकल्पना आहे, असे विचार २०१४ चा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारा दिला जाणारा ‘ग्लोबल यंग लिडर’ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध वित्त व्यावसायिक व श्रीमन्नारायण यांचे नातू विश्वरूप नारायण मुंबई यांनी व्यक्त केले.बजाज इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, पिपरी येथे शिक्षा मंडळाद्वारे ‘आधुनिकता आणि परंपरा’ विषयावर आयोजित ४४ व्या कमलनयन बजाज स्मृती आंतरविश्वविद्यालयीन परिसंवादात बोलत होते. मंचावर शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव, सहसचिव पुरूषोत्तम खेमका, परीक्षक क्यू.एच. जीवाजी नागपूर, सुजाथा नायक आंध्रप्रदेश-तेलंगाना, डॉ. अनिल दुबे वर्धा, परिसंवादाचे समन्वयक डॉ. शेषराव बावनकर व प्राचार्य डॉ. एन.वाय. खंडाईत उपस्थित होते.परिसंवादाची सुरूवात स्व. कमलनयन बजाज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून व जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. नारायण पूढे म्हणाले की, भारताने परंपरेबरोबरच आधुनिक विचारांनाही नेहमीच महत्त्व दिले आहे. ज्ञानेश्वर वसुधैव ज्ञानेश्वरांची वसुधैव कुटुंबकम, विश्वात्मक देव ही संकल्पनाही आधुनिक आहे. विनोबांनीही सदैव नित्यनूतनाची कल्पना मांडली आहे. आधुनिक विज्ञान आज जगाची उभारणी करीत आहे. वैचारिक स्वातंत्र्याचे मूल्य आम्हाला आधुनिक विकासाकडे नेण्यात मोलाची भूमिका निभावेल.भार्गव म्हणाले की, भारताला अनेक वर्षे पारतंत्र्यात राहावे लागल्याने स्वातंत्र्यानंतर आधुनिक परिस्थितीशी जुळवून घेताना बरीच तडजोड करावी लागली. या स्थितीत आधुनिकतेच्या प्रभावाखाली येण्यापासून स्वत:ला वाचविणे अत्यंत कठीण होते. आपल्या सारखीच परिस्थिती जपान व चीन या देशांनी अनुभवली आहे. देशहितासाठी तर्कसंगत व स्पष्ट विचारसरणी, विश्वास व राष्ट्रीय बांधिलकी महत्त्वाची आहे. आता ही जबाबदारी नवतरूणांच्या खांद्यावर आहे.डॉ. जीवाजी यांनी कालबाह्य परंपरांना नाकारून विवेकाधिष्ठीत आधुनिकता स्वीकारणे गरजेचे आहे. प्रत्येक स्पर्धकाने विषयाचे तार्किक विश्लेषण केले. जिंकण्यपेक्षा स्पर्धेत सहभाग अघिक महत्त्वाचा असतो. वक्तृत्व स्पर्धेत विचार मांडताना विषय मुद्देसूद मांडणे, आवाजातील चढ-उतार, हावभाव व भाषा यावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले. नायक यांनी आधुनिकता ही व्यक्तीच्या विचारांवर अवलंबून असते. वेशभूषेवर नाही. यामुळे आपले विचार स्पष्ट असावे, असे सांगितले.परिसंवादात देशाच्या विविध प्रांतातील २८ स्पर्धकांनी विचार व्यक्त केले. सर्व स्पर्धकांचे सुतमाला घालून स्वागत करण्यात आले. परिसंवादाच्या हिंदी माध्यमाचा प्रथम पुरस्कार त्रिशला पाठक उज्जैन, द्वितीय प्रथम शर्मा हरिद्वार, तृतीय निलाचल हरिद्वार यांना, इंग्रजीचा प्रथम आख्या बाजपायी राजस्थान, द्वितीय स्वाइमा अहमद नागपूर, तृतीय प्रियंका घिल्डियाल गढवाल तर प्रोत्साहनपर पुरस्कार निकिता ओखाडे इंदोर यांना प्राप्त झाला. संचालन प्राचार्य डॉ. खंंडाईत यांनी केले तर आभार डॉ. बावनकर यांनी मानले. कार्यक्रमाला पदाधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते.