शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

टॉवर ठरताहेत माकडांना सुरक्षित ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:50 IST

सध्या शेती हिरवीगार झाली आहे. चणा, गहू व काही प्रमाणात कपाशी, तूर ही पिके शेतात आहेत. परिसरात चणा, गव्हाचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे; पण माकडांच्या उपद्रवामुळे सदर पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : शेतात घालतात धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जा.) : सध्या शेती हिरवीगार झाली आहे. चणा, गहू व काही प्रमाणात कपाशी, तूर ही पिके शेतात आहेत. परिसरात चणा, गव्हाचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे; पण माकडांच्या उपद्रवामुळे सदर पिकांचे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी त्रस्त आहेत.चिकणी, पडेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात अति उच्च विद्युत दाबाच्या टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. सदर टॉवर माकडांचे निवासस्थानच झाले आहे. माकड टॉवरवरच ठाण मांडून बसतात. शेतकरी शेतात असेपर्यंत माकड टॉवरच असतात; पण शेतकरी शेतातून निघताच माकडांचा पिकांमध्ये धुडगूस सुरू होतो. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टॉवरवरून हुसकावण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतात; पण माकडांवर याचा काहीही परिणाम होत नाही. शेतकरी टॉवरवर चढू शकत नसल्याने बांबूचा वापर करून माकडांना टॉवरवरून उतरविण्याचा प्रयत्न केला जातो; पण माकड बांबू पाहून पुन्हा वर चढतात. फटाकेही फोडले जातात. त्या आवाजाला माकडे घाबरतातही; पण केवळ इकडून तिकडे हालचाल करतात. टॉवरच्या खाली उतरत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.अस्मानी व सुल्तानी या दोन्ही संकटानी यंदा शेतकरी खचला आहे. सोयाबीन परतीच्या पावसाने गेले तर कपाशी बोंडअळीने फस्त केले. तुरीही अल्पावधीतच वाळत आहेत. आता चणा, गहू वन्य प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. शासनाकडून शेतमालाला खर्चानुसार भावही मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे.