शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर ठरताहेत माकडांना सुरक्षित ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:50 IST

सध्या शेती हिरवीगार झाली आहे. चणा, गहू व काही प्रमाणात कपाशी, तूर ही पिके शेतात आहेत. परिसरात चणा, गव्हाचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे; पण माकडांच्या उपद्रवामुळे सदर पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : शेतात घालतात धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जा.) : सध्या शेती हिरवीगार झाली आहे. चणा, गहू व काही प्रमाणात कपाशी, तूर ही पिके शेतात आहेत. परिसरात चणा, गव्हाचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे; पण माकडांच्या उपद्रवामुळे सदर पिकांचे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी त्रस्त आहेत.चिकणी, पडेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात अति उच्च विद्युत दाबाच्या टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. सदर टॉवर माकडांचे निवासस्थानच झाले आहे. माकड टॉवरवरच ठाण मांडून बसतात. शेतकरी शेतात असेपर्यंत माकड टॉवरच असतात; पण शेतकरी शेतातून निघताच माकडांचा पिकांमध्ये धुडगूस सुरू होतो. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टॉवरवरून हुसकावण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतात; पण माकडांवर याचा काहीही परिणाम होत नाही. शेतकरी टॉवरवर चढू शकत नसल्याने बांबूचा वापर करून माकडांना टॉवरवरून उतरविण्याचा प्रयत्न केला जातो; पण माकड बांबू पाहून पुन्हा वर चढतात. फटाकेही फोडले जातात. त्या आवाजाला माकडे घाबरतातही; पण केवळ इकडून तिकडे हालचाल करतात. टॉवरच्या खाली उतरत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.अस्मानी व सुल्तानी या दोन्ही संकटानी यंदा शेतकरी खचला आहे. सोयाबीन परतीच्या पावसाने गेले तर कपाशी बोंडअळीने फस्त केले. तुरीही अल्पावधीतच वाळत आहेत. आता चणा, गहू वन्य प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. शासनाकडून शेतमालाला खर्चानुसार भावही मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे.