शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

महावितरण अन् कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. परंतु, कृषी विभागाकडून कुठलाही नियोजनबद्ध कार्यक्रम आखून बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. शिवाय शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जात नसल्याचा आरोप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रहारचा ठिय्या : मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहे. इतकेच नव्हे तर हवालदील झालेल्या शेतकºयांच्या कृषीपंपाला रात्रीच्या सुमारास विद्यृत दिल्या जात आहे. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने सर्वेक्षण करून शासकीय मदत देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसाला विद्युत पुरवठा देण्यात यावा या मुख्य मागणीसाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात प्रहार जनशक्तीपक्षाच्यावतीने बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यातील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. परंतु, कृषी विभागाकडून कुठलाही नियोजनबद्ध कार्यक्रम आखून बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. शिवाय शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जात नसल्याचा आरोप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केला. पूर्वीच परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर दिसून येत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी केले. तर दुसरे आंदोलन महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसाला विद्युत पुरवठा करण्यात यावा. शिवाय रसुलाबाद परिसरातील तक्रारी निकाली काढण्यात याव्या आदी मागण्या या आंदोलनादरम्यान रेटण्यात आल्या. याप्रसंगी अधीक्षक अभियंता वानखेडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. सदर आदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे देवळी विधानसभा प्रमुख तथा रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर बैठक बोलावली होती. याच बैठकीदरम्यान कार्यालयातच ठिय्या देण्यात आला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagricultureशेती