शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

टमाटर आणि पत्ताकोबी १२० रुपये किलो

By admin | Updated: July 17, 2017 02:04 IST

तालुक्यात झालेल्या अल्पशा पावसामुळे भाजीपाला उत्पादन घटले असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे.

किमती दीडपट : नागरिक हैरानलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तालुक्यात झालेल्या अल्पशा पावसामुळे भाजीपाला उत्पादन घटले असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ पोहचत आहे. ३ ते ४ वर्षांपासून वर्धा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे दोन्ही हंगामातील पीक उत्पादन घटले होते. शेतात उपलब्ध असलेल्या पाण्यावर शेतकरी व भाजीपाला उत्पादकांनी भाजीपाला घेतला होता. परंतु गत १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात झाली आहे. गावांत भरणाऱ्या आठवडी बाजारात भाजीपाल्याचे भाव एकदम वधारल्याचे दिसून आले. या बाजारात टमाटर आणि कोबी १२० रुपये किलो दराने विकल्या जात आहे. भाजीपाल्याचे भाव एकदमच वाढलेले पाहून बहुतांश नागरिकांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. वायगाव येथे दर गुरुवारी मोठा बाजार भरतो या बाजारात खेड्यासह विदर्भातील व्यापारी सुद्धा येतात. पावसाला प्रारंभ झाल्याने भाजीपाल्याचे दर कमी होतील असे नागरिकांचे मत आहे. मिरची ५०, वांगे ४० रुपये, फुलकोबी १००, अद्रक ७०, कोथींबीर १३०, पालक ५०, मेथी ४०, कारले ६०, दोडके ५०, गवार ४०, भेंडी ६० रुपये प्रती किलो दराने विक्री होताना दिसत आहे.