शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चार नगरपंचायतीकरिता आज मतदान

By admin | Updated: November 1, 2015 02:29 IST

जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता रविवारी मतदान होणार आहे.

३१९ उमेदवार रिंगणात : ६८ ईव्हीएम मशिन्सचा वापर, मतदारराजा ठरविणार भाग्यवर्धा : जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता रविवारी मतदान होणार आहे. याकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. चारही नगरपंचायतीकरिता एकूण ३१९ उमेदवार रिंगणात असून या पैकी ६८ उमेदवार निवडूण द्यावयाचे आहेत. यात कोणाच्या हाती सत्तेची किल्ली द्यायची हे उद्या मतदार राजा ठरविणार आहे. सेलू, आष्टी, समुद्रपूर व कारंजा येथे होणार असलेल्या निवडणुकीकरिता सर्वच पक्षांनी आपाली आघाडी तयार करून पॅलन रिंगणात उतरविले आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा या राष्ट्रीय पक्षांकडून त्यांच्या नेत्यांच्या प्रचार रॅल्या झाल्या आहेत. या निवडणुकीच्या खुल्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी रात्री थंडावल्या. यानंतर विविध पक्षाच्या नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून छुप्या प्रचाराला सुरुवात झाली. शनिवारची रात्र ‘कत्तल की रात’ म्हणून साऱ्याच पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी काम सुरू केल्याचे दिसून आले. विविध वॉर्डातील मतदाराला आपल्याकडे वळविण्याकरिता ‘साम दाम’चा वापर होत असल्याची चर्चा होती. रविवारी होणाऱ्या मतदानाच्या कार्यात कुठलीही गडबड होऊ नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे कर्मचारी असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांना मतदान करताना अडचण होणार नाही याकरिता प्रत्येक नगरपंचायतीच्या १७ वॉर्डात १७ मतदान केंद्रांमध्ये इव्हीएम मशीन्स देण्यात आल्या आहेत. या मशीनच्या माध्यमातून उद्या मतदारांचे भवितव्य बंद होणार आहे. यात मतदार कुणाला कौल देतात, हे मोजणीनंतरच कळेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)