शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

आजच्या काळात जल संधारणापेक्षा मन संधारणाची गरज

By admin | Updated: September 21, 2016 01:11 IST

समाज हे एक भांडे आहे, जे पाणी एकत्रित करते. यामुळे पाणी वाचविण्यासाठी लोकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.

सत्यजीत भटकल : भारतीय जैन संघटना व पाणी फाऊंडेशनद्वारे जनजागृती कार्यक्रमवर्धा : समाज हे एक भांडे आहे, जे पाणी एकत्रित करते. यामुळे पाणी वाचविण्यासाठी लोकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. पाणी हेच जीवन आहे, आता हे सिद्ध करण्याची गरज राहिली नाही. पाण्याचे संवर्धन केले तर किती तरी पाणी शेती पर्यंत पोहचविता येईल. गाव सशक्त करता येईल. या चळवळीत लोक सहभाग वाढविण्याची गरज आहे. यामुळे आजच्या काळात जल संधारणापेक्षा मन संधारणाची गरज आहे, असे प्रतिपादन 'सत्यमेव जयते' मालिकेचे दिग्दर्शक आणि पाणी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजीत भटकल यांनी केले.भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा शाखा आणि वर्धा चॅप्टरच्या वतीने अनेकांत स्वाध्याय मंदिरात जलसंवर्धन विषयावर स्लाईड शो आणि संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय जल निती आयोगाचे सदस्य माधव कोटस्थाने, संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अमर गांधी, कार्यक्रमाचे समन्वयक अनिल फरसोले, जिल्हाध्यक्ष मनोज श्रावणे, वर्धा चॅप्टरचे अध्यक्ष अभिषेक बेद आदी उपस्थित होते. भारतीय जैन संघटना आणि पाणी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वर्धा तालुक्यातील काही गावांची निवड करून जल संवर्धनाच्या क्षेत्रात भरीव काम करण्यात येणार आहे. शुभांगी विटाळकर, अर्चना भागवतकर, स्वाती ढोबळे यांनी सादर केलेल्या मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. रोपटे देऊन पाहुण्यांचे स्वागत राजेंद्र डागा, प्रसेन संकलेचा, कोषाध्यक्ष विपीन चोरडिया, विनोद ढोबळे, मनीष पांडे, अशोक सावळकर यांनी केले. प्रास्ताविकातून अनिल फरसोले यांनी पाणी फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटनेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी भटकल यांनी स्लाईड शो आणि चल चित्रफितीच्या माध्यमातून पाणी हेच जीवन आहे, त्याचे संवर्धन करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेले कार्य याविषयी माहिती दिली. कोटस्थाने म्हणाले, पाण्याचे महत्त्व सगळ्यांना कळले आहे. शासन स्तरावरही जल संवर्धनासाठी भरीव काम होत आहे. अशा परिस्थितीत लोक सहभागातून सामाजिक संघटनांच्या सहकार्याने जर काम झाले तर गाव सशक्त बनेल. ६० वर्षात हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. कार्यक्रमाचे संचालन वर्धा चॅप्टरचे सचिव राजेश भुसारी यांनी केले. आभार बेद यांनी मानले.(शहर प्रतिनिधी) सत्यमेव जयते वॉटर कपअभिनेता आमीर खानच्या प्रेरणेने स्थापित झालेल्या पाणी फाऊंडेशनच्यावतीने गावांसाठी सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ३० तालुक्यात जल संवर्धनाचे भरीव काम करणाऱ्या ग्राम पंचायतींची या कपसाठी निवड करण्यात येणार आहे. गत वर्षी केवळ तीन तालुक्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गावाला ५० लाख रुपये, द्वितीय ३० आणि तृतीय २० लाखांचे पुरस्कार देण्यात आले होते. मात्र आता त्याची व्याप्ती वाढवून राज्यातील ३० तालुक्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. यात सुमारे ८० लाख नागरिकांना सहभाग असणार आहे. या गावांमध्ये लोक सहभागातून जल संवर्धनाची काम केली जाणार आहे. याद्वारे टँकरमुक्त व दुष्काळमुक्त राज्य बनविण्याकडे वाटचाल करण्यात येत असल्याची माहिती सत्यजीत भटकल यांनी यावेळी दिली.