शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

आजच्या पिढीने वर्ध्याचा इतिहास देशपातळीवर न्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:46 IST

महात्मा गांधी यांनी इंग्रजांना भारतातून जाण्यासाठी चले जावचा नारा दिला. त्याची बैठक वर्धा येथे झाली होती.

ठळक मुद्देरामदास तडस संकल्प से सिद्धी कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांनी इंग्रजांना भारतातून जाण्यासाठी चले जावचा नारा दिला. त्याची बैठक वर्धा येथे झाली होती. याच आंदोलनात आष्टी येथील स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची बाजी लावून पोलीस चौकीवर कब्जा केला. आष्टीच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास तरूण पिढीने देशपातळीवर पोहोचविण्याचे काम करावे, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.केंद्र शासन चले जाव चळवळींचा अमृत महोत्सव देशभर साजरा करीत आहे. यानिमित्ताने संकल्प से सिद्धी कार्यक्रमाचे जिल्हा परिषद सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा जुहीकर, सभापती निता गजाम, सोनाली कलोडे, जयश्री गफाट, मुकेश भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, विपूल जाधव उपस्थित होते.खा. तडस पूढे म्हणाले की, ९ आॅगस्टला चले जाव चळवळीस ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र शासनाद्वारे २०२२ पर्यंत देशाच्या प्रत्येक नागरिकांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी नागरिकांच्या विकासासाठी संकल्प करावा. सर्व जाती, धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन देश महासत्ता बनविण्यासाठी संकल्प करण्याची गरज आहे. प्रत्येकाला स्वत:चे घर व्हावे ही इच्छा असते. यासाठी केंद्र शासनाद्वारे २०२२ पर्यंत प्रत्येकाला स्वत:चे घर देण्यात येणार आहे. घर बांधकामासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात बांधकामाची रक्कम भेट जमा करण्यात येणार आहे. नागरिकांना पासपोर्टसाठी नागपूर येथे जावे लागते. केंद्राकडे पाठपुरावा केल्याने वर्धा येथे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली असून लवकरच ते सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.नितीन मडावी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामीण भागाचा विकास करण्याचे ठरविले आहे. २०२२ पर्यंत नागरिकांचा विकास करण्याचे दायित्व स्वीकारले पाहिजे, असे आवाहनही केले.यावेळी निता गजाम, कांचन नांदूरकर व विवेक इलमे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, जि.प. खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.आमदार, जि.प. सदस्यांची अनुपस्थितीभारतात ९ आॅगस्ट १९४२ रोजी चले जाव चळवळ सुरू झाली. या चळवळीचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त २१ ते २५ आॅगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात पंचायत संमेलन घेण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले. यानुसार जिल्हा परिषदेत बुधवारी पंचायत संमेलन घेण्यात आले; पण वेळेवर कार्यक्रम आयोजित केल्याने निमंत्रण पोहोचू शकले नाही. यामुळे चार आमदारांसह जि.प. सदस्य कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याचे दिसून आले.शासनाच्या पत्रातही चूकदेशात चले जावची चळवळ ९ आॅगस्ट १९४२ रोजी सुरू झाली. या चळवळीचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच अनुषंगाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पत्र काढण्यात आले; पण राज्य सचिव असीम गुप्ता यांनी काढलेल्या पत्रात ९ आॅगस्ट १९४७ रोजी चले जावची चळवळ सुरू झाल्याचा उल्लेख केला आहे. शासनाच्या सचिवाकडून ही चुक झाल्याचे दिसते.चारही आमदारांसह सर्व जि.प. सदस्यांना निमंत्रण देण्यात आले होते. सुकळी (स्टेशन) येथे कार्यक्रम असल्याने आ.डॉ. भोयर व काही सदस्य तिकडे होते. विरोधी गटातील सदस्यांनाही निमंत्रण दिले. तरी ते अनुपस्थित राहिले.- नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा.