शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

आजची विकासनीती खासगीकरणास पोषक

By admin | Updated: February 24, 2016 02:16 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकात, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांना विशेष महत्त्व दिले.

जोगेंद्र गवई : ‘विकासनीती व भारतीय संविधान’वर व्याख्यानवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकात, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांना विशेष महत्त्व दिले. भारतीय राजकीय व्यवस्थेचा मुख्य उद्देश सामाजिक न्यायातून कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे हा होता. त्यामुळे त्यांनी राजकीय लोकशाहीपेक्षा सामाजिक व आर्थिक लोकशाही महत्त्वाची मानली. पण सध्याची विकासाची नीती जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाला प्राधान्य देणारी व शोषित, पीडित, वंचित, घटकांना विकासापासून वंचित ठेवणारी असल्याचे मत रातुम नागपूर विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जोेगेंद्र गवई यांनी व्यक्त केले. स्थानिक यशवंत महाविद्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव वर्षानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात ‘विकासनीती व भारतीय संविधान’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या विधी विभागाचे प्रमुख डॉ. अशोक पावडे, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय बोबडे आदी उपस्थित होते.डॉ. गवई म्हणाले, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या ६५ टक्के शेतकरी व शेतमजुरांच्या मतांवर निवडून येणारे प्रतिनिधी कायदेमंडळामध्ये भांडवलदारांच्या हिताचा विचार करून धोरणे राबवितात. त्यामुळेच बँकांमार्फत भांडवलदारांनी घेतलेल्या कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले. पण शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी भाग पाडले जात आहे. एकूणच सर्वत्र ही विसंगत स्थिती आज सर्वत्र दिसून येत आहे. डॉ. आंबेडकरांनी सूचविलेली समाजवादी राज्याची संकल्पना संविधानात समाविष्ट केली असती, तर खऱ्या अर्थाने सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली असती असेही ते यावेळी म्हणाले.डॉ. पावडे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे ही सामाजिक, आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहे. परंतु राज्यकर्त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोणतेही राज्यकर्ते असो त्यांना संविधानाप्रमाणे चालावेच लागेल. यासाठी प्रत्येक नागरिकांनी संविधानाविषयी जागृत असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.प्राचार्य डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकेतून डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त महाविद्यालयातून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकर व भारतीय संविधान याविषयी प्रत्येकाने जागृत राहणे आवश्यक आहे. यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात असल्याचेही ते म्हणाले. डॉ. बोबडे यांनी विषयासंबंधी भूमिका मांडली व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संचालन प्रा. रवींद्र बेले यांनी केले. आभार प्रा. सुचिता रायपुरे यांनी मानले. कार्यक्रमाला यशवंत ग्रामीण संस्थेचे संचालक प्रकाश ढांगे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायण सोनवणे, प्राचार्य व्ही. के. पांडे, बाबासाहेब बेले, प्रदीप दाते उपस्थित होते. यशस्वीतेकरिता प्रा. दिलीप देशमुख, प्रा. एकनाथ, मुरकुटे, प्रा. प्रमोद नारायणे, डॉ. यु. बी.पारेकर, डॉ. वीरेंद्र बैस, प्रा. नरेश कवाडे, प्रा. संदीप चव्हाण, डॉ. संजय धोटे, प्रा. बुद्धघोष लोहकरे, प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे, प्रा. भटकर, प्रा.धनवीज यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)