शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

आजची विकासनीती खासगीकरणास पोषक

By admin | Updated: February 24, 2016 02:16 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकात, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांना विशेष महत्त्व दिले.

जोगेंद्र गवई : ‘विकासनीती व भारतीय संविधान’वर व्याख्यानवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकात, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांना विशेष महत्त्व दिले. भारतीय राजकीय व्यवस्थेचा मुख्य उद्देश सामाजिक न्यायातून कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे हा होता. त्यामुळे त्यांनी राजकीय लोकशाहीपेक्षा सामाजिक व आर्थिक लोकशाही महत्त्वाची मानली. पण सध्याची विकासाची नीती जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाला प्राधान्य देणारी व शोषित, पीडित, वंचित, घटकांना विकासापासून वंचित ठेवणारी असल्याचे मत रातुम नागपूर विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जोेगेंद्र गवई यांनी व्यक्त केले. स्थानिक यशवंत महाविद्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव वर्षानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात ‘विकासनीती व भारतीय संविधान’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या विधी विभागाचे प्रमुख डॉ. अशोक पावडे, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय बोबडे आदी उपस्थित होते.डॉ. गवई म्हणाले, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या ६५ टक्के शेतकरी व शेतमजुरांच्या मतांवर निवडून येणारे प्रतिनिधी कायदेमंडळामध्ये भांडवलदारांच्या हिताचा विचार करून धोरणे राबवितात. त्यामुळेच बँकांमार्फत भांडवलदारांनी घेतलेल्या कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले. पण शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी भाग पाडले जात आहे. एकूणच सर्वत्र ही विसंगत स्थिती आज सर्वत्र दिसून येत आहे. डॉ. आंबेडकरांनी सूचविलेली समाजवादी राज्याची संकल्पना संविधानात समाविष्ट केली असती, तर खऱ्या अर्थाने सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली असती असेही ते यावेळी म्हणाले.डॉ. पावडे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे ही सामाजिक, आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहे. परंतु राज्यकर्त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोणतेही राज्यकर्ते असो त्यांना संविधानाप्रमाणे चालावेच लागेल. यासाठी प्रत्येक नागरिकांनी संविधानाविषयी जागृत असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.प्राचार्य डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकेतून डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त महाविद्यालयातून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकर व भारतीय संविधान याविषयी प्रत्येकाने जागृत राहणे आवश्यक आहे. यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात असल्याचेही ते म्हणाले. डॉ. बोबडे यांनी विषयासंबंधी भूमिका मांडली व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संचालन प्रा. रवींद्र बेले यांनी केले. आभार प्रा. सुचिता रायपुरे यांनी मानले. कार्यक्रमाला यशवंत ग्रामीण संस्थेचे संचालक प्रकाश ढांगे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायण सोनवणे, प्राचार्य व्ही. के. पांडे, बाबासाहेब बेले, प्रदीप दाते उपस्थित होते. यशस्वीतेकरिता प्रा. दिलीप देशमुख, प्रा. एकनाथ, मुरकुटे, प्रा. प्रमोद नारायणे, डॉ. यु. बी.पारेकर, डॉ. वीरेंद्र बैस, प्रा. नरेश कवाडे, प्रा. संदीप चव्हाण, डॉ. संजय धोटे, प्रा. बुद्धघोष लोहकरे, प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे, प्रा. भटकर, प्रा.धनवीज यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)