शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

तुरीचे २८.७२ कोटींचे चुकारे अद्याप थकितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:54 IST

हमी भावाच्या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांची तूर शासकीय खरेदी यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या नाफेडला दिली. नियमानुसार दहा दिवसांच्या आत चुकारे देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना तब्बल दीड महिना चुकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागली. आजच्या स्थितीत अजूनही २८.२४ कोटी रुपयांचे थकले आहे.

ठळक मुद्दे११८ शेतकऱ्यांना मिळाले ६२.७१ लाख रुपये : इतर शेतकºयांना अद्याप रकमेची प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हमी भावाच्या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांची तूर शासकीय खरेदी यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या नाफेडला दिली. नियमानुसार दहा दिवसांच्या आत चुकारे देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना तब्बल दीड महिना चुकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागली. आजच्या स्थितीत अजूनही २८.२४ कोटी रुपयांचे थकले आहे. यामुळे शेतकऱ्यांना या चुकाºयाकरिता आणखी बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत २९ कोटी ७२ लाख २९ हजार १०२ रुपयांची तूर खरेदी झाली. मात्र या चुकाऱ्यापोटी जिल्ह्यातील केवळ ११८ शेतकऱ्यांनी चुकाऱ्यापोटी ६२ लाख ७१ हजार २५३ रुपये मिळाले असल्याची माहिती आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना लवकरच चुकारे मिळतील असे सांगण्यात येत आहे. खरेदी प्रमाणे चुकारेही आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे पूर्ण चुकारे होण्याकरिता आणखी किती दिवस लागतील हे सांगणे कठीण आहे.यंदाचा खरीप हंगामात कापूस गेल्याने शेतकऱ्यांना तुरीपासून लाभ होईल असे वाटले होते. उत्पादन निघण्याच्या काळातच वातावरणात बदल झाल्याने तुरीच्या उत्पादनात कमालीची घट झाली. यातच शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच भाव पडण्याचा अलिखित नियम कायम राहिल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी दरात तूर खरेदी झाली. यामुळे शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदीचे केंद्र सुरू करण्याची मागणी झाली.शेतकऱ्यांच्या मागणीअंती जिल्ह्यात सात केंद्रावरून तूर खरेदी झाली. यात एकूण २९ कोटी ७२ लाख २९ हजार १०२.५० रुपयांची तूर खरेदी झाली. मात्र शेतकऱ्यांना चुकाऱ्यांकरिता प्रतीक्षा करावी लागली. अनेक सामाजिक संघटनांकडून शासनाला निवेदन देत शेतकऱ्यांचे अडलेले चुकारे देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यात आता चुकारे मिळणे सुरू झाले असून जिल्ह्यात केवळ ११८ शेतकऱ्यांना ६२.७१ लाख रुपये मिळाले आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना अद्याप प्रतरक्षा करावी लागणार असल्याचे दिसून आले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या तुरीची नोंद नाहीजिल्ह्यात गोदामाची समस्या निर्माण झाल्याने बरीच तूर अद्यापही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातच पडून आहे. ही तूर नाफेडच्या गोदामात गेली नाही. यामुळे या शेतकऱ्यांच्या तुरीची नोंद नाफेडकडे झाली नाही. परिणामी, त्यांच्या तुरीची अद्याप नाफेडकडे नोंद झाली नाही. यामुळे त्यांच्या चुकाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. यातच आता गोदामाची समस्या निर्माण झाल्याने त्यांच्या तुरीची नोंद केव्हा होईल, हे सांगणे कठीण आहे.गोदामाच्या समस्येत जिल्ह्यात चणा खरेदीला प्रारंभजिल्ह्यात तुरीची खरेदी सुरू असतानाच तीन केंद्रावरून चण्याची खरेदी सुरू झाली आहे. तुरीच्या खरेदीमुळे शासकीय गोदात फुल्ल असल्याने खरेदी झालेला चणा कुठे ठेवावा, अशा विवंचनेत जिल्ह्याची खरेदी यंत्रणा आहे. यामुळे शेतकऱ्यांची होरपळ होत असून त्यांना गरजेपोटी व्यापाऱ्यांना कमी दरात चणा द्यावा लागत आहे. चण्याचा शासकीय दर ४ हजार ४०० रुपये असताना व्यापाºयांना साडेतीन हजाराच्या आसपास चणा विकावा लागत आहे.केवळ २२२ शेतकऱ्यांची नोंदणीशासनाला चणा देण्याकरिता शेतकरी पाठ दाखवित असल्याचे दिसून आले आहे. शेतमालाची आॅनलाईन पद्धतीने खरेदी होत असली तरी आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २२२ शेतकऱ्यांनीच नोंद केल्याची माहिती आहे.