शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

तुरीचे २८.७२ कोटींचे चुकारे अद्याप थकितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:54 IST

हमी भावाच्या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांची तूर शासकीय खरेदी यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या नाफेडला दिली. नियमानुसार दहा दिवसांच्या आत चुकारे देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना तब्बल दीड महिना चुकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागली. आजच्या स्थितीत अजूनही २८.२४ कोटी रुपयांचे थकले आहे.

ठळक मुद्दे११८ शेतकऱ्यांना मिळाले ६२.७१ लाख रुपये : इतर शेतकºयांना अद्याप रकमेची प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हमी भावाच्या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांची तूर शासकीय खरेदी यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या नाफेडला दिली. नियमानुसार दहा दिवसांच्या आत चुकारे देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना तब्बल दीड महिना चुकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागली. आजच्या स्थितीत अजूनही २८.२४ कोटी रुपयांचे थकले आहे. यामुळे शेतकऱ्यांना या चुकाºयाकरिता आणखी बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत २९ कोटी ७२ लाख २९ हजार १०२ रुपयांची तूर खरेदी झाली. मात्र या चुकाऱ्यापोटी जिल्ह्यातील केवळ ११८ शेतकऱ्यांनी चुकाऱ्यापोटी ६२ लाख ७१ हजार २५३ रुपये मिळाले असल्याची माहिती आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना लवकरच चुकारे मिळतील असे सांगण्यात येत आहे. खरेदी प्रमाणे चुकारेही आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे पूर्ण चुकारे होण्याकरिता आणखी किती दिवस लागतील हे सांगणे कठीण आहे.यंदाचा खरीप हंगामात कापूस गेल्याने शेतकऱ्यांना तुरीपासून लाभ होईल असे वाटले होते. उत्पादन निघण्याच्या काळातच वातावरणात बदल झाल्याने तुरीच्या उत्पादनात कमालीची घट झाली. यातच शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच भाव पडण्याचा अलिखित नियम कायम राहिल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी दरात तूर खरेदी झाली. यामुळे शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदीचे केंद्र सुरू करण्याची मागणी झाली.शेतकऱ्यांच्या मागणीअंती जिल्ह्यात सात केंद्रावरून तूर खरेदी झाली. यात एकूण २९ कोटी ७२ लाख २९ हजार १०२.५० रुपयांची तूर खरेदी झाली. मात्र शेतकऱ्यांना चुकाऱ्यांकरिता प्रतीक्षा करावी लागली. अनेक सामाजिक संघटनांकडून शासनाला निवेदन देत शेतकऱ्यांचे अडलेले चुकारे देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यात आता चुकारे मिळणे सुरू झाले असून जिल्ह्यात केवळ ११८ शेतकऱ्यांना ६२.७१ लाख रुपये मिळाले आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना अद्याप प्रतरक्षा करावी लागणार असल्याचे दिसून आले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या तुरीची नोंद नाहीजिल्ह्यात गोदामाची समस्या निर्माण झाल्याने बरीच तूर अद्यापही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातच पडून आहे. ही तूर नाफेडच्या गोदामात गेली नाही. यामुळे या शेतकऱ्यांच्या तुरीची नोंद नाफेडकडे झाली नाही. परिणामी, त्यांच्या तुरीची अद्याप नाफेडकडे नोंद झाली नाही. यामुळे त्यांच्या चुकाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. यातच आता गोदामाची समस्या निर्माण झाल्याने त्यांच्या तुरीची नोंद केव्हा होईल, हे सांगणे कठीण आहे.गोदामाच्या समस्येत जिल्ह्यात चणा खरेदीला प्रारंभजिल्ह्यात तुरीची खरेदी सुरू असतानाच तीन केंद्रावरून चण्याची खरेदी सुरू झाली आहे. तुरीच्या खरेदीमुळे शासकीय गोदात फुल्ल असल्याने खरेदी झालेला चणा कुठे ठेवावा, अशा विवंचनेत जिल्ह्याची खरेदी यंत्रणा आहे. यामुळे शेतकऱ्यांची होरपळ होत असून त्यांना गरजेपोटी व्यापाऱ्यांना कमी दरात चणा द्यावा लागत आहे. चण्याचा शासकीय दर ४ हजार ४०० रुपये असताना व्यापाºयांना साडेतीन हजाराच्या आसपास चणा विकावा लागत आहे.केवळ २२२ शेतकऱ्यांची नोंदणीशासनाला चणा देण्याकरिता शेतकरी पाठ दाखवित असल्याचे दिसून आले आहे. शेतमालाची आॅनलाईन पद्धतीने खरेदी होत असली तरी आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २२२ शेतकऱ्यांनीच नोंद केल्याची माहिती आहे.