शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत 43 भूमिहीन झाले भूस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेेला सन २००४-०५ पासून राज्यात सुरुवात करण्यात आली. अनुसूचित जाती व नवबैाद्ध प्रवर्गातील दारिद्र रेषेखालील भूमिहीनांना कोरडवाहू ४ एकर तर ओलीताची २ एकर जमीन प्रांरभी ५० टक्के अनुदानावर दिली जात होती. मात्र, १४ ऑगस्ट २०१८ पासून शंभर टक्के अनुदानावर जमीन देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आता शंभर टक्के अनुदानावर जमीन दिल्या जात आहे. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जवळपास १२० भूमिहीन भूस्वामी झाले आहेत.

ठळक मुद्देकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेंतर्गत मिळाला लाभ

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षामध्ये अनुसूचित जाती व नवबैाद्ध घटकातील दारिद्र रेषेखालील ४३ भूमिहीन शेतकऱ्यांना कसायला जमीन मिळाल्याने आता ते जमीन मालक झाले आहे. या जमिनीमुळे त्यांना उत्पादनाचे साधन मिळाले आहे.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेेला सन २००४-०५ पासून राज्यात सुरुवात करण्यात आली. अनुसूचित जाती व नवबैाद्ध प्रवर्गातील दारिद्र रेषेखालील भूमिहीनांना कोरडवाहू ४ एकर तर ओलीताची २ एकर जमीन प्रांरभी ५० टक्के अनुदानावर दिली जात होती. मात्र, १४ ऑगस्ट २०१८ पासून शंभर टक्के अनुदानावर जमीन देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आता शंभर टक्के अनुदानावर जमीन दिल्या जात आहे. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जवळपास १२० भूमिहीन भूस्वामी झाले आहेत. प्रारंभी कोरडवाहू व ओलीताच्या जमिनीकरिता सरसकट एकरी तीन लाख रुपये मिळत होते.  आता नवीन आदेशानुसार कोरडवाहूकरिता ५ लाख रुपये तर ओलीताच्या जमिनीकरिता ८ लाख रुपये अनुदान मिळतात. या योजनेकरिता जमिन विकत घेणे आणि लाभार्थ्यांना वाटप करणे याकरिता तालुका स्तरीय व जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असून जिल्हा स्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. शासनाकडून जमिनीला मिळणारे दर कमी असल्याने या योजनेकरिता जमिनी देणाऱ्यांचीही संख्या कमी आहे. विशेषत: शासनाचे निकष तपासूनच जमीन खरेदी केली जातात. जिल्ह्यात काही मोजक्याच तालुक्यातून प्रस्ताव येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही योजना जिल्ह्याकरिता असून जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील जमिनीचे प्रस्ताव यावे आणि इतरही तालुक्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता प्रशासन प्रयत्नरत आहेत.

जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील जमीन या योजनेकरिता मिळावी, याकरिता विभागचे प्रयत्न आहेत. तसेच भूमिहीनांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे, याकरिता जास्तीत जास्त अनुसूचीत जातीतील लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न असणार आहे. गेल्या तीन वर्षात ४३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून ते शेती कसत आहेत.प्रसाद कुळकर्णी, सहायक आयुक्त, समाजकल्याण

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंर्गत मला गावापासून दीड किलोमीटर अंतरावरच चार एकर जमिन मिळाली आहे. टाकळी (दरणे) शिवारात शेती असून मोलमजुरी आणि जमिनीच्या भरोवशावर सहा जणांच कुटुंब सांभाळत आहे. या जमिनीमुळे मोठा आधार मिळाला आहे.वसंता खांडस्कर, लाभार्थी, अल्लीपूर

टॅग्स :agricultureशेती