शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

तीन वर्षांत 43 भूमिहीन झाले भूस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेेला सन २००४-०५ पासून राज्यात सुरुवात करण्यात आली. अनुसूचित जाती व नवबैाद्ध प्रवर्गातील दारिद्र रेषेखालील भूमिहीनांना कोरडवाहू ४ एकर तर ओलीताची २ एकर जमीन प्रांरभी ५० टक्के अनुदानावर दिली जात होती. मात्र, १४ ऑगस्ट २०१८ पासून शंभर टक्के अनुदानावर जमीन देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आता शंभर टक्के अनुदानावर जमीन दिल्या जात आहे. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जवळपास १२० भूमिहीन भूस्वामी झाले आहेत.

ठळक मुद्देकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेंतर्गत मिळाला लाभ

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षामध्ये अनुसूचित जाती व नवबैाद्ध घटकातील दारिद्र रेषेखालील ४३ भूमिहीन शेतकऱ्यांना कसायला जमीन मिळाल्याने आता ते जमीन मालक झाले आहे. या जमिनीमुळे त्यांना उत्पादनाचे साधन मिळाले आहे.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेेला सन २००४-०५ पासून राज्यात सुरुवात करण्यात आली. अनुसूचित जाती व नवबैाद्ध प्रवर्गातील दारिद्र रेषेखालील भूमिहीनांना कोरडवाहू ४ एकर तर ओलीताची २ एकर जमीन प्रांरभी ५० टक्के अनुदानावर दिली जात होती. मात्र, १४ ऑगस्ट २०१८ पासून शंभर टक्के अनुदानावर जमीन देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आता शंभर टक्के अनुदानावर जमीन दिल्या जात आहे. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जवळपास १२० भूमिहीन भूस्वामी झाले आहेत. प्रारंभी कोरडवाहू व ओलीताच्या जमिनीकरिता सरसकट एकरी तीन लाख रुपये मिळत होते.  आता नवीन आदेशानुसार कोरडवाहूकरिता ५ लाख रुपये तर ओलीताच्या जमिनीकरिता ८ लाख रुपये अनुदान मिळतात. या योजनेकरिता जमिन विकत घेणे आणि लाभार्थ्यांना वाटप करणे याकरिता तालुका स्तरीय व जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असून जिल्हा स्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. शासनाकडून जमिनीला मिळणारे दर कमी असल्याने या योजनेकरिता जमिनी देणाऱ्यांचीही संख्या कमी आहे. विशेषत: शासनाचे निकष तपासूनच जमीन खरेदी केली जातात. जिल्ह्यात काही मोजक्याच तालुक्यातून प्रस्ताव येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही योजना जिल्ह्याकरिता असून जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील जमिनीचे प्रस्ताव यावे आणि इतरही तालुक्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता प्रशासन प्रयत्नरत आहेत.

जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील जमीन या योजनेकरिता मिळावी, याकरिता विभागचे प्रयत्न आहेत. तसेच भूमिहीनांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे, याकरिता जास्तीत जास्त अनुसूचीत जातीतील लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न असणार आहे. गेल्या तीन वर्षात ४३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून ते शेती कसत आहेत.प्रसाद कुळकर्णी, सहायक आयुक्त, समाजकल्याण

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंर्गत मला गावापासून दीड किलोमीटर अंतरावरच चार एकर जमिन मिळाली आहे. टाकळी (दरणे) शिवारात शेती असून मोलमजुरी आणि जमिनीच्या भरोवशावर सहा जणांच कुटुंब सांभाळत आहे. या जमिनीमुळे मोठा आधार मिळाला आहे.वसंता खांडस्कर, लाभार्थी, अल्लीपूर

टॅग्स :agricultureशेती