समुद्रपूर : तालुक्यातील धुम्मनखेडा येथील शेतातल्या विहिरीत पडलेल्या तीन नीलगार्इंना युवकांच्या प्रसंगावधानाने जीवदान मिळाले.धुम्मनखेडा येथील मारोतराव तोडासे यांच्या शेतातील विहिरीत तीन नीलगाई पडल्या होत्या. याबाबतची माहिती स्वप्निल चोरडिया यांना मिळाली. त्यांनी तातडीने वनविभागाचे कर्मचारी एस.ए.कापकर यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी विकास चौधरी, यशवंत बेहते, सुधाकर चौधरी व सहकारी वनकर्मी घटनास्थळी पोहोचले.विहिरीत तीन रोही पडल्याचे त्यांना दिसले. त्यांना बाहेर काढण्यास जेसीबीची गरज असल्याने रवींद्र महाकाळकर यांना माहिती देऊन जेसीबी बोलावण्यात आले. जेसीबीच्या मदतीने तीनही नीलगार्इंना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना धुम्मनखेडा येथील युवक मंगेश महाकाळकर, हरिओमबाबा गोशाळेचे कर्मचारी आदींनी सहकार्य केले. वेळीच युवकांना माहिती मिळाल्याने तीनही नीलगार्इंचे प्राण वाचले.(तालुका प्रतिनिधी)
विहिरीत पडलेल्या तीन नीलगार्इंना जीवदान
By admin | Updated: March 3, 2016 02:16 IST