शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांतच खांब धाराशाही

By admin | Updated: June 27, 2015 02:45 IST

प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना पावसाळ्याआधी विद्युत जोडणी द्या, अन्यथा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, ...

देवळी : प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना पावसाळ्याआधी विद्युत जोडणी द्या, अन्यथा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कंत्राटदारांनीही कारवाईच्या भीतीपोटी वीजजोडणीचे काम हाती घेवून काही भागात ते पूर्णत्वास नेले. पण पहिल्याच पावसात विद्युत खांबांनी जमिनीवर लोळण घेतली आहे. तर काही तारांच्या जोरावर लोंबकळत आहे. तीन महिन्यांच्या कालावधीतच हे खांब पडल्याने ऐन हंगामात देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांची पेरणी आणि मशागतीची काम खोळंबली आहे.शेकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सिंचनाची आवश्यकता असल्याने शासनाच्या जलपूर्ती आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे दहा शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरी देण्यात आल्या. या सिंचन विहिरीवरील कृषी पंपांना विद्युत पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र्र राज्य विद्युत वितरणकडे तक्रारीही दिल्याचे सांगितले. तक्रारीनंतर वायगाव(नि.) येथील शाखा अभियंता यांनी वीजपुरवठा बंद केला. परंतु खांब उचलण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाला अडचण येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर खांब पूर्ववत उभे करावे, अशी मागणी सोनेगाव येथील शेतकरी करीत आहे. तसेच आडवे पडलेले तारही मशागतीत अडथळे निर्माण करीत असल्याने ते लवकर हटवावे अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.(प्रतिनिधी) कामाची चौकशी करून कारवाईची मागणीकृषी पंपांना विद्युत पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे रूद्राणी नामक कंपनीला वीज खांब उभारण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यानुसार रूद्राणी नामक कंपनीने शेतात खांब उभे करण्याचे काम केले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने लगबगीने विद्युत खांब जमिनीत रोवण्यात आले. कंत्राटदारांनी सोनेगाव (बाई) येथील दहाही विहिरीवर वीजपुरवठा करण्यासाठी सिमेंट खांब टाकून विद्युत प्रवाह सुरू केला. आता आपल्या शेतातील विहिरीवरून शेतात ओलित करून पाऊस नसला तरी पिके जगवता येईल अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण पहिल्या पावसातच अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीतच या विहिरीचे खांब जमिनीवर कोसळले.काही ताराचा आधार असल्याने लोंबकळत आहे. याची माहिती शेतकऱ्यांनी वायगाव निपाणी येथील शाखा अभियंत्यांना दिली. त्यांनी गावात जावून या खांबांचा पुरवठा बंद केला पण खांब उचलण्यासाठी पाऊले उचलली नाही. शेतात पडून असलेल्या या खांबामुळे शेतकऱ्यांना मशागत करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. काही शेतकऱ्यांच्या पेरण्याही रखडलेल्या आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे खांब पूर्वस्थितीत आणावे किंवा खांबांना जोडलेले तार काढून मशागतीसाठी शेत मोकळे करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. काही शेतकऱ्यांनी याबबात महावितरणकडे तक्रारीही दिल्याचे सांगितले.वीज वितरण कंपनीने केले हात वरजवळपास वीस पोल जमिनीवर पडले आणि काही लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांनी याची माहिती वायगाव येथील शाखा अभियंत्याला दिली. त्यांनी गावात जावून पाहणी केली. पण खांब उभे करण्याचे आश्वासन देण्याऐवजी याला आम्ही काही करू शकत नाही. हा कंत्राटदाराचा दोष आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा. असा सल्ला दिला. इतकेच नाही तर वितरण कंपनीने कंत्राटदाराचे देयकही रोखल्याचे सांगितले. पण या विद्युत वितरण कंपनी आणि कंत्राटदाराच्या भांडणात हताश झालेल्या शेतकऱ्यांचे मरण होत असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.