शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

आष्टी तालुक्यातील तिन्ही तलाव पडणार कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी पावसाळा होऊन तीन महिने पूर्ण झाले. चवथा महिना अर्धा संपला. मात्र पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्याने पावसाची सरासरीही गाठली नाही. तालुक्यातील प्रमुख तीन तलावातील जलसाठा कोणत्याही क्षणी आटण्याची शक्यता आहे. आष्टी तलावात २४ टक्के, पिलापूर तलाव २२ टक्के तर मलकापूर तलावात ३० टक्के जलसाठा आहे. ...

ठळक मुद्देकपिलेश्वर तलावात २४ टक्के जलसाठा : अत्यल्प जलसाठ्यामुळे सिंचनाची समस्या उद्भवणार

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी पावसाळा होऊन तीन महिने पूर्ण झाले. चवथा महिना अर्धा संपला. मात्र पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्याने पावसाची सरासरीही गाठली नाही. तालुक्यातील प्रमुख तीन तलावातील जलसाठा कोणत्याही क्षणी आटण्याची शक्यता आहे. आष्टी तलावात २४ टक्के, पिलापूर तलाव २२ टक्के तर मलकापूर तलावात ३० टक्के जलसाठा आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात हे तीनही तलाव तळ गाठणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकºयांना रब्बीसाठी एकाही फेरीची सोय होणार नसल्याचे चित्र आहे.निसर्गाच्या पायथ्याशी वसलेल्या आष्टी शहराभोवताल चारहीबाजुंनी टेकड्या आहे. याठिकाणी शहराला लागूनच कपिलेश्वर तलाव आहे. पर्यटनासाठी प्रलंबित असलेल्या तलावावर मोठ्या संख्येने नागरिक फिरायला येतात. तलावाची भिंत मोठी आहे. बाजुला ओलीतासाठी सोडण्यात येणाºया पाण्याचा नहर आहे. मात्र सर्वकाही ओसाड पडले आहे. गत वर्षी पावसाळा झाल्यावर अवघा ११ टक्के जलसाठा शिल्लक होता. यावर्षी सध्या एकूण २४ टक्के साठा संचयित आहे. तलावाच्या आतील उंचवटे उघडे पडल्याने चहुबाजुने दगड दिसत आहे. यावरुन यंदाचा उन्हाळा किती बिकट राहील याचा अंदाज येत आहे. पावसाळा संपायला अवघे १५ दिवस बाकी आहे. त्यामुळे पाणी आले नाही तर उपलब्ध साठा कमी होणार आहे.मलकापूर तलावात यंदा २२ टक्के जलसाठा आहे. एकूण ३० टक्के मध्ये तलावाचे तळ झाकलेले दिसत आहे. पिलापूर तलावात गत वर्षी १२ टक्के व यावर्षी १० टक्के जलसाठा झाला आहे. तालुक्यातील तिनही तलावाच्या जलसाठ्यामुळे रबी पिकाचे २५ टक्के क्षेत्र घटणार आहे. सिंचनासाठी पाणीच नसल्यावर शेतकरी काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलावातील पाणीसाठ्याचा फटका मच्छीमारांनाही बसला आहे. आजुबाजूला वाहणाºया नद्या, नाले पाणी कमी पडल्याने कोरड्या झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होणार आहे.कपिलेश्वर, मलकापूर व पिलापूर या तिनही तलावाची पाणी पातळी २४ टक्क्यावर आल्याने संकट आणखी गडद होईल. शेतकºयांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळण्याची शक्यता नाही. येत्या १५ दिवसात पाणी येथे अपेक्षित आहे.- चंद्रशेखर पोटे, तांत्रिक सहाय्यक पाटबंधारे उपविभाग आष्टी