शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यातील तिन्ही तलाव पडणार कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी पावसाळा होऊन तीन महिने पूर्ण झाले. चवथा महिना अर्धा संपला. मात्र पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्याने पावसाची सरासरीही गाठली नाही. तालुक्यातील प्रमुख तीन तलावातील जलसाठा कोणत्याही क्षणी आटण्याची शक्यता आहे. आष्टी तलावात २४ टक्के, पिलापूर तलाव २२ टक्के तर मलकापूर तलावात ३० टक्के जलसाठा आहे. ...

ठळक मुद्देकपिलेश्वर तलावात २४ टक्के जलसाठा : अत्यल्प जलसाठ्यामुळे सिंचनाची समस्या उद्भवणार

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी पावसाळा होऊन तीन महिने पूर्ण झाले. चवथा महिना अर्धा संपला. मात्र पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्याने पावसाची सरासरीही गाठली नाही. तालुक्यातील प्रमुख तीन तलावातील जलसाठा कोणत्याही क्षणी आटण्याची शक्यता आहे. आष्टी तलावात २४ टक्के, पिलापूर तलाव २२ टक्के तर मलकापूर तलावात ३० टक्के जलसाठा आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात हे तीनही तलाव तळ गाठणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकºयांना रब्बीसाठी एकाही फेरीची सोय होणार नसल्याचे चित्र आहे.निसर्गाच्या पायथ्याशी वसलेल्या आष्टी शहराभोवताल चारहीबाजुंनी टेकड्या आहे. याठिकाणी शहराला लागूनच कपिलेश्वर तलाव आहे. पर्यटनासाठी प्रलंबित असलेल्या तलावावर मोठ्या संख्येने नागरिक फिरायला येतात. तलावाची भिंत मोठी आहे. बाजुला ओलीतासाठी सोडण्यात येणाºया पाण्याचा नहर आहे. मात्र सर्वकाही ओसाड पडले आहे. गत वर्षी पावसाळा झाल्यावर अवघा ११ टक्के जलसाठा शिल्लक होता. यावर्षी सध्या एकूण २४ टक्के साठा संचयित आहे. तलावाच्या आतील उंचवटे उघडे पडल्याने चहुबाजुने दगड दिसत आहे. यावरुन यंदाचा उन्हाळा किती बिकट राहील याचा अंदाज येत आहे. पावसाळा संपायला अवघे १५ दिवस बाकी आहे. त्यामुळे पाणी आले नाही तर उपलब्ध साठा कमी होणार आहे.मलकापूर तलावात यंदा २२ टक्के जलसाठा आहे. एकूण ३० टक्के मध्ये तलावाचे तळ झाकलेले दिसत आहे. पिलापूर तलावात गत वर्षी १२ टक्के व यावर्षी १० टक्के जलसाठा झाला आहे. तालुक्यातील तिनही तलावाच्या जलसाठ्यामुळे रबी पिकाचे २५ टक्के क्षेत्र घटणार आहे. सिंचनासाठी पाणीच नसल्यावर शेतकरी काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलावातील पाणीसाठ्याचा फटका मच्छीमारांनाही बसला आहे. आजुबाजूला वाहणाºया नद्या, नाले पाणी कमी पडल्याने कोरड्या झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होणार आहे.कपिलेश्वर, मलकापूर व पिलापूर या तिनही तलावाची पाणी पातळी २४ टक्क्यावर आल्याने संकट आणखी गडद होईल. शेतकºयांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळण्याची शक्यता नाही. येत्या १५ दिवसात पाणी येथे अपेक्षित आहे.- चंद्रशेखर पोटे, तांत्रिक सहाय्यक पाटबंधारे उपविभाग आष्टी