शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यातील तिन्ही तलाव पडणार कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी पावसाळा होऊन तीन महिने पूर्ण झाले. चवथा महिना अर्धा संपला. मात्र पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्याने पावसाची सरासरीही गाठली नाही. तालुक्यातील प्रमुख तीन तलावातील जलसाठा कोणत्याही क्षणी आटण्याची शक्यता आहे. आष्टी तलावात २४ टक्के, पिलापूर तलाव २२ टक्के तर मलकापूर तलावात ३० टक्के जलसाठा आहे. ...

ठळक मुद्देकपिलेश्वर तलावात २४ टक्के जलसाठा : अत्यल्प जलसाठ्यामुळे सिंचनाची समस्या उद्भवणार

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी पावसाळा होऊन तीन महिने पूर्ण झाले. चवथा महिना अर्धा संपला. मात्र पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्याने पावसाची सरासरीही गाठली नाही. तालुक्यातील प्रमुख तीन तलावातील जलसाठा कोणत्याही क्षणी आटण्याची शक्यता आहे. आष्टी तलावात २४ टक्के, पिलापूर तलाव २२ टक्के तर मलकापूर तलावात ३० टक्के जलसाठा आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात हे तीनही तलाव तळ गाठणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकºयांना रब्बीसाठी एकाही फेरीची सोय होणार नसल्याचे चित्र आहे.निसर्गाच्या पायथ्याशी वसलेल्या आष्टी शहराभोवताल चारहीबाजुंनी टेकड्या आहे. याठिकाणी शहराला लागूनच कपिलेश्वर तलाव आहे. पर्यटनासाठी प्रलंबित असलेल्या तलावावर मोठ्या संख्येने नागरिक फिरायला येतात. तलावाची भिंत मोठी आहे. बाजुला ओलीतासाठी सोडण्यात येणाºया पाण्याचा नहर आहे. मात्र सर्वकाही ओसाड पडले आहे. गत वर्षी पावसाळा झाल्यावर अवघा ११ टक्के जलसाठा शिल्लक होता. यावर्षी सध्या एकूण २४ टक्के साठा संचयित आहे. तलावाच्या आतील उंचवटे उघडे पडल्याने चहुबाजुने दगड दिसत आहे. यावरुन यंदाचा उन्हाळा किती बिकट राहील याचा अंदाज येत आहे. पावसाळा संपायला अवघे १५ दिवस बाकी आहे. त्यामुळे पाणी आले नाही तर उपलब्ध साठा कमी होणार आहे.मलकापूर तलावात यंदा २२ टक्के जलसाठा आहे. एकूण ३० टक्के मध्ये तलावाचे तळ झाकलेले दिसत आहे. पिलापूर तलावात गत वर्षी १२ टक्के व यावर्षी १० टक्के जलसाठा झाला आहे. तालुक्यातील तिनही तलावाच्या जलसाठ्यामुळे रबी पिकाचे २५ टक्के क्षेत्र घटणार आहे. सिंचनासाठी पाणीच नसल्यावर शेतकरी काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलावातील पाणीसाठ्याचा फटका मच्छीमारांनाही बसला आहे. आजुबाजूला वाहणाºया नद्या, नाले पाणी कमी पडल्याने कोरड्या झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होणार आहे.कपिलेश्वर, मलकापूर व पिलापूर या तिनही तलावाची पाणी पातळी २४ टक्क्यावर आल्याने संकट आणखी गडद होईल. शेतकºयांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळण्याची शक्यता नाही. येत्या १५ दिवसात पाणी येथे अपेक्षित आहे.- चंद्रशेखर पोटे, तांत्रिक सहाय्यक पाटबंधारे उपविभाग आष्टी