शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

जिल्ह्यात आगीच्या तीन घटना; सहा लाखांवर नुकसान

By admin | Updated: April 13, 2017 01:44 IST

जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत गोठ्यांसह घर जळून खाक झाले. या घटना बुधवारी घडल्या.

मजरा गाव थोडक्यात बचावले : आगीमुळे व्यवसाय हिरावला वर्धा : जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत गोठ्यांसह घर जळून खाक झाले. या घटना बुधवारी घडल्या. यात सहा लाख रुपयांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तीनही घटनांचा तलाठी, पोलिसांनी पंचनामा केला असून अहवाल तहसीलदारांना सादर केला आहे. वर्धा ते आर्वी मार्गावरील मजरा गावाजवळ खुशाल बोंदरे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली. यात शेती साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. बोंदरे यांचे शेत गावाला लागून आहे. सायंकाळी ५ वाजता गोठ्याला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण आग गावाच्या दिशेने पसरत चालली होती. दरम्यान, ठाणेदार प्रशांत पांडे यांना माहिती मिळताच त्यांनी अरावली कंपनीतून पाण्याचे टँकर बोलवून स्वत: सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत गावाकडे जाणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविले. यात गोठ्यातील बैलगाडी, वखर, डवरे व कुटार खाक झाले. पोलिसांनी सतर्कता बाळगत टँकर बोलविल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी जमादार बावले, शिपाई प्रीतम इंगळे व ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बैलजोडी झाडाखाली बांधली असल्याने ती सुखरूप बचावली.(लोकमत न्यूज नेटवर्क) गोठ्याला आग, एक लाखाचे नुकसान अल्लीपूर : एकूर्ली शिवारातील ठोठरी भागातील कल्पना रमेश महाकाळकर यांच्या शेतातील बंड्याला रात्री आग लागली. यात शेतीची अवजारे, साहित्य, कुटार, पीव्हीसी पाईप ५० नग टिनपत्रे जळाली. गुरे लांब असल्याने बचावली. जिवीत हानी झाली नसली तरी १ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पटवारी व अल्लीपूर पोलिसांना घटनेचा पंचनामा केला. घराला आग, बिछायतचे साहित्य भस्मसात सेवाग्राम : घराला मध्यरात्री लागलेल्या आगीत बिछायतचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना हमदापूर येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. यात गुरूदेव बजरंग बावनगडे यांचे चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाले. हमदापूर येथील बावनगडे यांचे टपरीसारखे लहान घर असून घरालगत बिछायतचे सामान ठेवण्यासाठी टिनाचे शेड केले होते. मंगळवारी रात्री गुरूदेव तसेच आई, पत्नी, दोन मुले झोपी गेले. दरम्यान, मध्यरात्री अचानक घराला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ग्रामस्थांना जागे करून आग विझविली; पण तोपर्यंत बिछायतचे कापड, खुर्च्या, दरी, मॅट, स्टेज डेकोरेशन, पंखे, लाईटस, वायर्स आदी साहित्य जळून खाक झाले. यात त्यांचे ४ ते ४.५० लाखांचे नुकसान झाले. जीवित हानी झाली नसली तरी जगण्याचे साधन हरविल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. तलाठी शेंद्रे यांनी पंचनामा केला. सरपंच प्रीती भोयर, उपसरपंच संजय देशमुख, जि.प. सदस्य सुनील शेंडे, पं.स. सदस्य वर्षा पाटील आदींनी भेट दिली. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली.