शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

जिल्ह्यात आगीच्या तीन घटना; सहा लाखांवर नुकसान

By admin | Updated: April 13, 2017 01:44 IST

जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत गोठ्यांसह घर जळून खाक झाले. या घटना बुधवारी घडल्या.

मजरा गाव थोडक्यात बचावले : आगीमुळे व्यवसाय हिरावला वर्धा : जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत गोठ्यांसह घर जळून खाक झाले. या घटना बुधवारी घडल्या. यात सहा लाख रुपयांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तीनही घटनांचा तलाठी, पोलिसांनी पंचनामा केला असून अहवाल तहसीलदारांना सादर केला आहे. वर्धा ते आर्वी मार्गावरील मजरा गावाजवळ खुशाल बोंदरे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली. यात शेती साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. बोंदरे यांचे शेत गावाला लागून आहे. सायंकाळी ५ वाजता गोठ्याला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण आग गावाच्या दिशेने पसरत चालली होती. दरम्यान, ठाणेदार प्रशांत पांडे यांना माहिती मिळताच त्यांनी अरावली कंपनीतून पाण्याचे टँकर बोलवून स्वत: सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत गावाकडे जाणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविले. यात गोठ्यातील बैलगाडी, वखर, डवरे व कुटार खाक झाले. पोलिसांनी सतर्कता बाळगत टँकर बोलविल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी जमादार बावले, शिपाई प्रीतम इंगळे व ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बैलजोडी झाडाखाली बांधली असल्याने ती सुखरूप बचावली.(लोकमत न्यूज नेटवर्क) गोठ्याला आग, एक लाखाचे नुकसान अल्लीपूर : एकूर्ली शिवारातील ठोठरी भागातील कल्पना रमेश महाकाळकर यांच्या शेतातील बंड्याला रात्री आग लागली. यात शेतीची अवजारे, साहित्य, कुटार, पीव्हीसी पाईप ५० नग टिनपत्रे जळाली. गुरे लांब असल्याने बचावली. जिवीत हानी झाली नसली तरी १ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पटवारी व अल्लीपूर पोलिसांना घटनेचा पंचनामा केला. घराला आग, बिछायतचे साहित्य भस्मसात सेवाग्राम : घराला मध्यरात्री लागलेल्या आगीत बिछायतचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना हमदापूर येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. यात गुरूदेव बजरंग बावनगडे यांचे चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाले. हमदापूर येथील बावनगडे यांचे टपरीसारखे लहान घर असून घरालगत बिछायतचे सामान ठेवण्यासाठी टिनाचे शेड केले होते. मंगळवारी रात्री गुरूदेव तसेच आई, पत्नी, दोन मुले झोपी गेले. दरम्यान, मध्यरात्री अचानक घराला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ग्रामस्थांना जागे करून आग विझविली; पण तोपर्यंत बिछायतचे कापड, खुर्च्या, दरी, मॅट, स्टेज डेकोरेशन, पंखे, लाईटस, वायर्स आदी साहित्य जळून खाक झाले. यात त्यांचे ४ ते ४.५० लाखांचे नुकसान झाले. जीवित हानी झाली नसली तरी जगण्याचे साधन हरविल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. तलाठी शेंद्रे यांनी पंचनामा केला. सरपंच प्रीती भोयर, उपसरपंच संजय देशमुख, जि.प. सदस्य सुनील शेंडे, पं.स. सदस्य वर्षा पाटील आदींनी भेट दिली. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली.