शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आगीच्या तीन घटना; सहा लाखांवर नुकसान

By admin | Updated: April 13, 2017 01:44 IST

जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत गोठ्यांसह घर जळून खाक झाले. या घटना बुधवारी घडल्या.

मजरा गाव थोडक्यात बचावले : आगीमुळे व्यवसाय हिरावला वर्धा : जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत गोठ्यांसह घर जळून खाक झाले. या घटना बुधवारी घडल्या. यात सहा लाख रुपयांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तीनही घटनांचा तलाठी, पोलिसांनी पंचनामा केला असून अहवाल तहसीलदारांना सादर केला आहे. वर्धा ते आर्वी मार्गावरील मजरा गावाजवळ खुशाल बोंदरे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली. यात शेती साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. बोंदरे यांचे शेत गावाला लागून आहे. सायंकाळी ५ वाजता गोठ्याला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण आग गावाच्या दिशेने पसरत चालली होती. दरम्यान, ठाणेदार प्रशांत पांडे यांना माहिती मिळताच त्यांनी अरावली कंपनीतून पाण्याचे टँकर बोलवून स्वत: सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत गावाकडे जाणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविले. यात गोठ्यातील बैलगाडी, वखर, डवरे व कुटार खाक झाले. पोलिसांनी सतर्कता बाळगत टँकर बोलविल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी जमादार बावले, शिपाई प्रीतम इंगळे व ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बैलजोडी झाडाखाली बांधली असल्याने ती सुखरूप बचावली.(लोकमत न्यूज नेटवर्क) गोठ्याला आग, एक लाखाचे नुकसान अल्लीपूर : एकूर्ली शिवारातील ठोठरी भागातील कल्पना रमेश महाकाळकर यांच्या शेतातील बंड्याला रात्री आग लागली. यात शेतीची अवजारे, साहित्य, कुटार, पीव्हीसी पाईप ५० नग टिनपत्रे जळाली. गुरे लांब असल्याने बचावली. जिवीत हानी झाली नसली तरी १ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पटवारी व अल्लीपूर पोलिसांना घटनेचा पंचनामा केला. घराला आग, बिछायतचे साहित्य भस्मसात सेवाग्राम : घराला मध्यरात्री लागलेल्या आगीत बिछायतचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना हमदापूर येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. यात गुरूदेव बजरंग बावनगडे यांचे चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाले. हमदापूर येथील बावनगडे यांचे टपरीसारखे लहान घर असून घरालगत बिछायतचे सामान ठेवण्यासाठी टिनाचे शेड केले होते. मंगळवारी रात्री गुरूदेव तसेच आई, पत्नी, दोन मुले झोपी गेले. दरम्यान, मध्यरात्री अचानक घराला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ग्रामस्थांना जागे करून आग विझविली; पण तोपर्यंत बिछायतचे कापड, खुर्च्या, दरी, मॅट, स्टेज डेकोरेशन, पंखे, लाईटस, वायर्स आदी साहित्य जळून खाक झाले. यात त्यांचे ४ ते ४.५० लाखांचे नुकसान झाले. जीवित हानी झाली नसली तरी जगण्याचे साधन हरविल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. तलाठी शेंद्रे यांनी पंचनामा केला. सरपंच प्रीती भोयर, उपसरपंच संजय देशमुख, जि.प. सदस्य सुनील शेंडे, पं.स. सदस्य वर्षा पाटील आदींनी भेट दिली. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली.