शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमात जपले जातेय विचार आणि वास्तूचेही पावित्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:15 IST

जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींनी हिंसेला कधीच थारा दिला नाही. देशाला नव्हे तर जगाला परिवर्तनाचे बळ देणाºया बापुंची हत्या करण्यात आली. पण, आजही ७१ वर्षानंतर त्यांचे विचार प्रेरणादायी ठरत असल्याने माणूस गेल्या नंतरही विचार रुपाने तो कायम असतो, हे सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देबापूंचा दहा वर्षे मुक्काम : सेवाग्राममधून मिळते परिवर्तनाचे बळ

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींनी हिंसेला कधीच थारा दिला नाही. देशाला नव्हे तर जगाला परिवर्तनाचे बळ देणाºया बापुंची हत्या करण्यात आली. पण, आजही ७१ वर्षानंतर त्यांचे विचार प्रेरणादायी ठरत असल्याने माणूस गेल्या नंतरही विचार रुपाने तो कायम असतो, हे सिद्ध झाले आहे. बापूंनी सेवाग्रामच्या आश्रमात आयुष्याचे दहा वर्षे घालविली असून त्यांची हे दहा वर्षे वर्ध्यांच्या इतिहासात कोरल्या गेली आहे. त्यामुळे आजही बापूंचे विचार आणि आश्रमातील वास्तुंचे पावित्र्य जपल्या जात आहे.महात्मा गांधींच्या सार्वजनिक व आश्रमीक जीवनाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स आणि टाँलस्टाँय फार्म पासून झाली. येथूनच बापूंच्या विचार व कार्याला सुरूवात झाली असून ते खºया अर्थाने दक्षिण आॅफ्रीकेतच घडले. भारतातील कार्याने त्यांची वैचारीक प्रगल्भता आणखीच वाढत गेली. जमनालाल बजाज यांच्या आग्रहास्तव महात्मा गांधी २३ सप्टेंबर १९३४ मध्ये वर्ध्यात आले. हरितसेनेचे व्रत घेतलेल्या मीराबेन यांच्या कार्याने प्रभावित होऊन ‘खेड्याकडे चला’ चा नारा देत बापूंनी १३ एप्रील १९३६ ला सेवाग्राम गाठले. सेवाग्रामातील बजाज यांच्या शेतात कुटी करुन वास्तव्याला सुरुवात केली. कालांतराने आदी निवास, बा कुटी, बापू कुटी, आखिरी निवास, परचुरे कुटी यातून विचारांचे बिजारोपण होत आश्रम तयार झाला. येथून देश व स्वातंत्र्याच्या लढ्याची रणनीती आखण्यात आली. त्यामुळे सेवाग्राम आश्रम हा बापूंचे निवासस्थानच नाही तर देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरला. येथे १९३४ पासून १९४६ पर्यंत बापूंचे वास्तव्य राहिले आहे. या दहा वर्षाच्या काळात रचनात्मक कार्यक्रम राबवित स्वातंत्र्य लढ्याकरिता कार्यकर्ते घडविण्याचे कार्य केले. त्यांनी एकादश व्रताचे स्वत: पालन करुन इतरांनाही सांगितले. आश्रमीय जीवन पद्धतीचा नियमच गांधीजींनी सर्वांना घालून दिला. जगाला नवविचार देणाºया या महात्म्याची ३० जानेवारी १९४८ मध्ये हत्या करण्यात आली. त्यांना जाऊन आज ७१ वर्षे झाली; पण आश्रमात त्यांनी बिजारोपण केलेल्या विचारांची फळे आता नवपिढी चाखताना दिसत आहे. जीवनाला नवा आयाम देण्यासाठी बापूंचे विचार महत्त्वाचे असल्याने आश्रमात पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे.आश्रमातील कार्यपद्धतीची परंपरा कायमचगांधीजींनी सांगितलेली व्यवस्था व कार्यपद्धती आजही आश्रमात कायम आहे. स्वच्छता व शांतता हा आश्रमाचा आत्मा आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या आश्रमात झाडांनी आणखीच भर घातली आहे. येथील कुट्यां कालौघात दुरुस्ती करण्याची वेळ आली; पण मुख्य उद्देशाला धक्का न लावला कुट्यांच्या भिंती आणि छताचीही दुरुस्ती करण्यात आली. तसेच या आश्रमात सेंद्रीय शेती, गो-शाळा, सुतकताई, विनाई, ग्रामोद्योग उत्तम पद्धतीने सुरु आहे. परिसरातील बेलाचे झाड उद्योगासाठी हातभार लावत आहे तर गोशाळेमुळे शेतातील उत्पानात वाढ झाली आहे.आधुनिक काळातील जीवनमान आणि न संपणारी पागल दौड, यातून विभक्तिकरण आणि नीती मूल्यांचा ºहास झाला आहे. चंगळवाद उफाळून दु:खाला आमंत्रण ठरत आहे. त्यामुळे आपले जीवन कसे असावे? याचा शोध घेण्यासाठी लाखो पर्यटक व अभ्यासक आश्रमाला भेटी देतात.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी