शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमात जपले जातेय विचार आणि वास्तूचेही पावित्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:15 IST

जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींनी हिंसेला कधीच थारा दिला नाही. देशाला नव्हे तर जगाला परिवर्तनाचे बळ देणाºया बापुंची हत्या करण्यात आली. पण, आजही ७१ वर्षानंतर त्यांचे विचार प्रेरणादायी ठरत असल्याने माणूस गेल्या नंतरही विचार रुपाने तो कायम असतो, हे सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देबापूंचा दहा वर्षे मुक्काम : सेवाग्राममधून मिळते परिवर्तनाचे बळ

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींनी हिंसेला कधीच थारा दिला नाही. देशाला नव्हे तर जगाला परिवर्तनाचे बळ देणाºया बापुंची हत्या करण्यात आली. पण, आजही ७१ वर्षानंतर त्यांचे विचार प्रेरणादायी ठरत असल्याने माणूस गेल्या नंतरही विचार रुपाने तो कायम असतो, हे सिद्ध झाले आहे. बापूंनी सेवाग्रामच्या आश्रमात आयुष्याचे दहा वर्षे घालविली असून त्यांची हे दहा वर्षे वर्ध्यांच्या इतिहासात कोरल्या गेली आहे. त्यामुळे आजही बापूंचे विचार आणि आश्रमातील वास्तुंचे पावित्र्य जपल्या जात आहे.महात्मा गांधींच्या सार्वजनिक व आश्रमीक जीवनाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स आणि टाँलस्टाँय फार्म पासून झाली. येथूनच बापूंच्या विचार व कार्याला सुरूवात झाली असून ते खºया अर्थाने दक्षिण आॅफ्रीकेतच घडले. भारतातील कार्याने त्यांची वैचारीक प्रगल्भता आणखीच वाढत गेली. जमनालाल बजाज यांच्या आग्रहास्तव महात्मा गांधी २३ सप्टेंबर १९३४ मध्ये वर्ध्यात आले. हरितसेनेचे व्रत घेतलेल्या मीराबेन यांच्या कार्याने प्रभावित होऊन ‘खेड्याकडे चला’ चा नारा देत बापूंनी १३ एप्रील १९३६ ला सेवाग्राम गाठले. सेवाग्रामातील बजाज यांच्या शेतात कुटी करुन वास्तव्याला सुरुवात केली. कालांतराने आदी निवास, बा कुटी, बापू कुटी, आखिरी निवास, परचुरे कुटी यातून विचारांचे बिजारोपण होत आश्रम तयार झाला. येथून देश व स्वातंत्र्याच्या लढ्याची रणनीती आखण्यात आली. त्यामुळे सेवाग्राम आश्रम हा बापूंचे निवासस्थानच नाही तर देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरला. येथे १९३४ पासून १९४६ पर्यंत बापूंचे वास्तव्य राहिले आहे. या दहा वर्षाच्या काळात रचनात्मक कार्यक्रम राबवित स्वातंत्र्य लढ्याकरिता कार्यकर्ते घडविण्याचे कार्य केले. त्यांनी एकादश व्रताचे स्वत: पालन करुन इतरांनाही सांगितले. आश्रमीय जीवन पद्धतीचा नियमच गांधीजींनी सर्वांना घालून दिला. जगाला नवविचार देणाºया या महात्म्याची ३० जानेवारी १९४८ मध्ये हत्या करण्यात आली. त्यांना जाऊन आज ७१ वर्षे झाली; पण आश्रमात त्यांनी बिजारोपण केलेल्या विचारांची फळे आता नवपिढी चाखताना दिसत आहे. जीवनाला नवा आयाम देण्यासाठी बापूंचे विचार महत्त्वाचे असल्याने आश्रमात पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे.आश्रमातील कार्यपद्धतीची परंपरा कायमचगांधीजींनी सांगितलेली व्यवस्था व कार्यपद्धती आजही आश्रमात कायम आहे. स्वच्छता व शांतता हा आश्रमाचा आत्मा आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या आश्रमात झाडांनी आणखीच भर घातली आहे. येथील कुट्यां कालौघात दुरुस्ती करण्याची वेळ आली; पण मुख्य उद्देशाला धक्का न लावला कुट्यांच्या भिंती आणि छताचीही दुरुस्ती करण्यात आली. तसेच या आश्रमात सेंद्रीय शेती, गो-शाळा, सुतकताई, विनाई, ग्रामोद्योग उत्तम पद्धतीने सुरु आहे. परिसरातील बेलाचे झाड उद्योगासाठी हातभार लावत आहे तर गोशाळेमुळे शेतातील उत्पानात वाढ झाली आहे.आधुनिक काळातील जीवनमान आणि न संपणारी पागल दौड, यातून विभक्तिकरण आणि नीती मूल्यांचा ºहास झाला आहे. चंगळवाद उफाळून दु:खाला आमंत्रण ठरत आहे. त्यामुळे आपले जीवन कसे असावे? याचा शोध घेण्यासाठी लाखो पर्यटक व अभ्यासक आश्रमाला भेटी देतात.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी