शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

म्युकरमायकोसिसग्रस्तांसाठी म. फुले जनआरोग्य योजना ठरली ‘संजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 05:00 IST

वर्धा जिल्ह्यात सुमारे १०० रुग्णांवर या योजनेतून लाखो रुपयांचे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ११९ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योजनेअंतर्गत आतापर्यंत असंख्य रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, बरे होऊन ते घरीही गेले आहेत.

ठळक मुद्दे१०० रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार : जिल्ह्यात आतापर्यंत आढळले ११९ रुग्ण

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोना संसर्गानंतर  बुरशीजन्य म्युकरमायकोसिस झाल्याचे कळताच रुग्णाच्या नातेवाइकांना येणाऱ्या खर्चामुळे अक्षरश: धडकी भरते. म्युकरमायकोसिस आजार जडलेल्या रुग्णाचा खर्च पाच लाखांपासून १५ लाखांपर्यंत असू शकतो. कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना रोजगार गमवावा लागला. वेतनकपातीला सामोरे जावे लागले. व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. अशा परिस्थितीत उपचाराकरिता पैसा कोठून आणायचा, असा यक्ष प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा ठाकला असतानाच या रुग्णांसाठी राज्य शासनाची ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ नवसंजीवनी ठरली आहे.वर्धा जिल्ह्यात सुमारे १०० रुग्णांवर या योजनेतून लाखो रुपयांचे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ११९ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योजनेअंतर्गत आतापर्यंत असंख्य रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, बरे होऊन ते घरीही गेले आहेत. सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे १०५ रुग्ण दाखल झाले. यातील ८७ रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचारांचा लाभ देण्यात आला, तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात आतापावेतो १४ रुग्ण दाखल झालेत. यातील बारा रुग्णांवर योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. स्मिता हिवरे यांनी दिली. केवळ वर्ध्यातीलच नव्हे, तर  म्युकरमायकोसिसच्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात राहणारा रुग्ण असो, त्याच्यावर वर्ध्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यासाठी केवळ रुग्णाला ही योजना असलेल्या रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. तसेच केवळ रेशनकार्ड (शिधापत्रिका) मग ते कोणतेही असो, अगदी शुभ्र (पांढरी) असली तरी व ओळख पटविण्यासाठी एक ओळखपत्र, ज्यात आधार कार्ड, वाहन परवाना, बँक पासबुक, मतदान कार्ड, संस्थेचे ओळखपत्र आदींचा समावेश आहे. ही कागदपत्रे संकलित केल्यास रुग्णांना योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जातात.

सावंगीतील ८७, तर सेवाग्रामातील १२ रुग्णांना लाभम्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांवर जिल्ह्यातील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय तसेच सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार केले जातात. या दोन्ही रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जाते.  योजनेंतर्गत सावंगीतील ८७, तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील बारा रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाची ही योजना रुग्णांसाठी जीवनदायिनीच ठरली आहे.

आतापर्यंत १०० रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात आले आहेत. पूर्वी शुभ्र शिधापत्रिकाधारकांचा या योजनेत समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, कोरोनामुक्त  झालेल्यांना म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराचा धोका वाढत असल्याने शुभ्र शिधापत्रिकाधारकांनाही आता या योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे. रुग्णांवर राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार होत झाल्याने नातेवाइकांनीही समाधान व्यक्त केले आहे.-डॉ. स्मिता हिवरे, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना, वर्धा.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने निर्माण केलेल्या आव्हानांना सामोरे जात असतानाच नव्याने बळावलेल्या म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या गंभीर आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांचा विशेष वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. या आजाराच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णत: मोफत उपचार रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत केले जात असल्याने रुग्णांसह नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला आहे.-डॉ. चंद्रशेखर महाकाळकर,                                                                  मुख्य वैद्यकीय अधीक्षक, एव्हीबीआरएच, सावंगी (मेघे). 

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या