शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘त्या’ शेतकऱ्यांना मिळाले विहिरीचे अनुदान

By admin | Updated: March 26, 2017 01:05 IST

ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्याने सेलूच्या तीन शेतकऱ्यांचे सिंचन विहिरींचे अनुदान मिळण्यास अडचण आली होती.

लोकमतचा पाठपुरावा : शेतकऱ्यांनी मागितली होती आत्महत्येची परवानगीघोराड : ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्याने सेलूच्या तीन शेतकऱ्यांचे सिंचन विहिरींचे अनुदान मिळण्यास अडचण आली होती. अखेर दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अकुशल कामाचे अनुदान बँकेच्या खात्यात जमा झाले. यामुळे पूर्ण रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शेतकऱ्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडली होती. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तत्कालीन सेलू ग्रामपंचपायतने विहीर खोदकाम व बांधकाम करण्याचे प्रशासकीय आदेश दिले होते. यात सेलू येथील कुंदा प्रभाकर चोरे, विनोद गोमासे, सुरेश कुकडे यांचा समावेश होता. त्यांनी विहिरीच्या बांधकामाला सुरूवात केली व पहिले मष्टर निघण्यापूर्वी १३ मार्च २०१५ रोजी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. येथेच सिंचन विहिरीची देयके अडकली. या तीन शेतकऱ्यांनी अधिकारी, लोकप्रतिनिधी व शासकीय कार्यालयाचे उंबरठे अनुदानासाठी झिजविले; पण पदरी निराशा येत होती. अखेर पंतप्रधानांना आत्महत्या करण्यासाठी परवानगी मागितली होती. याबाबत वृत्त ‘लोकमत’ १० जानेवारी २०१६ रोजी प्रकाशित केले होते. यानंतर १५ आगस्ट २०१६ ला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत कार्यालयासमोर आत्महत्या करणार, असे नमूद केले होते. त्यावेळी २ आगस्ट २०१६ ला आपल्या पत्राची दखल घेत असल्याचे कार्यालयीन अधिकाऱ्यांनी कळविले. परिणामी, शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. यानंतरही त्या तीनही शेतकऱ्यांनी पत्राची देवाणघेवाण सुरूच ठेवली. दरम्यान, शासनाने दखल घेतली असून २४ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अकुशल कामाचे १ लाख ३ हजार ६१५ रुपये प्रत्येकी जमा केले आहेत. यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतल्याने कुशल कामाचे उर्वरित प्रत्येकी १, लाख ७० हजार ९५ रुपये आता कधी मिळतील, याकडे लक्ष लागले आहे. २ लाख ७३ हजार ७१० रुपयांच्या वैयक्तिक सिंचन विहीर योजनेतील अकुशल कामावरील खर्चाची रक्कम मिळाली असली तरी उर्वरित रकमेसाठी शेतकऱ्यांना किती काळ प्रतीक्षा करावी लागेल, हे आता शासनावरच अवलंबून आहे.(वार्ताहर) दोन वर्षांनंतर मिळाले अर्धेच अनुदानसेलू ग्रामपंचायतने २६ फेब्रुवारी २०१४ रोजी या तीन शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीला प्रशासकीय मान्यता दिली तर २ फेबु्रवारी २०१५ रोजी प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. विहिरीच्या खोदकामाला सुरुवात केली आणि १३ मार्च २०१५ ला ग्रा.पं. चे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण होत असताना मस्टर टाकण्याची अडचण निर्माण झाली आणि अनुदान अडकले. दोन वर्षे शेतकरी शासकीय कार्यालयात तगादा लावल्यानंतर शासनाने दखल घेतली; पण अर्धेच अनुदान प्राप्त झाले आहे. ‘लोकमत’चा पाठपुरावाआम्हा शेतकऱ्यांची व्यथा ‘लोकमत’ वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. याची दखलही शासनाकडून घेण्यात आली. ‘लोकमत’मुळे आम्हाला यश आले, असे मत विनोद गोमासे, सुरेश कुकडे व कुंदा चोरे यांनी व्यक्त केले.आता शेतकऱ्यांना आशाविहिरीच्या खोदकाम व बांधकामाला लागलेला खर्च शासन देईलच, अशी आशा या तीनही शेतकऱ्यांना आहे. उर्वरित रकमेचे अनुदान शासनाने लवकर देऊन शेतकऱ्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीला आधार द्यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.