शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

दोन लाख शेतकरी ठेवीदारांचे ३३३ कोटी धोक्यात

By admin | Updated: May 24, 2014 00:03 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना कलम २२ अंतर्गत बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे बँक खाते धारकांच्या ठेवी बुडण्याची शक्यता वाढली आहे. रिझर्व्ह बँकेने लिक्वीडेटर नेमल्यास जिल्ह्यातील

यंत्रणेची उदासीनता : रिझर्व्ह बँकेने व्यवहार दिला बंदीचा आदेश

वर्धा : भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना कलम २२ अंतर्गत बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे बँक खाते धारकांच्या ठेवी बुडण्याची शक्यता वाढली आहे. रिझर्व्ह बँकेने लिक्वीडेटर नेमल्यास जिल्ह्यातील २ लाख खातेधारकांच्या ३३३ कोटी रुपयांच्या ठेवी बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शासनाची उदासीनता या ठेविदारांच्या माथी आली आहे. जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३३३ कोटी रुपयांची कर्ज वसुली बाकी आहे. २ लाख शेतकरी खाते धारकांच्या ३३३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार बँकेतील सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे नमुद केले आहे. यापूर्वीही रिझर्व्ह बँकेने ३५(अ) कलमान्वये १५ मे २०१२ रोजी नोटीस दिला होता. बँकेला दिलेल्या या नोटीसनुसार बँकांनी कर्जवसुल करणे गरजेचे होते. याकरीता राज्य शासनाने सहकारी बँकांना मदत करून आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे होते; मात्र राज्य शासनाने विदर्भाच्या बाबतीत सापत्न वागणुकीचा दाखला देत केवळ धुळे, जालना, नांदेड या बँकांना आर्थिक मदत केली. नागपूर, बुलढाणा व वर्धा बँकेला याचा काहीही लाभ मिळाला नाही. बँकेच्या संचालकांनी राज्य शासनाकडे निवेदन देवून बँकेकरिता पॅकेजची मागणी केली; मात्र आश्वासनाच्या पलिकडे काही मिळाले नाही. बँक बंद झाल्याने जिल्ह्यातील २८२ कर्मचार्‍यांचे भवितव्य धोक्यात आले असून ४६ शाखा बंद होणार आहेत. राज्य शासनाने याचे गांभीर्य लक्षात घेवून बँकांना मदतीचे पॅकेज जाहीर केल्यास डबघाईस आलेल्या या सहकारी बँकाची स्थिती काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे. या संदर्भात किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी राज्य शासनाला निवेदन दिले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)