शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

दोन लाख शेतकरी ठेवीदारांचे ३३३ कोटी धोक्यात

By admin | Updated: May 24, 2014 00:03 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना कलम २२ अंतर्गत बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे बँक खाते धारकांच्या ठेवी बुडण्याची शक्यता वाढली आहे. रिझर्व्ह बँकेने लिक्वीडेटर नेमल्यास जिल्ह्यातील

यंत्रणेची उदासीनता : रिझर्व्ह बँकेने व्यवहार दिला बंदीचा आदेश

वर्धा : भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना कलम २२ अंतर्गत बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे बँक खाते धारकांच्या ठेवी बुडण्याची शक्यता वाढली आहे. रिझर्व्ह बँकेने लिक्वीडेटर नेमल्यास जिल्ह्यातील २ लाख खातेधारकांच्या ३३३ कोटी रुपयांच्या ठेवी बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शासनाची उदासीनता या ठेविदारांच्या माथी आली आहे. जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३३३ कोटी रुपयांची कर्ज वसुली बाकी आहे. २ लाख शेतकरी खाते धारकांच्या ३३३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार बँकेतील सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे नमुद केले आहे. यापूर्वीही रिझर्व्ह बँकेने ३५(अ) कलमान्वये १५ मे २०१२ रोजी नोटीस दिला होता. बँकेला दिलेल्या या नोटीसनुसार बँकांनी कर्जवसुल करणे गरजेचे होते. याकरीता राज्य शासनाने सहकारी बँकांना मदत करून आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे होते; मात्र राज्य शासनाने विदर्भाच्या बाबतीत सापत्न वागणुकीचा दाखला देत केवळ धुळे, जालना, नांदेड या बँकांना आर्थिक मदत केली. नागपूर, बुलढाणा व वर्धा बँकेला याचा काहीही लाभ मिळाला नाही. बँकेच्या संचालकांनी राज्य शासनाकडे निवेदन देवून बँकेकरिता पॅकेजची मागणी केली; मात्र आश्वासनाच्या पलिकडे काही मिळाले नाही. बँक बंद झाल्याने जिल्ह्यातील २८२ कर्मचार्‍यांचे भवितव्य धोक्यात आले असून ४६ शाखा बंद होणार आहेत. राज्य शासनाने याचे गांभीर्य लक्षात घेवून बँकांना मदतीचे पॅकेज जाहीर केल्यास डबघाईस आलेल्या या सहकारी बँकाची स्थिती काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे. या संदर्भात किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी राज्य शासनाला निवेदन दिले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)